शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

युती होणार का या फालतू चर्चेत जात नाही, आमचा निर्णय झालाय! - उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 18:13 IST

देशातील पाच राज्यात भाजपाचा सुफडा साफ झाला असून आता ते तोंड वर काढू शकत नाहीत.

सोलापूर -  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठरल्याप्रमाणे पंढरपूर येथे जाहीर सभा घेतली. पंढरपूरच्या या मैदानात सभा घेण्याचं धाडस शिवसेनेनं दाखवलंय, असे म्हणून उद्धव यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली.  देशातील पाच राज्यात भाजपाचा सुपडा साफ झाला असून आता ते तोंड वर काढू शकत नाहीत. अयोध्येतही मी झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करायला गेलो होतो अन् पंढरपुरातही मी त्याच्यासाठीच आलो आहे. कुंभकर्णा जागा हो, अन्यथा पेटलेला हिंदू सोडणार नाही, अशा शब्दात भाजपा अन् मोदींना उद्धव ठाकरेंनी लक्ष्य केलं.  तसेच शेतकरी कर्जमाफी, राम मंदिर, मल्ल्या, नीरव मोदी, आगामी युतीसह इतरही मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे :

खास पंढरपूरसाठी विठाई बससेवेचं उद्घाटन

समोरचा गोरगरीब हाच शिवसेनेचा देव.

धनगर समाजाच्या पाठीशी शिवसेना खंबीरपणे उभी. 

कुंभकर्णाला जागं करायला मी अयोध्येत गेलो होतो. 

राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच 

जे करून दाखवतो तेच बोलतो, जे बोललो ते करून दाखवतो

सर्व जातीपातीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा देणार

राम मंदिर दिखेगा कब ?

बाबरी पाडून घेतली, बाबरीच्या मुद्दावरून गादी बळकावलीत आणि त्यावर  कुंभकर्णासारखे लोळताय ?

सोहराबुद्दीन खटल्यातील सगळे निर्दोष मुक्त झाले, मात्र बाबरी पाडणाऱ्यांविरोधातील खटले अजून सुरू आहेत

30 वर्षे होत आली, आता तुम्ही सांगता की न्यायालयात हा मुद्दा आला आहे?

हिंदू भोळा आहे, मात्र तो बावळट नाही

राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे, एनडीएतील किती पक्ष विरोधात आहे आणि किती समर्थनात आहे हे कळेल.

राम मंदिराबाबत नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांचे मत काय आहे ?

जे नितीश संघमुक्त भारत करायला निघाले होत त्यांच्या मांडीला मांडी लावून भाजप बसलंय.

नितीशकुमार आणि रामविलास यांच्यापुढे भाजपने नमतं घेतलं, चांगली गोष्ट आहे.

शेतकरी हा काही मल्ल्या, मोदी नाही.

गोरगरिबांना नाडण्याचा प्रयत्न केलात तर त्याची गाठ शिवसेनेशी आहे हे लक्षात ठेवा.

गावागावातील शिवसेनेच्या शाखा, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आधाराचे केंद्र बनेल

शिवसेना निवडणुका बाजूला ठेवून गोरगरिब, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे

पीकविम्याचे पैसे केव्हा देताय? कर्जमाफी झालेला शेतकरी कधी दाखवताय ते सांगा

मी सरकारला इशारा देतोय, कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय?

मला जागावाटपात स्वारस्य नाही, शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहिजे

काँग्रेसचं अपत्य तुम्ही का मांडीवर घेता, कशाला त्याला दूध पाजता ?

देवांच्या नावाने जुमला केलात तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही

राम मंदिराचा मुद्दा सोडणार नाही, सुटू देणारही नाही

महाराष्ट्रावरचं संकट टाळण्यासाठी पांडुरंग पाहिजे, दुष्काळ निवारणासाठी पांडुरंग पाहिजे तर मग मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडा, पांडुरंगच तिथे बसेल.

शिवसेनेचं राज्य आणणार म्हणजे, आणणारच

छत्तीसगडमधल्या लोकांनी घाण पहिले साफ केली, याला म्हणतात धाडस आणि हे धाडस मला शिवरायांच्या महाराष्ट्राकडून अपेक्षित आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेPandharpurपंढरपूर