शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
3
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
4
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
5
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
6
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
7
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
8
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
9
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
10
शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, ५६ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; Infosys मध्ये घसरण, 'या' शेअर्समध्ये तेजी
11
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
12
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
13
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
14
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
15
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
16
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
17
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
18
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
19
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
20
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप

कौन कितने पाणीमे.. सरपंच निवडीनंतर होणार स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:20 IST

बार्शी : गेल्या वीस वर्षांपासून बार्शी तालुक्याच्या राजकारणात आ़मदार राजेंद्र राऊत विरुध्द दिलीप सोपल अशी लढत प्रत्येक निवडणुकीत पहावयास ...

बार्शी : गेल्या वीस वर्षांपासून बार्शी तालुक्याच्या राजकारणात आ़मदार राजेंद्र राऊत विरुध्द दिलीप सोपल अशी लढत प्रत्येक निवडणुकीत पहावयास मिळत आहे. आजवरच्या राजकारणाचा विचार करता शहरात दिलीप सोपलांनी तर ग्रामीण भागात राजेंद्र राऊतांनी आघाडी घेतल्याचा इतिहास आहे. वीस वर्षांपासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये आ़मदार राजेंद्र राऊत यांनी वर्चस्व अबाधित ठेवले आहे. आता सरपंच निवडीनंतर कोण किती पाण्यात हे स्पष्ट होणार आहे.

सर्वाधिक ग्रामपंचायती राजेंद्र राऊत गटाने जिंकल्या आहेत. त्यासोबत ग्रामीण भागात राजकारण करणाऱ्या परंतु तालुकास्तरावर चर्चेत असणाऱ्या नेत्यांनी आपापल्या गावात विजय मिळवत गावात आपली पत असल्याचे दाखवून दिले आहे़ याला माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील आणि विद्यमान पंचायत समिती सदस्य इंद्रजित चिकणे यांची गावे अपवाद आहेत. कारण या दोन्ही गावात त्यांचे पॅनेल पराभूत झाले आहे. तालुक्यात ९४ गावांच्या निवडणुका होत्या. त्यात १६ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या होत्या. तर ७८ गावात निवडणुका झाल्या. यामध्ये बहतांश ग्रामपंचायतीत राऊत गटाची सत्ता आली. त्या खालोखाल सोपल गटांने पाठशिवणीचा खेळ केला़. परंतु, या दोघात मागील वेळेपेक्षा जास्त फरक असल्याचे दिसत आहे.

पंधरा गावात स्थानिक आघाड्या, सर्वपक्षीय आघाड्या यांनी सत्ता मिळविल्या आहेत. या आघाड्यात तालुका पातळीवरील नेत्यांचा विचार न करता गावात तडजोडी केल्या आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायती कोणत्याच पक्षाच्या आहेत असे म्हणता येत नाही़. तरीदेखील दोन्ही नेते या गावांवर दावे करीत आहेत. परंतु सरपंच निवडीनंतर कोणाचे किती सरपंच झाल्यावर तालुक्यात कोणाची आघाडी हे निश्चित होणार आहे़

यंदा मोठ्या गावात सत्ता परिवर्तन झाले असून, तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या पांगरीमध्ये सत्ता खेचून आणण्यात राऊत गटाला यश आले. तर जिल्हा परिषद सदस्य असलेल्या किरण मोरे यांना त्यांच्या गावातील सत्ता राखण्यात अपयश आले. तशीच परिस्थिती पंचायत समिती सदस्य इंद्रजित चिकणे व राजाभाऊ धोत्रे यांची झाली. गूळपोळी व मळेगावात या दोघांना पराभवाचे तोंड पहावे लागले़ भालगावात जिल्हा परिषद सदस्य मदन दराडे यांनी सत्ता कायम राखून गावातील वर्चस्व अबाधित राखले. राऊत गटाचे काम पाहणाऱ्या बाबासाहेब मोरे यांनी साकतमध्ये ताकत पणाला लावून बापूसाहेब घोरपडे गटाचा पराभव करून ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले आहे़

त्रिशंकूकडे सर्वांचे लक्ष

तालुक्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायती असलेल्या उपळाई आणि उपळेदूमाला या दोन्ही गावात सध्या राऊत गटाची सत्ता होती़. मात्र, या दोन्ही गावांनी स्पष्ट कौल न दिल्याने सरपंच निवडीच्यावेळीच या ठिकाणी कोणत्या गटाची सत्ता येणार हे कळणार आहे़. मात्र, उपळेदूमाला येथे तीन गटापैकी दोन गट राऊत यांचे समर्थक असल्याचे त्याठिकाणी त्यांचा सरपंच होणार हे जवळपास निश्चित आहे़

अशा झाल्या सत्ता अदलाबदल

या गावातील विद्यमान सत्ता कायम

भातंबरे, बाभुळगाव, नारी, उक्कडगाव, ढोराळे, कांदलगाव, झरेगाव, निंबळक, कळंबवाडी आ, कुसळंब, धसपिंपळगाव, घाणेगाव, नागोबाचीवाडी, बावी, महागाव, अरणगाव, कोरफळे, खांडवी, जामगाव, कासारवाडी, साकत, पांढरी, अलिपूर ,ममदापर आदी गावात राऊत गटांच्या कार्यकर्त्यांनी सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवले. तर सोपल गटाने गुळपोळी, चारे, गोरमाळे, शेळगाव आर गावात सत्ता राऊत गटाच्या ताब्यातील खेचून आणली़. कळंबावाडी पा, हिंगणी, कासारी, तडवळे, पिंपळवाडी पिंपरी आर आदी गावात सत्ता कायम ठेवली आहे. पिंपरी सा, काटेगाव, चिखर्डे या सोपल गटाची सत्ता असलेल्या गावातील सत्ता राऊत गटाने हिसकावून घेतली आहे़

---

प्रमुख तिघांची गावे बिनविरोध

तालुक्यातील सोळा ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या़. यात सोपल गटाचे प्रमुख कार्यकर्ते असलेल्या युवराज काटे यांनी खामगाव, जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत थोरात यांनी मालवंडी तर पंचायत समिती सदस्य राजाभाऊ चव्हाण यांनी मात्र गावपातळीवर तडतोडी करीत आपापल्या ग्रामपंचायती बिनविरोध केली. गावात शांतता अबाधित ठेवण्याला प्राधान्य दिले़

----