शहरं
Join us  
Trending Stories
1
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
2
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
युक्रेन युद्धादरम्यान रशियाने केली धोकादायक क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी, ‘स्टॉर्म शॅडो क्रूज’ ला रोखणे अशक्य
4
गृहकर्ज घेताय? 'या' सरकारी आणि खासगी बँका देत आहेत सर्वात स्वस्त दरात होम लोन; लगेच तपासा व्याजदर
5
"त्या वेळचे फोटो, व्हिडीओ पोलिसांनी परिवाराला दाखवले नाहीत..."; आमदार धस यांनी व्यक्त केला संशय
6
2016 चौकार...! एकदिवसीय सामन्यांत सर्वाधिक चौकार लगावणारे ७ फलंदाज, कितव्या क्रमांकावर रोहित आणि विराट?
7
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरण; गुन्हा दाखल एकीकडे, आरोपी PSI बदने हजर दुसरीकडे!
8
आता औरंगाबाद नाही, तर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन; केंद्राकडून नोटिफिकेशन जारी...
9
इंग्लंड दौऱ्यानंतर गंभीर, आगरकरने काढलं संघाबाहेर, त्याच फलंदाजाने कुटल्या १७४ धावा, केली चौकार, षटकारांची बरसात
10
Video: पाईपने स्वच्छ पाणी आणले, पीएम मोदींसाठी तयार केली खोटी यमुना; 'AAP' चा मोठा दावा
11
गुंतवणूकदारांना बंपर भेट! 'ही' आयटी कंपनी देणार प्रति शेअर १३० रुपये लाभांश; रेकॉर्ड डेट कधी? लगेच तपासा
12
“ही आत्महत्या नाही, तर संस्थात्मक हत्या आहे,” सातारा प्रकरणावर राहुल गांधींचा संताप...
13
"तो आनंदी होता, आम्ही ४० मिनिटं व्हिडीओ कॉलवर बोलला..."; लेकाच्या मृत्यूने वडिलांना धक्का
14
विमानातून उतरताच ट्रम्प यांनी धरला ठेका, ठुमके पाहून मलेशियाचे पंतप्रधानही चकित झाले; बघा Video
15
सीमेवर ‘ऑपरेशन त्रिशूल’ची तयारी; पाकिस्तानी सैन्यात खळबळ, लष्करी सरावामुळे झोप उडाली
16
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
17
Video: मोठी झाल्यावर काय बनू इच्छिते? धोनीच्या 10 वर्षीय मुलीने दिले 'हे' उत्तर, तुम्हीही कराल कौतुक
18
नोकरीनंतर फिक्स उत्पन्न हवे? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देईल दरमहा ९००० रुपये; कोण करू शकतो गुंतवणूक?
19
बिहारमध्ये तेजस्वींचा मास्टरस्ट्रोक; पंचायत प्रतिनिधींना पेन्शन, ५० लाखांचा विमा, ५ लाखांची मदत अन्...! केली घोषणांची आतशबाजी
20
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?

माझी तर नोबॉलवरच विकेट गेली; माजी मंत्री संजय राठोड यांची खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 10:54 IST

भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

सोलापूर : राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही माझी तर नो बॉल वरच विकेट गेली. आपण निर्दोष असल्याचे सांगण्यासाठी शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड यांनी हे वक्तव्य केले. मंत्रिमंडळातील फेरसमावेशाबाबतचा संपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हाती असल्याचे त्यांनी सांगितले.

मुळेगावतांडा (ता. द.सोलापूर) येथे दक्षिण सोलापूर , उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील बंजारा समाज बांधवांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. भटक्या-विमुक्तांच्या प्रश्नांसाठी राज्यभर दौरा करीत असल्याचे सांगताना माजी मंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिमंडळ प्रवेशाबाबत मात्र कानावर हात ठेवले. छगन भुजबळ यांचे निर्देशत्व सिद्ध झाले न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिली. आपल्यावरील आरोपाबाबत काय या प्रश्नाला बगल देत मंत्रिमंडळ प्रवेशाच्या चर्चा सुरू आहेत मात्र त्याबाबत फक्त मुख्यमंत्री बोलतील असे त्यांनी वारंवार सांगितले.

भटक्या-विमुक्तांच्या पंचवीस मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना दिले असून मुख्य सचिवासोबत त्यावर चर्चा झाली आहे, लवकरच मुख्यमंत्री बैठकीची वेळ देतील असे त्यांनी सांगितले. 1872 सली इंग्रज सरकारने बंजारा समाजासह काही जातीवर गुन्हेगारीचा शिक्का मारला आहे हा शिक्का पुसण्यासाठी भटक्या विमुक्त जातीना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे याकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपा-सेना युती सरकारच्या काळात पोहरादेवी येथे िलेली आश्‍वासनांची पूर्तता होत नाही याकडेही सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आपण राज्यभर दौरा करीत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 या मेळाव्याला माजी महापौर अलका राठोड राष्ट्रीय बंजारा समाजाचे कार्याध्यक्ष डॉ टी सी राठोड, सिनेअभिनेता सी के पवार, प्रा भोजराज पवार शैलजा राठोड पांडुरंग राठोड दगडू राठोड बाळू पवार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते संदीप राठोड यांनी मेळाव्याचे आयोजन केले होते

------------

नाईक महामंडळाला निधी नाही

अत्यंत दुरावस्थेत जगणाऱ्या बंजारासह अन्य जाती-जमातींच्या उद्धारासाठी सरकारने वसंतराव नाईक विकास महामंडळाची स्थापना केली काही काळ या महामंडळाने चांगले काम केले मात्र अलीकडच्या काळात सरकारने महामंडळाला निधीची तरतूदच केली नाही. भटक्या विमुक्तांचा आवाज सरकार पर्यंत पोहोचत नाही म्हणून या समाजाची केविलवाणी स्थिती होत असल्याचे संजय राठोड यांनी सांगितले

 

टॅग्स :SolapurसोलापूरSanjay Rathodसंजय राठोडPoliticsराजकारण