शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

पोट भरेपर्यंत दिवाळीचा फराळ खाल्ला; आता ॲसिडिटीचा त्रास वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2021 10:52 IST

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, ...

सोलापूर : या दिवाळीत लोकांनी फराळाचे यथेच्छ खायचं. मित्र-मैत्रिणींकडे जाऊन पोट भरेपर्यंत दिवाळी फराळ खाल्ला आहे. मात्र भरपूर तेलकट, अबरचबर खाल्ले गेल्याने पोट खराब होण्याची शक्यता आणि अॅसिडिटीचा आजार वाढला आहे. मिठाई आणि पारंपरिक पदार्थ दिवाळीला आणखी आनंदी बनवतात. फराळाशिवाय दिवाळीची कल्पनाच करता येत नाही. मात्र हे पारंपरिक आणि तळलेले पदार्थ, मिठाई आपल्या आरोग्याचे नुकसानदेखील करतात. हे पदार्थ अॅसिडिटी, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या वाढवतात. अॅसिडिटी झाल्यामुळे छातीत होणारी जळजळ शमवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विविध औषधांचा वापर अनेकजण करत असतात. मात्र अतिजास्त प्रमाणात औषधांचा वापर केल्यास मूत्रपिंडाचा आजार बळावण्याची अधिक शक्यता आहे.

---

अॅसिडिटी का होते

वेळीअवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, ताणतणावामुळे अॅसिडिटी डोके वर काढू लागते. रात्री-अपरात्री, वेळी-अवेळी खाणे, व्यायामाचा अभाव, फास्टफूड खाणे, रात्रभर जागणे या गोष्टी नव्या पिढीत पाहायला मिळतात. त्याशिवाय, बदलती जीवनशैली, ताणतणाव, खाण्याच्या चुकीच्या पद्धती, तेलकट खाणे, मसालेदार पदार्थ, पटपट खाणे, शिळे पदार्थ खाणे यामुळेदेखील अॅसिडिटी होते. त्यामुळे पित्ताचा आजार वाढत असल्याचे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञ नोंदवितात. त्याला अंशतः दारू, सिगारेट यांसारखी व्यसनेदेखील कारणीभूत ठरत आहेत.

---

तळलेले, मसालेदार पदार्थ टाळा

अति प्रमाणात तिखट पदार्थ खाल्ल्यास पोटामध्ये जळजळ होणे, गॅस, अपचन, मळमळ होणे, उलटी होणे, शौचालयास त्रास होणे, लघवी करताना जळजळ होणे, मूळव्याध आणि नाकातून रक्त येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, अशी माहिती डॉक्टर सिंह यांनी दिली आहे. तिखट, मसालेदार, खारट पदार्थ खाणे टाळावे. तसेच बेसनाचे पदार्थ, बटाटे खाणे टाळावे. यामुळे ॲसिडिटी होण्याची शक्यता असते. यासाठी हलका आहार घ्यावा तसेच वरण, भात, पोळी, जेवणात तुपाचा वापर करावा. योग्य औषधोपचारासोबत केळी, डाळिंब, सफरचंद अशी फळे खावीत.

---

रोज सकाळी लिंबूपाणी घ्या

सकाळी उठल्यानंतर एक ग्लास लिंबूपाणी घेतल्याने शरीर साफ होते, लिंबूपाणी शरीरातील पाचकरसांना उत्तेजित करते. यामुळे पाचनक्रिया सुधारते. लिंबू पाण्यात मोठ्या प्रमाणावर व्हिटामीन सी असते. तसेच अनेक अँटी ऑक्सिंडट गुणही असतात. यामुळे त्वचेवरील डाग निघून जातात, तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास लिंबूपाण्याने हा त्रास दूर होतो, लिंबूपाण्यामुळे मुखदुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते.

---

अॅसिडिटी होऊ नये म्हणून आपण जेवण आणि झोपण्याची वेळ पाळणे गरजेचे आहे. याशिवाय तेलकट, तिखट आणि मसालेदार जेवण खाण्याऐवजी साधे जेवण केल्यास अॅसिडिटीपासून बचाव करू शकतो. वेळीच आजाराचे निदान करून तातडीने औषधोपचार करून घ्यावे.

- डॉ. मनोज कोरे, जनरल फिजिशियन

---

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यDiwaliदिवाळी 2021