शहरं
Join us  
Trending Stories
1
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
11
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
12
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
13
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
14
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
15
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
16
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
17
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
18
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
19
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
20
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
Daily Top 2Weekly Top 5

पोट भरेपर्यंत दिवाळीचा फराळ खाल्ला; आता ॲसिडिटीचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 10:52 IST

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, ...

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, अबरचबर खाल्ले गेल्याने पोट खराब होण्याची शक्यता आणि अॅसिडिटीचा आजार वाढला आहे. मिठाई आणि पारंपरिक पदार्थ दिवाळीला आणखी आनंदी बनवतात. फराळाशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. मात्र हे पारंपरिक आणि तळलेले पदार्थ, मिठाई आपल्या आरोग्याचे नुकसानदेखील करतात. हे पदार्थ अॅसिडिटी, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढवतात. अॅसिडिटी झाल्यामुळे छातीत होणारी जळजळ शमवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध औषधांचा वापर अनेकजण करत असतात. मात्र अतिजास्त प्रमाणात औषधांचा वापर केल्यास मूत्रपिंडाचा आजार बळावण्याची अधिक शक्यता आहे.

---

अॅसिडिटी का होते

वेळीअवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणावामुळे अॅसिडिटी डोके वर काढू लागते. रात्री-अपरात्री, वेळी-अवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, फास्टफूड खाणे, रात्रभर जागणे या गोष्टी नव्या पिढीत पाहायला मिळतात. त्याशिवाय, बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, तेलकट खाणे, मसालेदार पदार्थ, पटपट खाणे, शिळे पदार्थ खाणे यामुळेदेखील अॅसिडिटी होते. त्यामुळे पित्ताचा आजार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञ नोंदवितात. त्याला अंशतः दारू, सिगारेट यांसारखी व्यसनेदेखील कारणीभूत ठरत आहेत.

---

तळलेले, मसालेदार पदार्थ टाळा

अति प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्यास पोटामध्ये जळजळ होणे, गॅस, अपचन, मळमळ होणे, उलटी होणे, शौचालयास त्रास होणे, लघवी करताना जळजळ होणे, मूळव्याध आणि नाकातून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती डॉक्टर सिंह यांनी दिली आहे. तिखट, मसालेदार, खारट पदार्थ खाणे टाळावे. तसेच बेसनाचे पदार्थ, बटाटे खाणे टाळावे. यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. यासाठी हलका आहार घ्यावा तसेच वरण, भात, पोळी, जेवणात तुपाचा वापर करावा. योग्य औषधोपचारासोबत केळी, डाळिंब, सफरचंद अशी फळे खावीत.

---

रोज सकाळी लिंबूपाणी घ्या

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबूपाणी घेतल्याने शरीर साफ होते, लिंबूपाणी शरीरातील पाचकरसांना उत्तेजित करते. यामुळे पाचनक्रिया सुधारते. लिंबू पाण्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सी असते. तसेच अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात, तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास लिंबूपाण्याने हा त्रास दूर होतो, लिंबूपाण्यामुळे मुखदुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते.

---

अॅसिडिटी होऊ नये म्हणून आपण जेवण आणि झोपण्याची वेळ पाळणे गरजेचे आहे. याशिवाय तेलकट, तिखट आणि मसालेदार जेवण खाण्याऐवजी साधे जेवण केल्यास अॅसिडिटीपासून बचाव करू शकतो. वेळीच आजाराचे निदान करून तातडीने औषधोपचार करून घ्यावे.

- डॉ. मनोज कोरे, जनरल फिजिशियन

---

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यDiwaliदिवाळी 2021