शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माझी तर नोबॉलवरच विकेट गेली; माजी मंत्री संजय राठोड यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 10:54 IST

भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

सोलापूर : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही माझी तर नो बॉल वरच विकेट गेली. आपण निर्दोष असल्याचे सांगण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी हे वक्तव्य केले. मंत्रिमंडळातील फेरसमावेशाबाबतचा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती असल्याचे त्यांनी सांगितले.

मुळेगावतांडा (ता. द.सोलापूर) येथे दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील बंजारा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगताना माजी मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मात्र कानावर हात ठेवले. छगन भुजबळ यांचे निर्देशत्व सिद्ध झाले न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली. आपल्यावरील आरोपाबाबत काय या प्रश्नाला बगल देत मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत मात्र त्याबाबत फक्त मुख्यमंत्री बोलतील असे त्यांनी वारंवार सांगितले.

भटक्या-विमुक्तांच्या पंचवीस मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून मुख्य सचिवासोबत त्यावर चर्चा झाली आहे, लवकरच मुख्यमंत्री बैठकीची वेळ देतील असे त्यांनी सांगितले. 1872 सली इंग्रज सरकारने बंजारा समाजासह काही जातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे हा शिक्का पुसण्यासाठी भटक्या विमुक्त जातीना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा-सेना युती सरकारच्या काळात पोहरादेवी येथे िलेली आश्‍वासनांची पूर्तता होत नाही याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण राज्यभर दौरा करीत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 या मेळाव्याला माजी महापौर अलका राठोड राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्याध्यक्ष डॉ टी सी राठोड, सिनेअभिनेता सी के पवार, प्रा भोजराज पवार शैलजा राठोड पांडुरंग राठोड दगडू राठोड बाळू पवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप राठोड यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते

------------

नाईक महामंडळाला निधी नाही

अत्यंत दुरावस्थेत जगणाऱ्या बंजारासह अन्य जाती-जमातींच्या उद्धारासाठी सरकारने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली काही काळ या महामंडळाने चांगले काम केले मात्र अलीकडच्या काळात सरकारने महामंडळाला निधीची तरतूदच केली नाही. भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 

टॅग्स :SolapurसोलापूरSanjay Rathodसंजय राठोडPoliticsराजकारण