शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस जाणायचाय तर मग पर्जन्योत्सुक व्हा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 16:10 IST

गेल्या दोन-तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभ्या केलेल्या पोराने ...

गेल्या दोन-तीन रात्रीस रोजच पाऊस पडतोय. याचं वर्णन नेमकं कसं करावं बरं? शिक्षा म्हणून आईने घराबाहेर उभ्या केलेल्या पोराने दारापाशी थांबून एकसुरात रडत राहावं आणि एकाचवेळी त्याच्यावरच्या प्रेमाने, संतापाने व्याकुळ झालेल्या आईने अधूनमधून हळूच खिडकीतून डोकावून त्याच्याकडे पाहत राहावं तसं या पावसाचं झालंय. कधीकाळी काळजावर ओरखडे ओढून हरवून गेलेली एक रात्र डोळ्यापुढून अलगद तरंगत जावी तसं या पावसाचं झालंय. प्रेमात पडल्यानंतर पहिल्यांदा भांडण झाल्यावर सख्याच्या विरहात होरपळून निघणाºया प्रियेने रात्रभर एका कुशीवर झोपून हलकेच आसवं गाळीत पडून राहावं तसं या पावसाचं झालंय. घरापासून दूर शेकडो किलोमीटर अंतरावर एकट्याने होस्टेलवर राहतानाच्या पहिल्या रात्री आई-वडिलांच्या आठवणींनी या कुशीवरून त्या कुशीवर होताना सतत स्मृतींची सय मनात दाटून येत राहावी अन् अश्रूंचे पाझर लागून राहावेत तसं या पावसाचं झालंय.

महिनाभर काबाडकष्ट करून कशीबशी सुट्टी मिळवून गावाकडे जाताना बस चुकावी अन् रात्रभर वाट बघत बसल्यावर घरातले अणुरेणू डोळ्यापुढे फेर धरून नाचत राहावेत तसे या पावसाने फेर धरलेत. मायबापापासून फारशी कधी विलग न झालेली एखादी हरीण डोळ्याची हळद ओली नवविवाहिता पहिल्यांदा माहेरी जाताना तिला प्रवासातली रात्र मोठी वाटत जाते आणि भवतालचा काजळअंधार अधिक गहिरा वाटत जातो, नकळत एक अनामिक भीती तिच्या मनात दाटून येत राहते अन् माहेरची ओढ अधिकच तीव्र होत जाते. कधी एकदा दिवस उजाडेल आणि घराच्या उंबरठ्यावर जाऊन धडकेन असं होऊन जाते तसं या रात्रभर कोसळणाºया पावसाचं झालंय. 

ज्यांचे कुणाचे छत्र नुकतेच हरवलेले असते त्यांना रात्रीचा पाऊस गुदमरून टाकतो, मेघात त्यांना मायबाप कधी दिसू लागतात अन् डोळ्यातला पाऊस कधी कोसळू लागतो काही केल्या उमगत नाही. जन्मदाते गेल्यानंतरची पहिली पाऊसरात्र कशी वाटते ते सांगता येत नाही. रात्रीच्या पावसात एका मोठ्या  वटवृक्षाखाली उभं असताना एखादी लकाकणारी वीज यावी अन् तिने अख्खं झाड आपल्यासोबत घेऊन जावं, आपण तसंच हतबल होऊन तिथंच त्यांची वाट बघत रात्रभर रडत उभं राहावं. त्यांची आठवण येत रहावी. त्यांनी ज्या करंगळीला धरून आपल्याला चालवलं तिला रात्रभर शहारे येत राहावेत, त्यांनी थोपटलेल्या पाठीवर रात्रभर काटे येत राहावेत, त्यांनी आपल्या भल्यापोटी कधी हातावर पट्ट्या मारल्या असतील त्या हातावरच्या त्या वळांनी पुन्हा उमटत जावं, आपल्याला सायकलवरून शाळेत सोडताना त्यांनी हात हलवून आपल्याला धीर देत राहावं अन् तो त्यांचा हात त्या रात्रभरच्या पावसात तरळत रहावा.

कधी आजारपण आलं तर त्यांनी रात्रभर माथ्यापाशी बसून राहावं आणि आपण डोळे भरून त्यांच्याकडे पाहत राहावं. जगाशी कधी भांडण झालं तर आपल्या पाठीशी खंबीरपणे उभं राहून आपल्याला हत्तीचे बळ देणाºया त्या जन्मदात्याने हळूच आपल्यासाठीही कधी अश्रू ढाळावेत आणि आपली चुकून त्याकडे नजर जावी. त्यांनी म्हणावं ‘काही नाही डोळ्यात जरा धूळ गेली होती रे !'. त्यांच्या या बोलण्याने आपल्या डोळ्यांना अश्रूंची धार लागावी अन् आपण आयुष्यात एकदाच त्यांच्या छातीवर डोकं टेकवून मनसोक्त रडावं तसं या पावसाचं झालंय.

आठवणींचे अनेक श्याममेघ एकत्र आणून नुसती काळीजवीणा झंकारत रहावी तसं या पावसाचं झालंय. रात्रभर कुणीतरी आपलंच पण अनामिक असं माणूस उंबरठ्यापाशी आलंय असं वाटत राहावं असं या रात्रभर दाराशी लगटून राहिलेल्या पावसाचं झालंय. त्याच्याही मनात तेच आलंय जे आपल्या मनात आलंय, त्याच्या आठवणींना उधाण आलंय कारण त्याने आपल्याला प्रतीक्षेत बरंच ताठकळवलंय ! दार उघडून बाहेर बघा त्याला तेच सांगायचेय जे तुम्हाला बोलायचेय. पाऊस तल्लीन होऊन पडतोय,  संततधार लागलेल्या या पावसाचे हे असं गारुड झालंय ! पाऊस घराबाहेर कोसळत असताना त्यांच्याही अंतरंगात रिमझिम सुरु असते. कालिदासाने रचलेल्या मेघदूताला जाणून घ्यायचं असेल तर साक्षर व्हावं लागतं; मात्र पावसाचं काळीज जाणून घ्यायचं असेल तर पर्जन्योत्सुकच व्हावं लागतं. मग त्यांचे सूक्त निसर्गच रचतो !  - समीर गायकवाड(लेखक परिवर्तनवादी चळवळीचे समर्थक आहेत) 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊस