शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

दिवाळीऐवजी शिवजयंतीला सुट्टीवर गावी येणारा सीआरपीएफ जवान घरोघरी शिकवितोय जलनीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:46 IST

सोलापूर : ‘जल है तो कल है’, हा संदेश घेऊन यंदाच्या शिवजयंतीनिमित्त खास सुटी घेऊन गावी आलेले सीआरपीएफ जवान ...

ठळक मुद्देपाणी बचाव मोहिमेची जनजागृती; कर्देहळ्ळीत घरोघरी जाऊन पत्रकाद्वारे देताहेत संदेशपाणी बचत चळवळ राबवून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करणार राजे शिवछत्रपतींच्या जलनीतीचा आधार घेत पौळ हे गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन ‘पाणी वाचवा’चाही संदेश

सोलापूर : ‘जल है तो कल है’, हा संदेश घेऊन यंदाच्या शिवजयंतीनिमित्त खास सुटी घेऊन गावी आलेले सीआरपीएफ जवान अमोल चांगदेव पौळ हे आपल्या मूळगावी (कर्देहळ्ळी) पाणी बचत चळवळ राबवून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करणार आहेत़ राजे शिवछत्रपतींच्या जलनीतीचा आधार घेत पौळ हे गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन ‘पाणी वाचवा’चाही संदेश देताना दिसत आहेत.

एका सामान्य कुटुंबात जन्मलेले अमोल पौळ यांनी २००९ मध्ये ‘सीआरपीएफ’मध्ये (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स) दाखल झाले. शालेय जीवनात त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्या विचारांनी प्रभावित झालेले पौळ यांनी दर शिवजयंतीला खास सुटी घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील मूळगावी येतात. एरव्ही सुट्या घेत नसल्याने सीआरपीएफमधील संबंधित अधिकारी त्यांना खास शिवजयंतीनिमित्त १० ते १५ दिवसांची सुटी मंजूरही करतात. यंदाही ते कर्देहळ्ळीत दाखल झाले आहेत. 

‘सीआरपीएफ’मध्ये दाखल झाल्यावर सुरुवातीचे पाच महिने त्यांनी जम्मू-काश्मीरमधील बटोर येथे ड्यूटी बजावली. सध्या ते गडचिरोलीत कार्यरत आहेत. कर्देहळ्ळीत शिवविचारांची राजमुद्रा प्रतिष्ठान कार्यरत आहे. छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजेंची जयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा जवान अमोल पौळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते आपले सहकारी बाळासाहेब पौळ, विनोद जाधव आदींच्या मदतीने पाणी बचत चळवळीला गती देत आहेत. यंदा गावात कर्तृत्ववान महिला, शिक्षकांसह मान्यवरांच्या सत्काराचे आयोजनही करण्यात आल्याचे अमोल पौळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

देशभक्ती-शिवशक्तीचा असाही संगम- अमोल पौळ यांनी २००८ मध्ये भगवा ध्वज फडकावून शिवविचारांच्या कार्याचा श्रीगणेशा केला. २००९ मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाल्यावरही त्यांच्या कार्यात कधीच खंड पडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलनीतीसह अनेक विचार आचरणात आणण्यासाठी दर शिवजयंतीला ते समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. कर्देहळ्ळीत दर शिवजयंतीच्या उपक्रमात देशभक्ती अन् शिवशक्तीचा संगम पाहावयास मिळतो.

केवळ शिवप्रतिमेला हार घालून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा छत्रपतींच्या जलनीतीद्वारे यंदा घरोघरी ‘पाणी वाचवा’चा संदेश देणार आहे. ग्रामस्थही सहकार्य करीत आहेत. -अमोल पौळ, जवान- सीआरपीएफ

सीआरपीएफमधील जवान गावात येऊन शिवजयंती साजरी करताना शिवरायांचे विचार आठवतात. आजही अमोल पौळ यांची गावाशी असलेली नाळ तुटलेली नाही.- कृष्णात पवार, सदस्य 

गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस पडला. येणाºया उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने ‘पाणी वाचवा’चा संदेश देत आहोत.- रणजित सावंत, सदस्य 

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSoldierसैनिक