शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

माझी तर नोबॉलवरच विकेट गेली; माजी मंत्री संजय राठोड यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 10:54 IST

भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

सोलापूर : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही माझी तर नो बॉल वरच विकेट गेली. आपण निर्दोष असल्याचे सांगण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी हे वक्तव्य केले. मंत्रिमंडळातील फेरसमावेशाबाबतचा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती असल्याचे त्यांनी सांगितले.

मुळेगावतांडा (ता. द.सोलापूर) येथे दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील बंजारा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगताना माजी मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मात्र कानावर हात ठेवले. छगन भुजबळ यांचे निर्देशत्व सिद्ध झाले न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली. आपल्यावरील आरोपाबाबत काय या प्रश्नाला बगल देत मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत मात्र त्याबाबत फक्त मुख्यमंत्री बोलतील असे त्यांनी वारंवार सांगितले.

भटक्या-विमुक्तांच्या पंचवीस मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून मुख्य सचिवासोबत त्यावर चर्चा झाली आहे, लवकरच मुख्यमंत्री बैठकीची वेळ देतील असे त्यांनी सांगितले. 1872 सली इंग्रज सरकारने बंजारा समाजासह काही जातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे हा शिक्का पुसण्यासाठी भटक्या विमुक्त जातीना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा-सेना युती सरकारच्या काळात पोहरादेवी येथे िलेली आश्‍वासनांची पूर्तता होत नाही याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण राज्यभर दौरा करीत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 या मेळाव्याला माजी महापौर अलका राठोड राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्याध्यक्ष डॉ टी सी राठोड, सिनेअभिनेता सी के पवार, प्रा भोजराज पवार शैलजा राठोड पांडुरंग राठोड दगडू राठोड बाळू पवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप राठोड यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते

------------

नाईक महामंडळाला निधी नाही

अत्यंत दुरावस्थेत जगणाऱ्या बंजारासह अन्य जाती-जमातींच्या उद्धारासाठी सरकारने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली काही काळ या महामंडळाने चांगले काम केले मात्र अलीकडच्या काळात सरकारने महामंडळाला निधीची तरतूदच केली नाही. भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 

टॅग्स :SolapurसोलापूरSanjay Rathodसंजय राठोडPoliticsराजकारण