शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

पोट भरेपर्यंत दिवाळीचा फराळ खाल्ला; आता ॲसिडिटीचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 10:52 IST

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, ...

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, अबरचबर खाल्ले गेल्याने पोट खराब होण्याची शक्यता आणि अॅसिडिटीचा आजार वाढला आहे. मिठाई आणि पारंपरिक पदार्थ दिवाळीला आणखी आनंदी बनवतात. फराळाशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. मात्र हे पारंपरिक आणि तळलेले पदार्थ, मिठाई आपल्या आरोग्याचे नुकसानदेखील करतात. हे पदार्थ अॅसिडिटी, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढवतात. अॅसिडिटी झाल्यामुळे छातीत होणारी जळजळ शमवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध औषधांचा वापर अनेकजण करत असतात. मात्र अतिजास्त प्रमाणात औषधांचा वापर केल्यास मूत्रपिंडाचा आजार बळावण्याची अधिक शक्यता आहे.

---

अॅसिडिटी का होते

वेळीअवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणावामुळे अॅसिडिटी डोके वर काढू लागते. रात्री-अपरात्री, वेळी-अवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, फास्टफूड खाणे, रात्रभर जागणे या गोष्टी नव्या पिढीत पाहायला मिळतात. त्याशिवाय, बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, तेलकट खाणे, मसालेदार पदार्थ, पटपट खाणे, शिळे पदार्थ खाणे यामुळेदेखील अॅसिडिटी होते. त्यामुळे पित्ताचा आजार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञ नोंदवितात. त्याला अंशतः दारू, सिगारेट यांसारखी व्यसनेदेखील कारणीभूत ठरत आहेत.

---

तळलेले, मसालेदार पदार्थ टाळा

अति प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्यास पोटामध्ये जळजळ होणे, गॅस, अपचन, मळमळ होणे, उलटी होणे, शौचालयास त्रास होणे, लघवी करताना जळजळ होणे, मूळव्याध आणि नाकातून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती डॉक्टर सिंह यांनी दिली आहे. तिखट, मसालेदार, खारट पदार्थ खाणे टाळावे. तसेच बेसनाचे पदार्थ, बटाटे खाणे टाळावे. यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. यासाठी हलका आहार घ्यावा तसेच वरण, भात, पोळी, जेवणात तुपाचा वापर करावा. योग्य औषधोपचारासोबत केळी, डाळिंब, सफरचंद अशी फळे खावीत.

---

रोज सकाळी लिंबूपाणी घ्या

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबूपाणी घेतल्याने शरीर साफ होते, लिंबूपाणी शरीरातील पाचकरसांना उत्तेजित करते. यामुळे पाचनक्रिया सुधारते. लिंबू पाण्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सी असते. तसेच अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात, तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास लिंबूपाण्याने हा त्रास दूर होतो, लिंबूपाण्यामुळे मुखदुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते.

---

अॅसिडिटी होऊ नये म्हणून आपण जेवण आणि झोपण्याची वेळ पाळणे गरजेचे आहे. याशिवाय तेलकट, तिखट आणि मसालेदार जेवण खाण्याऐवजी साधे जेवण केल्यास अॅसिडिटीपासून बचाव करू शकतो. वेळीच आजाराचे निदान करून तातडीने औषधोपचार करून घ्यावे.

- डॉ. मनोज कोरे, जनरल फिजिशियन

---

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यDiwaliदिवाळी 2021