शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

चारे येथील जगदाळे भावकी पाळणार तीनच दिवसांचा दुखवटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:22 IST

बार्शी : काळ बदलता तसे चालीरीती, रूढी परंपरादेखील बदलत आहेत. असाच एक क्रांतिकारी निर्णय कर्मवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे ...

बार्शी : काळ बदलता तसे चालीरीती, रूढी परंपरादेखील बदलत आहेत. असाच एक क्रांतिकारी निर्णय कर्मवीर डाॅ. मामासाहेब जगदाळे यांची जन्मभूमी असलेल्या चारे (ता. बार्शी) येथील जगदाळे (भावकीने) कुटुंबीयाने घेत आधुनिकतेची कास धरली. त्यानी दुखवट्याबाबत एक पाऊल पुढे टाकून फक्त तीनच दिवसांचे सूतक पाळण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती बार्शी पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे यांनी दिली.

चारे हे साडेतीन हजार लोकवस्तीचे गाव. गावात तब्बल ७५ टक्के लोक हे जगदाळे आडनावाचे. गावातील स्व. सुशीला बळिराम जगदाळे यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर पंचायत समितीचे गटनेते सुंदरराव जगदाळे यांनी जगदाळे कुटुंबीयांनी तीनच दिवसांचा दुखवटा पाळावा असा प्रस्ताव मांडला. त्या प्रस्तावास जगदाळे कुटुंबातील सदस्यांनी संमती दिली.

यावेळी युवराज जगदाळे, रवी जगदाळे, प्रदीप जगदाळे, नंदकुमार जगदाळे, राहुल जगदाळे, महेश जगदाळे, जनक जगदाळे, जयराम जगदाळे, प्रशांत जगदाळे, हरीशचंद्र जगदाळे, संतोष जगदाळे, आदींनी प्रामुख्याने ठरावास संमती दिली.

अग्निदहन व तिसऱ्या दिवसाचा सावडणे हा कार्यक्रम पूर्वापार ठरल्याप्रमाणे करणे, पूर्वापार चालत आलेला दहाव्या दिवशीचा दशक्रिया विधी, दुखावट्यामधील शेवटचा-तेरावा दिवसाचा विधी, रक्षा विसर्जन, दशक्रिया विधीचे ठिकाण, हे त्या-त्या कुटुंबीयांच्या सोयीने व इच्छेनुसार करावे असे एकमताने ठरविण्यात आले.