शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

राग येतोय, काय करायला हवं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 2:04 PM

रागाचे चांगल्यारीतीने व्यवस्थापन करता येते व न रागावता देखील आपण आपले जीवन जगू शकतो.

बºयाचदा ‘मी फार रागीट आहे!’ ‘मला फार लवकर राग येतो, त्या परिस्थितीत मी रागवायचं नव्हतं तर काय करायचं होतं?’ ‘मी रागवू नको तर काय करू?. रागावल्याशिवाय माझे कामच होत नाही’ यासारखी वाक्यं बोलून प्रत्येक जण आपल्याला येत असलेल्या रागाचे समर्थन करीत असतो. रागाने आपलेच नुकसान होणार आहे व राग हा शरीरास हानिकारक आहे, हे एखाद्या वेळेस माहीत असूनसुद्धा तो रागाचे बोट सोडण्यास तयार होत नाही. रागाचे चांगल्यारीतीने व्यवस्थापन करता येते व न रागावता देखील आपण आपले जीवन जगू शकतो. ते कसे साध्य करावयाचे हे आपण बघणार आहोत.

प्रथमत: माणसाला राग का येतो?. त्या मागची कारणीमीमांसा जर आपण नीट समजून घेतली तर त्याचे व्यवस्थापन करणे आपल्याला सहज सोपे जाऊ शकेल. माणसाला राग पुढील काही कारणांमुळे येतो. एकतर माणसाला जसे हवे असते तसे जेव्हा घडत नाही तेव्हा त्यास राग येतो. दुसरे आपण इतर लोकांबद्दल आपल्या मनात एक प्रतिमा बनवलेली असते. इतरांनी कसे असले पाहिजे?. त्यांनी आपल्याशी कसे वागले पाहिजे?. पण प्रत्यक्षात लोकांचे आपल्याशी वागणे, आपल्याशी असलेला त्यांचा व्यवहार हा आपण आपल्या मनात तयार केलेल्या प्रतिमेशी मेळ घालत नाही.

जेव्हा असे घडते तेव्हा आपण अस्वस्थ होतो व आपणास राग येतो आणि तिसरे म्हणजे आपल्या संबंधित असलेल्या व्यक्ती जेव्हा आपल्या इच्छेनुसार वागत नाहीत तेव्हा आपल्याला राग येतो. याशिवाय मागील काही अप्रिय घटनांबद्दल आपल्या मनात चाललेलं द्वंद्व, इतरांना बदलण्यासाठी चाललेल्या प्रयत्नात जेव्हा अपयश येते तेव्हा आपल्याला राग येतो. इतरांना खूश करण्यासाठी एखादी गोष्ट आपण आपल्या मनाविरुद्ध करतो तेव्हा देखील आपल्याला राग येतो.

आपण राग येण्याची कारणे बघितली. आता याचे व्यवस्थापन कसे करावयाचे व रागापासून स्वत:ची कशी सुटका करून घ्यावयाची हे पाहूया. सर्वप्रथम आपल्याला हे मान्य करायला हवे की, मला राग येतो व ही एक घातक सवय आहे. राग हा एक नकारात्मक विचार आहे की, जो आपली मन:शांती भंग करतो व आपल्या आरोग्यास तो अपायकारक आहे. हे मान्य केल्याशिवाय आपल्याला त्यापासून सुटका करून घेता येणार नाही. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा हे तपासले पाहिजे की राग कोणाला येतोय? त्यामुळे कोणाचे नुकसान होत आहे? जे नुकसान होत आहे त्याची भरपाई कोणाला द्यावी लागणार आहे? याचा जर आपण बारकाईने विचार केला तर त्याचे उत्तर येईल,‘आपण स्वत:! किती वेळा आपण स्वत:चे नुकसान करून घेणार आहोत? राग ही एक चुकीची सवय आहे व ती प्रयत्न केल्याने बदलता येते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. राग न येण्यासाठी आपल्याला एकच करावे लागेल कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जसं की इतरांनी वेळेवर यावे, मला फोन करावा, माझ्याशी प्रेमानेच वागावे, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात इ. काही घटनांमध्ये आपण म्हणतो, माझ्याकडे रागावण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे राग हा एक नकारात्मक विचार आहे व तो करावयाचा की नाही, हे सर्वस्वी माझ्या हातात आहे. राग हा माझ्या शरीराला हानिकारक आहे तरी मी तो करतोय म्हणजेच मीच माझ्या शरीराची हानी करून घेतोय. हे चुकीचे आहे, हे एकदा लक्षात आले की, आपण रागावणे सोडून देऊ.आपण रागाला स्वाभाविक किंवा नैसर्गिक समजतो. जे की चुकीचे आहे. आपण या जगात इतरांना कायम खूश ठेवण्यासाठी आलेलो नाहीत, हे लक्षात घ्या. या बाबी लक्षात घेतल्यानंतर मला खात्री आहे की, आपण राग करत असाल तर ते करणे सोडून द्याल. जीवनात शांती व आनंद प्रस्थापित कराल, तर मग चला राग करणे सोडूया, आनंद देऊया व आनंद घेऊया.- महेश भा. रायखेलकर(लेखक हे संगणक प्रशिक्षक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया