शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

शासनाने शिष्यवृत्तीची रक्कम दिल्यास अभियांत्रिकी महाविद्यालयांना ऊर्जितावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 12:38 IST

पहिल्या फेरीअखेर निम्म्यापेक्षा अधिक जागा रिक्त

रुपेश हेळवेसोलापूर : शासनाने नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरवण्यास परवानगी दिली. पण, अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय होत नसल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहे. याचबरोबर शासनाकडून मागील काही वर्षांची शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांना न मिळाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थकारण बिघडले आहे. यामुळे महाविद्यालय सुरू करण्याबरोबर शिष्यवृत्तीची रक्कम लवकर मिळणे गरजेचे आहे, असे मत शिक्षण क्षेत्रातील मान्यवर व्यक्त करीत आहेत.

जिल्ह्यात १४ अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत़  यात काही महाविद्यालये हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित आहेत तर काही डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठ, लोणेरे यांच्याशी संलग्नित आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून महाविद्यालये बंद असल्यामुळे प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वेतनावर याचा मोठा परिणाम झाला आहे. काही महाविद्यालयांत कंत्राटी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले आहे. सध्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असून पहिल्या फेरीअखेर जवळपास २१०० जागांवर प्रवेश झाले आहेत. यात स्वेरी कॉलेजमध्ये ४४६, वालचंदमध्ये ३२३ आणि कोर्टी येथील सिंहगड महाविद्यालयात २५९ प्रवेश झालेले आहेत.

कोरोनामुळे सर्वच क्षेत्राप्रमाणे अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही मोठा फटका बसला आहे़ विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपची रक्कम महाविद्यालयांना न मिळाल्यामुळे महाविद्यालयांवर आर्थिक ताण पडत आहे. सोबतच कोविड योद्धा विद्यार्थी आणि प्राध्यापकांना लस देऊन महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी द्यावी, असे मत प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांनी व्यक्त केले.

महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण मिळत नाही. त्यांना मोबाईलवरील शिक्षणावरच समाधान मानावे लागत आहे. यामुळे मुले उत्तीर्ण होतील, पण प्रात्यक्षिक शिक्षणात अडचणी येतील. यामुळे महाविद्यालय लवकर सुरू होणे गरजेचे आहे, असे मत सिहंगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर नवले यांनी व्यक्त केले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच शैक्षणिक संस्थांमधील अर्थकारण बिघडल्याचे दृष्टीस पडते. यामधील प्रामुख्याने घटक हे संस्थाचालक, प्राध्यापक-शिक्षक वर्ग, कर्मचारी आणि विद्यार्थी अशा अनुषंगाने या आर्थिक गणिताचा तोल सांभाळणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे हे अर्थगणित विद्यार्थ्यांची फी आणि राज्य शासनाद्वारे, विविध स्कॉलरशिपद्वारे प्राप्त होणारी रक्कम यावर अवलंबून आहे. त्यायोगे शैक्षणिक अंगाने होणारा खर्च व संस्थेमधील शिक्षक प्राध्यापक कर्मचाऱ्यांचे वेतन या गोष्टी अवलंबून आहेत. शासनाकडून मागील काही वर्षांची शिष्यवृत्तीची रक्कम महाविद्यालयांना न मिळाल्यामुळे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे अर्थकारण बिघडले आहे.- डॉ.नरेंद्र काटीकर, सदस्य, इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन, नवी दिल्ली

कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळाली बिनपगारी सुटीकाही महाविद्यालयांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांना बिनपगारी सुटी देण्यात आलेली आहे. यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. सोबतच काही महाविद्यालयांनी कोरोनामुळे कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देऊ शकले नाही. यामुळे आमचे कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न कर्मचारी उपस्थित करीत आहेत. 

टॅग्स :Solapurसोलापूरcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणScholarshipशिष्यवृत्ती