शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

सरकार गरिबांना आरक्षण देत नाही, ही मोठी शोकांतिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:22 IST

मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत ते बोलत होते. समाधान आवताडे यांच्या ...

मंगळवेढा- पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढ्यातील आयोजित सभेत ते बोलत होते. समाधान आवताडे यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांना ही उमेदवारी दिली आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे, म्हणून आम्ही आजपर्यंत अनेक आंदोलने केली; पण हे सरकार गरिबांना आरक्षण देत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. सचिन वाझेचे बोलावते धनी हे या सरकारमधीलच बडे मंत्री आहेत. त्यातील अनिल देशमुख यांनी १०० कोटींच्या वसुलीप्रकरणी राजीनामा दिला आहे. यामुळे महाराष्ट्राचे नाव जगात बदनाम होत असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकरीविरोधात घेतलेल्या निर्णयाविरोधात ही निवडणूक आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करतो म्हणणारे आज त्या विषयावर काहीच बोलत नाहीत. त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

मंगळवेढा- पंढरपूर तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आजपर्यंत या प्रश्नावर नुसती आश्वासने या जनतेने ऐकली आहेत. आता सुधारणा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या माध्यमातून अनेक गोरगरीब शेतकरी, सामान्य नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. अनेक योजना राबविल्या गेल्या आहेत.

कोरोनाच्या काळात महिला वर्गाला, शेतकऱ्यांना व बेरोजगार तरुणांना काम मिळवून देण्याची जबाबदारी मी घेत असल्याचे उमेदवार समाधान आवताडे यांनी सांगितले.

यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, अनुसूचित जाती जमाती प्रदेशाध्यक्ष माजी आ. सुधाकर भालेराव, भाजप प्रदेश सचिव अमित गोरखे, संघटक सचिव दीपक चंदनशिवे, प्रदेश महामंत्री सचिन आरडे, प्रदेश सचिव संजीव खिलारे, पंढरपूरचे माजी सभापती श्रीमंत मस्के, जिल्हा सरचिटणीस सोमनाथ भोसले, दामाजीचे उपाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरुकुल, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्र सुरवसे, संचालक सचिन शिवशरण, शहराध्यक्ष गोपाळ भगरे आदी उपस्थित होते.

‘दामाजी’तील कोणाचेही सभासदत्व रद्द होणार नाही

सध्या निवडणूक प्रचारामध्ये दामाजी कारखान्याच्या १९ हजार सभासदांचे सभासदत्व रद्द होणार असल्याचा चुकीचा प्रचार विरोधकांकडून होत आहे. तो निराधार असून, राज्य सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे जे ऊस उत्पादक शेतकरी कारखान्यांना ऊस घालणार नाहीत, ते अक्रियाशील ठरवत त्यांचे सभासदत्व रद्द करावे, असा आदेश काढला होता. त्याची अंमलबजावणी करत आम्ही फक्त कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. याचा अर्थ सभासदत्व रद्द झाले, असा होत नाही. ती आमची भूमिका नसून ती भूमिका आघाडी सरकारची असल्याची टीका समाधान आवताडे यांनी केली. सरकार सभासद कमी करण्याचा घाट घालून त्याचे खापर मात्र आल्यावर फोडण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हे आम्ही खपवून घेणार नाही. दामाजीच्या कोणत्याही सभासदाचे सभासदत्व जाणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली असल्याचा उल्लेखही समाधान आवताडे यांनी केला. विरोधकांच्या कोणत्याही भूलथापांना बळी न पडता निवडणुकीत भाजपसोबत राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

फोटो लाइन :::::::::::::::::::::::

मंगळवेढा येथे भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर.