शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

राग येतोय, काय करायला हवं ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 14:04 IST

रागाचे चांगल्यारीतीने व्यवस्थापन करता येते व न रागावता देखील आपण आपले जीवन जगू शकतो.

बºयाचदा ‘मी फार रागीट आहे!’ ‘मला फार लवकर राग येतो, त्या परिस्थितीत मी रागवायचं नव्हतं तर काय करायचं होतं?’ ‘मी रागवू नको तर काय करू?. रागावल्याशिवाय माझे कामच होत नाही’ यासारखी वाक्यं बोलून प्रत्येक जण आपल्याला येत असलेल्या रागाचे समर्थन करीत असतो. रागाने आपलेच नुकसान होणार आहे व राग हा शरीरास हानिकारक आहे, हे एखाद्या वेळेस माहीत असूनसुद्धा तो रागाचे बोट सोडण्यास तयार होत नाही. रागाचे चांगल्यारीतीने व्यवस्थापन करता येते व न रागावता देखील आपण आपले जीवन जगू शकतो. ते कसे साध्य करावयाचे हे आपण बघणार आहोत.

प्रथमत: माणसाला राग का येतो?. त्या मागची कारणीमीमांसा जर आपण नीट समजून घेतली तर त्याचे व्यवस्थापन करणे आपल्याला सहज सोपे जाऊ शकेल. माणसाला राग पुढील काही कारणांमुळे येतो. एकतर माणसाला जसे हवे असते तसे जेव्हा घडत नाही तेव्हा त्यास राग येतो. दुसरे आपण इतर लोकांबद्दल आपल्या मनात एक प्रतिमा बनवलेली असते. इतरांनी कसे असले पाहिजे?. त्यांनी आपल्याशी कसे वागले पाहिजे?. पण प्रत्यक्षात लोकांचे आपल्याशी वागणे, आपल्याशी असलेला त्यांचा व्यवहार हा आपण आपल्या मनात तयार केलेल्या प्रतिमेशी मेळ घालत नाही.

जेव्हा असे घडते तेव्हा आपण अस्वस्थ होतो व आपणास राग येतो आणि तिसरे म्हणजे आपल्या संबंधित असलेल्या व्यक्ती जेव्हा आपल्या इच्छेनुसार वागत नाहीत तेव्हा आपल्याला राग येतो. याशिवाय मागील काही अप्रिय घटनांबद्दल आपल्या मनात चाललेलं द्वंद्व, इतरांना बदलण्यासाठी चाललेल्या प्रयत्नात जेव्हा अपयश येते तेव्हा आपल्याला राग येतो. इतरांना खूश करण्यासाठी एखादी गोष्ट आपण आपल्या मनाविरुद्ध करतो तेव्हा देखील आपल्याला राग येतो.

आपण राग येण्याची कारणे बघितली. आता याचे व्यवस्थापन कसे करावयाचे व रागापासून स्वत:ची कशी सुटका करून घ्यावयाची हे पाहूया. सर्वप्रथम आपल्याला हे मान्य करायला हवे की, मला राग येतो व ही एक घातक सवय आहे. राग हा एक नकारात्मक विचार आहे की, जो आपली मन:शांती भंग करतो व आपल्या आरोग्यास तो अपायकारक आहे. हे मान्य केल्याशिवाय आपल्याला त्यापासून सुटका करून घेता येणार नाही. जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा हे तपासले पाहिजे की राग कोणाला येतोय? त्यामुळे कोणाचे नुकसान होत आहे? जे नुकसान होत आहे त्याची भरपाई कोणाला द्यावी लागणार आहे? याचा जर आपण बारकाईने विचार केला तर त्याचे उत्तर येईल,‘आपण स्वत:! किती वेळा आपण स्वत:चे नुकसान करून घेणार आहोत? राग ही एक चुकीची सवय आहे व ती प्रयत्न केल्याने बदलता येते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. राग न येण्यासाठी आपल्याला एकच करावे लागेल कोणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका. जसं की इतरांनी वेळेवर यावे, मला फोन करावा, माझ्याशी प्रेमानेच वागावे, वस्तू जागच्या जागी ठेवाव्यात इ. काही घटनांमध्ये आपण म्हणतो, माझ्याकडे रागावण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. तेव्हा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे राग हा एक नकारात्मक विचार आहे व तो करावयाचा की नाही, हे सर्वस्वी माझ्या हातात आहे. राग हा माझ्या शरीराला हानिकारक आहे तरी मी तो करतोय म्हणजेच मीच माझ्या शरीराची हानी करून घेतोय. हे चुकीचे आहे, हे एकदा लक्षात आले की, आपण रागावणे सोडून देऊ.आपण रागाला स्वाभाविक किंवा नैसर्गिक समजतो. जे की चुकीचे आहे. आपण या जगात इतरांना कायम खूश ठेवण्यासाठी आलेलो नाहीत, हे लक्षात घ्या. या बाबी लक्षात घेतल्यानंतर मला खात्री आहे की, आपण राग करत असाल तर ते करणे सोडून द्याल. जीवनात शांती व आनंद प्रस्थापित कराल, तर मग चला राग करणे सोडूया, आनंद देऊया व आनंद घेऊया.- महेश भा. रायखेलकर(लेखक हे संगणक प्रशिक्षक आहेत)

टॅग्स :SolapurसोलापूरSocialसामाजिकSocial Mediaसोशल मीडिया