शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...
3
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
4
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
5
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
6
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
7
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
8
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
9
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
10
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
11
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
12
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
13
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
14
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
15
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
16
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
17
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
18
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
19
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
20
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

आयुष्याचा कोळसा होण्याची वेळ आली, मात्र माणुसकी धावून आली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:51 IST

मुंढेवाडीच्या रयत फाउंडेशनची कनेक्टीव्हिटी; ५० गरजूंना केली मदत अन् जागृती

ठळक मुद्देमोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथे लोणावळा येथील ७ आदिवासी कुटुंब गेल्या वर्षभरापासून कोळसा कामगार ७ कुटुंबातील ५० सदस्यांसाठी आवश्यक ते किराणा साहित्य, भाजीपाला तर दिलामदतीला माणुसकी धावून आली अन् त्यांच्या चेहºयावरचं हास्य फुलले

वडवळ : त्यांचं जगण्याचं साधन म्हणजे कोळसा..चिलारी काटेरी झुडपे तोडायची... ती जाळायची अन् कोळसा तयार करून विकायचा.. पोट भरायचं.. मात्र कोरोनाच्या विळख्यात हा कोळसा देखील अडकला.. सगळंच ठप्प झालं... आता यांच्याच जीवनाचा कोळसा होण्याची वेळ आली होती, मात्र त्यांच्या मदतीला माणुसकी धावून आली अन् त्यांच्या चेहºयावरचं हास्य फुलले ..सगळीकडे संचारबंदी असली तरी ही माणुसकी मात्र   कनेक्ट झाली...

मोहोळ तालुक्यातील मुंढेवाडी येथे लोणावळा येथील ७ आदिवासी कुटुंब गेल्या वर्षभरापासून कोळसा कामगार म्हणून कार्यरत आहेत. येथील सर्व कामे उरकून ही कुटुंबं गावाला जायच्या तयारीत होती.  तेवढ्यात या कोरोनामुळे हे सर्व कामगार या गावातच अडकून पडले.  त्यांनी तयार केलेला माल कुठे विकता येईना. त्यांचा मालक (मुकादम) ही दळणवळणाचे साधन नसल्या कारणाने मुंढेवाडी येथे येऊ शकला नाही. त्यामुळे या कामगारांची जगण्याची पंचायत झाली. ही बाब गावातील रयत फाउंडेशन कार्यकर्त्यांच्या नजरेस आली. त्यांनी तत्काळ या ७ कुटुंबातील ५० सदस्यांसाठी आवश्यक ते किराणा साहित्य, भाजीपाला तर दिलाच  मात्र या कोरोनाविषयी घ्यावयाच्या काळजीविषयी माहिती देखील दिली.

सध्या हे सर्व कुटुंबीय शेतकºयांशी संपर्क साधून त्यांचे जळण तोडून देण्याचे काम करून आपला प्रपंच चालवत आहेत. रयत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष  श्रीकांत डोंगरे, संतोष डोंगरे,सुनील व्यवहारे, राजू लिगाडे, किरण व्यवहारे, विजय व्यवहारे यांनी मात्र त्यांच्यासाठी हा मदतीचा हात दिला आहे.

अन्य मंडळीही मदतीसाठी सरसावलीतलाठी एम. एन. हकीम व मुंढेवाडी विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष व रेशन दुकानदार मोहन चौगुले यांनी स्वखर्चाने देखील प्रत्येक कुटुंबाला  दैनंदिन लागणाºया वस्तू पुरविल्या अशी कुटुंबं या ठिकाणी कायम वास्तव्यास राहण्यास नसतात त्यामुळे त्यांची रेशन कार्ड नसतात तरीही आम्ही स्वखर्चातून त्यांना जमेल ती मदत केली असल्याचे मोहन चौगुले यांनी सांगितले.

कोरोनामुळे सगळेच काही संपले असे नाही. आपण आपली माणुसकी मात्र जिवंत ठेवायला हवी. आमच्या गावातील या कुटुंबाची जमेल ती मदत आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करीत आहोत. याचे समाधान नक्कीच वेगळे आहे.- श्रीकांत डोंगरे, अध्यक्ष, रयत फाउंडेशन, मुंढेवाडी

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmohol-acमोहोळ