शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची जबाबदारी सर्वांचीच- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2021 07:40 IST

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे.

पंढरपूर : ऊन, वारा, पाऊस आणि खड्ड्यांची पर्वा न करता चालणाऱ्या आपल्या वारकऱ्यांच्या मार्गातील अडथळे दूर करण्याची आपली जबाबदारी आहे. यासाठी महाराष्ट्र प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पालखी मार्गांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पालखी मार्ग आणि १३ विविध महामार्ग प्रकल्पांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आभासी प्रणालीद्वारे करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.  

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केंद्राने राज्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यास महाराष्ट्र सरकार तयार आहे. यासाठी कोणतीही कमतरता राहू देणार नाही. प्रत्येक पावलावर तुमच्यासोबत राहू. यापूर्वी मी वारीचे स्वत: दर्शन घेतले आहे. काही वर्षांपूर्वी मी या वारीची हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी केली होती. विराट म्हणजे काय हे मला दिसले होते.

देहभान हरपून जाणे हे काय असते त्याचा अनुभव वारीच्या ठिकाणी येतो.  वारकरी संप्रदायाने आपल्याला  खूप काही दिले आहे. दिशा, संस्कृती दिली. प्रतिकूल कालखंडात अनेक शतके अनेक संकटे झेलून वारकरी संप्रदायाने आपली परंपरा कायम ठेवली. हे काम करण्यासाठी विठू माऊली आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही, असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. 

रेल्वे पुलाचीही सुधारणा 

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरून चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी रस्त्यावर गवत व टाइल्स बसविण्यात येणार आहेत. शिवाय वाखरी ते पंढरपूर हा रस्ताही मोठा करण्यात येणार असून, यासाठी ७४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याच कामात रेल्वे पुलाची सुधारणाही करण्यात येणार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेPandharpurपंढरपूर