शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम दिल्यास अभियांत्रिकी महाविद्यालयांना ऊर्जितावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:38 IST

पहिल्या फेरीअखेर निम्म्यापेक्षा अधिक जागा रिक्त

रुपेश हेळवेसोलापूर : शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्यास परवानगी दिली. पण, अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय होत नसल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. याचबरोबर शासनाकडून मागील काही वर्षांची शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांना न मिळाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थकारण बिघडले आहे. यामुळे महाविद्यालय सुरू करण्याबरोबर शिष्यवृत्तीची रक्कम लवकर मिळणे गरजेचे आहे, असे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात १४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत़  यात काही महाविद्यालये हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित आहेत तर काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठ, लोणेरे यांच्याशी संलग्नित आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्यामुळे प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. काही महाविद्यालयांत कंत्राटी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. सध्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या फेरीअखेर जवळपास २१०० जागांवर प्रवेश झाले आहेत. यात स्वेरी कॉलेजमध्ये ४४६, वालचंदमध्ये ३२३ आणि कोर्टी येथील सिंहगड महाविद्यालयात २५९ प्रवेश झालेले आहेत.

कोरोनामुळे सर्वच क्षेत्राप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही मोठा फटका बसला आहे़ विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपची रक्कम महाविद्यालयांना न मिळाल्यामुळे महाविद्यालयांवर आर्थिक ताण पडत आहे. सोबतच कोविड योद्धा विद्यार्थी आणि प्राध्यापकांना लस देऊन महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे मत प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी व्यक्त केले.

महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळत नाही. त्यांना मोबाईलवरील शिक्षणावरच समाधान मानावे लागत आहे. यामुळे मुले उत्तीर्ण होतील, पण प्रात्यक्षिक शिक्षणात अडचणी येतील. यामुळे महाविद्यालय लवकर सुरू होणे गरजेचे आहे, असे मत सिहंगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर नवले यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शैक्षणिक संस्थांमधील अर्थकारण बिघडल्याचे दृष्टीस पडते. यामधील प्रामुख्याने घटक हे संस्थाचालक, प्राध्यापक-शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी अशा अनुषंगाने या आर्थिक गणिताचा तोल सांभाळणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे हे अर्थगणित विद्यार्थ्यांची फी आणि राज्य शासनाद्वारे, विविध स्कॉलरशिपद्वारे प्राप्त होणारी रक्कम यावर अवलंबून आहे. त्यायोगे शैक्षणिक अंगाने होणारा खर्च व संस्थेमधील शिक्षक प्राध्यापक कर्मचाऱ्यांचे वेतन या गोष्टी अवलंबून आहेत. शासनाकडून मागील काही वर्षांची शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांना न मिळाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थकारण बिघडले आहे.- डॉ.नरेंद्र काटीकर, सदस्य, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाली बिनपगारी सुटीकाही महाविद्यालयांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुटी देण्यात आलेली आहे. यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच काही महाविद्यालयांनी कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देऊ शकले नाही. यामुळे आमचे कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती