शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

दिवाळीऐवजी शिवजयंतीला सुट्टीवर गावी येणारा सीआरपीएफ जवान घरोघरी शिकवितोय जलनीती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 14:46 IST

सोलापूर : ‘जल है तो कल है’, हा संदेश घेऊन यंदाच्या शिवजयंतीनिमित्त खास सुटी घेऊन गावी आलेले सीआरपीएफ जवान ...

ठळक मुद्देपाणी बचाव मोहिमेची जनजागृती; कर्देहळ्ळीत घरोघरी जाऊन पत्रकाद्वारे देताहेत संदेशपाणी बचत चळवळ राबवून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करणार राजे शिवछत्रपतींच्या जलनीतीचा आधार घेत पौळ हे गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन ‘पाणी वाचवा’चाही संदेश

सोलापूर : ‘जल है तो कल है’, हा संदेश घेऊन यंदाच्या शिवजयंतीनिमित्त खास सुटी घेऊन गावी आलेले सीआरपीएफ जवान अमोल चांगदेव पौळ हे आपल्या मूळगावी (कर्देहळ्ळी) पाणी बचत चळवळ राबवून छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखे अभिवादन करणार आहेत़ राजे शिवछत्रपतींच्या जलनीतीचा आधार घेत पौळ हे गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन ‘पाणी वाचवा’चाही संदेश देताना दिसत आहेत.

एका सामान्य कुटुंबात जन्मलेले अमोल पौळ यांनी २००९ मध्ये ‘सीआरपीएफ’मध्ये (सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स) दाखल झाले. शालेय जीवनात त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव पडला. त्या विचारांनी प्रभावित झालेले पौळ यांनी दर शिवजयंतीला खास सुटी घेऊन दक्षिण सोलापूर तालुक्यातील कर्देहळ्ळी येथील मूळगावी येतात. एरव्ही सुट्या घेत नसल्याने सीआरपीएफमधील संबंधित अधिकारी त्यांना खास शिवजयंतीनिमित्त १० ते १५ दिवसांची सुटी मंजूरही करतात. यंदाही ते कर्देहळ्ळीत दाखल झाले आहेत. 

‘सीआरपीएफ’मध्ये दाखल झाल्यावर सुरुवातीचे पाच महिने त्यांनी जम्मू-काश्मीरमधील बटोर येथे ड्यूटी बजावली. सध्या ते गडचिरोलीत कार्यरत आहेत. कर्देहळ्ळीत शिवविचारांची राजमुद्रा प्रतिष्ठान कार्यरत आहे. छत्रपती शिवाजीराजे आणि छत्रपती संभाजीराजेंची जयंती आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरी करण्याची परंपरा जवान अमोल पौळ आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवली आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून ते आपले सहकारी बाळासाहेब पौळ, विनोद जाधव आदींच्या मदतीने पाणी बचत चळवळीला गती देत आहेत. यंदा गावात कर्तृत्ववान महिला, शिक्षकांसह मान्यवरांच्या सत्काराचे आयोजनही करण्यात आल्याचे अमोल पौळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

देशभक्ती-शिवशक्तीचा असाही संगम- अमोल पौळ यांनी २००८ मध्ये भगवा ध्वज फडकावून शिवविचारांच्या कार्याचा श्रीगणेशा केला. २००९ मध्ये सीआरपीएफमध्ये दाखल झाल्यावरही त्यांच्या कार्यात कधीच खंड पडला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जलनीतीसह अनेक विचार आचरणात आणण्यासाठी दर शिवजयंतीला ते समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात. कर्देहळ्ळीत दर शिवजयंतीच्या उपक्रमात देशभक्ती अन् शिवशक्तीचा संगम पाहावयास मिळतो.

केवळ शिवप्रतिमेला हार घालून शिवजयंती साजरी करण्यापेक्षा छत्रपतींच्या जलनीतीद्वारे यंदा घरोघरी ‘पाणी वाचवा’चा संदेश देणार आहे. ग्रामस्थही सहकार्य करीत आहेत. -अमोल पौळ, जवान- सीआरपीएफ

सीआरपीएफमधील जवान गावात येऊन शिवजयंती साजरी करताना शिवरायांचे विचार आठवतात. आजही अमोल पौळ यांची गावाशी असलेली नाळ तुटलेली नाही.- कृष्णात पवार, सदस्य 

गेल्या वर्षी अत्यल्प पाऊस पडला. येणाºया उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू नये, यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने ‘पाणी वाचवा’चा संदेश देत आहोत.- रणजित सावंत, सदस्य 

टॅग्स :SolapurसोलापूरShivaji Jayanti 2018शिवजयंती २०१८Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSoldierसैनिक