शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सर्वांचीच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 07:40 IST

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे.

पंढरपूर : ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता चालणाऱ्या आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पालखी मार्गांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालखी मार्ग आणि १३ विविध महामार्ग प्रकल्पांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आभासी प्रणालीद्वारे करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.  

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे. यासाठी कोणतीही कमतरता राहू देणार नाही. प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत राहू. यापूर्वी मी वारीचे स्वत: दर्शन घेतले आहे. काही वर्षांपूर्वी मी या वारीची हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली होती. विराट म्हणजे काय हे मला दिसले होते.

देहभान हरपून जाणे हे काय असते त्याचा अनुभव वारीच्या ठिकाणी येतो.  वारकरी संप्रदायाने आपल्याला  खूप काही दिले आहे. दिशा, संस्कृती दिली. प्रतिकूल कालखंडात अनेक शतके अनेक संकटे झेलून वारकरी संप्रदायाने आपली परंपरा कायम ठेवली. हे काम करण्यासाठी विठू माऊली आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. 

रेल्वे पुलाचीही सुधारणा 

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर गवत व टाइल्स बसविण्यात येणार आहेत. शिवाय वाखरी ते पंढरपूर हा रस्ताही मोठा करण्यात येणार असून, यासाठी ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याच कामात रेल्वे पुलाची सुधारणाही करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPandharpurपंढरपूर