शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'भाजपामुळे मिळालेली पदं सोडा, मग खुशाल शरद पवारांचा प्रचार करा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 12:48 IST

मंत्री सुभाष देशमुख यांचा पालकमंत्री गटाला सल्ला

ठळक मुद्देसोलापूर, माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठकसोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघाच्या महत्त्वाच्या बैठकीला पालकमंत्री गटाने दांडी मारल्याने पुन्हा एकदा भाजपमधील गटबाजी समोर आली

पंढरपूर : शरद पवार यांचा प्रचार करायचा असेल तर भाजपामुळे मिळालेली पदं सोडावीत, अशा शब्दात मंत्री सुभाष देशमुख यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, झेडपी अध्यक्ष संजय शिंदे यांचे नाव न घेता टीका केली.

सोलापूर, माढा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर येथे भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आज श्रीराम मंगल कार्यालयात पार पडली़ यावेळी सोलापूर लोकसभेचे प्रभारी खा़ अमर साबळे, माढा लोकसभेचे प्रभारी अविनाश कोळी, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, शहराध्यक्ष संजय वाईकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़ 

सोलापूर आणि माढा या दोन लोकसभा मतदारसंघाच्या महत्त्वाच्या बैठकीला पालकमंत्री गटाने दांडी मारल्याने पुन्हा एकदा भाजपमधील गटबाजी समोर आली. माढ्यामधून शरद पवार आणि सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांच्या उमेदवारीची चर्चा असल्याने भाजपासाठी हे मोठे आव्हान असताना अंतर्गत गटबाजीमुळे कार्यकर्त्यांत संभ्रम निर्माण झाल्याचे दिसून आले.

पालकमंत्र्यांच्या गटाने या बैठकीकडे पाठ फिरविल्याने वैतागलेल्या सहकारमंत्र्यांनी थेट पालकमंत्री गटातील पदाधिकाºयांना इशारा दिला आहे. भाजपमध्ये आलेल्या पवारप्रेमींना जर त्यांचा प्रचार करायचा असेल तर भाजपमुळे मिळालेल्या पदांचे राजीनामे द्यावे  लागतील  असे त्यांनी सुनावले़ खासदार संसदेच्या अधिवेशनात असल्याचे तोकडे समर्थन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी करून वेळ मारून नेली.

माढ्यामधून शरद पवार निवडणूक लढविणार हे खरे असले तरी या वयात त्यांना कार्यकर्त्यांनी त्रास द्यायला नको होता, असे सांगत राज्यातील जनतेच्या आग्रहामुळे पवार माढ्यातून उभारतील असा दावाही सुभाष देशमुख यांनी केला. पवार आणि शिंदे यांच्याविरोधात भाजपच निवडणूक लढवणार आहे, असे सांगत उमेदवारीबाबत पक्ष निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखBJPभाजपाVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकPoliticsराजकारण