शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

राज्यातील एक हजार उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर आणणार, महावितरणची माहिती

By appasaheb.patil | Updated: November 23, 2018 10:47 IST

राज्य सरकारने केली केंद्राकडे १३ हजार ७७७ कोटींची मागणी

ठळक मुद्देराज्यात २ कोटी १० लाख ग्राहकराज्यात शेतीपंपाच्या थकबाकीचा आकडा २५ हजार कोटींवर वाढत्या वीज बिल थकबाकीमुळे महावितरणचे गणित बिघडत चालले

सोलापूर : अपारंपरिक स्रोतांचा अधिकाधिक वापर व्हावा, शेतकºयांंना २४ तास वीजपुरवठा व्हावा आणि पर्यावरणाचे संतुलन साधावे, यासाठी राज्यातील १ हजार उपसा सिंचन योजनाही (लिफ्ट एरिगेशन) सौरऊर्जेवर चालविण्यात येणार आहे़ यासाठी केंद्राकडे १३ हजार ७७७ कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

सोलापूर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेस पुणे प्रादेशिकचे संचालक संजय ताकसांडे, बारामती परिमंडलाचे अभियंता पावडे, अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर उपस्थित होते.

विश्वास पाठक यावेळी म्हणाले की,  शेतकºयांना दिली जाणारी औष्णिक वीज महाग असल्याने त्यावर अनुदान द्यावे लागते. परिणामी सरकारच्या तिजोरीवर १० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडतो. अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा वापर केल्यास हे वार्षिक अनुदान कमी होईल. शेतीला लागणाºया विजेबरोबरच आता उपसा सिंचन योजनाही सौरऊर्जेवर चालविण्याचा धोरणात्मक निर्णय केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. एका उपसा सिंचन प्रकल्पाला ६० ते १०० वॅट वीज लागते. या योजना अपारंपरिक ऊर्जेवर चालविल्या तर अनुदानाच्या रूपाने सरकारच्या तिजोरीवर पडणारा भारही कमी होणार आहे. सध्या प्रायोगिक तत्त्वावर नियोजन करण्यात आले असून, येत्या तीन वर्षांत संपूर्ण राज्यातील उपसा सिंचन योजना सौरऊर्जेवर चालविण्यात येतील. 

या योजनेमुळे १२ तास सौरऊर्जा उपलब्ध होऊन वीज बिलातही उपसा सिंचन योजनांना दिलासा मिळणार आहे़ कृषी ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा व्हायला मदत व्हावी व अकृषिक ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय ग्रामज्योती योजना जाहीर केलेली आहे़ या सर्वांमुळे वीज वितरण हानी कमी करता येणार असल्याचेही पाठक यांनी सांगितले़ 

थकबाकीमुळे महावितरणचं गणित बिघडतंयराज्यात २ कोटी १० लाख ग्राहक आहेत राज्यात सातत्याने पडणाºया दुष्काळामुळे शेतकºयांची उत्पादन क्षमता कमी झाली आहे़ याशिवाय उत्पादकता कमी झाल्याने अर्थकारण बिघडले आहे़ त्यामुळे राज्यात शेतीपंपाच्या थकबाकीचा आकडा २५ हजार कोटींवर पोहोचला आहे़ अशात यावर्षी शासनाने राज्यातील बहुतांश भागात दुष्काळ जाहीर केला आहे़ यामुळे शेतीपंपाच्या वीज बिल वसुलीला स्थगिती दिली आहे़ या शेतकºयांच्या वाढत्या वीज बिल थकबाकीमुळे महावितरणचे गणित बिघडत चालले आहे़ परिणामी याचा बोजा इतर ग्राहकांवर पडत असल्याचे पाठक यांनी स्पष्ट केले. 

अ‍ॅग्रिकल्चर फिडर योजना सुरूच्शेतीला सुरळीत वीजपुरवठा, विजेची होणारी हानी टाळण्यासाठी ‘एक ट्रान्स्फार्मर... एक शेतकरी’ (एका ट्रान्स्फार्मरवरून एका शेतकºयाला वीजजोडणी) योजना महावितरणच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे़ या अ‍ॅग्रिकल्चर फिडर योजनेंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील १२ हजार शेतकºयांना येत्या चार महिन्यांत या योजनेच्या माध्यमातून वीजजोडणी देण्यात येणार आहे़ यासाठी २७६ कोटी रुपयांचे टेंडर मंजूर झाले आहे़ याचा शुभारंभ टेंभुर्णी व मोहोळ येथून गुरुवारी करण्यात आल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली़

टॅग्स :Solapurसोलापूरmahavitaranमहावितरणwater transportजलवाहतूकPower ShutdownभारनियमनGovernmentसरकारgovernment schemeसरकारी योजना