शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

माणूसकी; तुळशीचा रिक्षाचालक देतोय मुंबईकरांसाठी अहोरात्र विनामूल्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:43 IST

असंही सामाजिक ऋण: कोरोना व्हायरसमुळे  लॉकडाऊनमध्ये जीवाची पर्वा नाही

ठळक मुद्देरुपेश रेपाळ यांच्या या विशेष कामगिरीबद्दल राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांचे कौतुक केलेत्यांचा आम्हाला गर्व आहे असे तुळशी गावचे सरपंच दिगंबर माळी व उपसरपंच डॉ. शरद मोरे यांनी यावेळी सांगितले

लक्ष्मण कांबळे कुर्डूवाडी : कोरोनाच्या महामारीनं अख्खं जग होरपळत आहे. मुंबई, पुण्याचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तुळशीच्या (ता. माढा) रिक्षाचालकाने मात्र दिवसरात्र आपल्या जीवाची परवा न करता शेकडो रुग्णांना मोफत सेवा देण्याचे व्रत अवलंबले आहे. रुपेश रेपाळ असं या देवदूत रिक्षाचालकाचं नाव आहे.

मूळचे माढा तालुक्यातील तुळशी गावचे असणारे रुपेश रेपाळ हे आपल्या उपजीविकेसाठी मुंबईत काही वर्षांपूर्वी गेले होते आणि ते तिथेच स्थायिक झाले आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे मूळचे ग्रामीण भागातील असणारे पण मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात काही कामानिमित्त स्थायिक झालेले हजारो नागरिक देश व राज्यावर कोरोनाचे संकट आले की पहिले शहर सोडून गावाकडे निघून आले आहेत. पण रेपाळ यांनी गावाकडे आपल्या नातेवाईकांना व मित्रांना फोन करून सांगितले की मी गावाकडे आलो असतो पण लॉकडाऊनमुळे मुंबईत संपूर्ण वाहने बंद असल्याने अनेक मोठ्या आजारांच्या रुग्णांना कुठंही दवाखान्यात जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत आणि त्या माझ्या  डोळ्यासमोर दिसत आहेत. त्यामुळे  आपल्याकडून मातृभूमीची सेवा कशी होईल या प्रश्नाने मला अस्वस्थ झाले होते म्हणून मी मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी असणाºया  कर्मचाºयांसाठी व रुग्णांना आपल्या रिक्षातून मोफत सेवा देण्याचे ठरवून सेवा करीत आहे.

यामध्येही पहिल्यांदा रुपेश रेपाळ यांनाही इच्छा असूनही मुंबईत लॉकडाऊनमुळे रिक्षा रस्त्यावर चालवता येत नसल्याने त्यांना अडचण निर्माण झाली होती. मग एकदा याबाबत आरटीओ अधिकाºयांना तरी भेटून येऊ असे मनाशी ठरवून रेपाळ कल्याणच्या आरटीओच्या कार्यालयात गेले. त्यावेळी तेथील आरटीओ अधिकाºयांनीही रेपाळ यांचा हेतू चांगला असून त्यांना ‘आपत्कालीन सुविधा’ असे विशेष परमिट देऊ केले आणि त्यामुळे रेपाळ यांचा सेवा करण्याचा संकल्प सिद्धीस गेला. त्यामुळे विनामूल्य सेवा देणारी  रिक्षा म्हणून त्यांची सेवा सुरू झाली. पण कोणाकडून काही मागायचे नसले तरीही रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रिक्षामध्ये इंधन तर भरावेच लागणार होते. त्यातच या काळात आधीच व्यवसाय नसल्याने घरात पैसा नाही, कुटुंबीय देखील त्यामुळे हैराण झाले आहेत. पण तरीही ते संकल्पावर ठाम होते. म्हणून त्यांची ही सेवा देण्याची तळमळ बघून तेथील नगरसेवक मुकुंद पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते अमित कासार यांनी त्यांना इंधनासाठी निधी देण्याचे मान्य केले. त्यामुळे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे एका महिन्यापासून म्हात्रेनगरमध्ये पेडणेकरांच्या कार्यालयासमोर त्यांचा थांबा असतो व तेथूनच अहोरात्र सेवा त्यांची सुरू आहे. 

लॉकडाऊन संपेपर्यंत विनामूल्य सेवारुग्णांची वेळ घेऊन ते त्या वेळेत उपलब्ध होतात. आणखी जेवढे दिवस लॉकडाऊन असेल तेवढे सगळे दिवस विनामूल्य सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. या रुग्ण सेवेदरम्यान रस्त्यात जर कोणी पोलीस, नर्स, वाटसरु जरी अडकला असेल तर त्यांनाही ते सुविधा देतात. आतापर्यंत त्यांनी जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई, मुलुंड, घाटकोपर, कल्याण, डोंबिवली शहरभर सर्वत्र अशी सेवा दिली आहे.यामध्ये जास्तीत जास्त करुन डायलीसीसचे रुग्ण असल्याचे ते सांगतात.

आदित्य ठाकरेंकडून कौतुकरुपेश रेपाळ यांच्या या विशेष कामगिरीबद्दल राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांचे कौतुक केले आहे. यामुळे तुळशी गावचे नाव रोशन झाले आहे, त्यांचा आम्हाला गर्व आहे असे तुळशी गावचे सरपंच दिगंबर माळी व उपसरपंच डॉ. शरद मोरे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस