शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

माणूसकी; तुळशीचा रिक्षाचालक देतोय मुंबईकरांसाठी अहोरात्र विनामूल्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 15:43 IST

असंही सामाजिक ऋण: कोरोना व्हायरसमुळे  लॉकडाऊनमध्ये जीवाची पर्वा नाही

ठळक मुद्देरुपेश रेपाळ यांच्या या विशेष कामगिरीबद्दल राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांचे कौतुक केलेत्यांचा आम्हाला गर्व आहे असे तुळशी गावचे सरपंच दिगंबर माळी व उपसरपंच डॉ. शरद मोरे यांनी यावेळी सांगितले

लक्ष्मण कांबळे कुर्डूवाडी : कोरोनाच्या महामारीनं अख्खं जग होरपळत आहे. मुंबई, पुण्याचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. अशावेळी मुंबईत वास्तव्यास असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील तुळशीच्या (ता. माढा) रिक्षाचालकाने मात्र दिवसरात्र आपल्या जीवाची परवा न करता शेकडो रुग्णांना मोफत सेवा देण्याचे व्रत अवलंबले आहे. रुपेश रेपाळ असं या देवदूत रिक्षाचालकाचं नाव आहे.

मूळचे माढा तालुक्यातील तुळशी गावचे असणारे रुपेश रेपाळ हे आपल्या उपजीविकेसाठी मुंबईत काही वर्षांपूर्वी गेले होते आणि ते तिथेच स्थायिक झाले आहेत. सध्या कोरोना व्हायरसमुळे मूळचे ग्रामीण भागातील असणारे पण मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरात काही कामानिमित्त स्थायिक झालेले हजारो नागरिक देश व राज्यावर कोरोनाचे संकट आले की पहिले शहर सोडून गावाकडे निघून आले आहेत. पण रेपाळ यांनी गावाकडे आपल्या नातेवाईकांना व मित्रांना फोन करून सांगितले की मी गावाकडे आलो असतो पण लॉकडाऊनमुळे मुंबईत संपूर्ण वाहने बंद असल्याने अनेक मोठ्या आजारांच्या रुग्णांना कुठंही दवाखान्यात जाता येत नाही. त्यामुळे त्यांना मरण यातना सहन कराव्या लागत आहेत आणि त्या माझ्या  डोळ्यासमोर दिसत आहेत. त्यामुळे  आपल्याकडून मातृभूमीची सेवा कशी होईल या प्रश्नाने मला अस्वस्थ झाले होते म्हणून मी मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी असणाºया  कर्मचाºयांसाठी व रुग्णांना आपल्या रिक्षातून मोफत सेवा देण्याचे ठरवून सेवा करीत आहे.

यामध्येही पहिल्यांदा रुपेश रेपाळ यांनाही इच्छा असूनही मुंबईत लॉकडाऊनमुळे रिक्षा रस्त्यावर चालवता येत नसल्याने त्यांना अडचण निर्माण झाली होती. मग एकदा याबाबत आरटीओ अधिकाºयांना तरी भेटून येऊ असे मनाशी ठरवून रेपाळ कल्याणच्या आरटीओच्या कार्यालयात गेले. त्यावेळी तेथील आरटीओ अधिकाºयांनीही रेपाळ यांचा हेतू चांगला असून त्यांना ‘आपत्कालीन सुविधा’ असे विशेष परमिट देऊ केले आणि त्यामुळे रेपाळ यांचा सेवा करण्याचा संकल्प सिद्धीस गेला. त्यामुळे विनामूल्य सेवा देणारी  रिक्षा म्हणून त्यांची सेवा सुरू झाली. पण कोणाकडून काही मागायचे नसले तरीही रुग्णांना घेऊन जाण्यासाठी रिक्षामध्ये इंधन तर भरावेच लागणार होते. त्यातच या काळात आधीच व्यवसाय नसल्याने घरात पैसा नाही, कुटुंबीय देखील त्यामुळे हैराण झाले आहेत. पण तरीही ते संकल्पावर ठाम होते. म्हणून त्यांची ही सेवा देण्याची तळमळ बघून तेथील नगरसेवक मुकुंद पेडणेकर व सामाजिक कार्यकर्ते अमित कासार यांनी त्यांना इंधनासाठी निधी देण्याचे मान्य केले. त्यामुळे लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळापासून म्हणजे एका महिन्यापासून म्हात्रेनगरमध्ये पेडणेकरांच्या कार्यालयासमोर त्यांचा थांबा असतो व तेथूनच अहोरात्र सेवा त्यांची सुरू आहे. 

लॉकडाऊन संपेपर्यंत विनामूल्य सेवारुग्णांची वेळ घेऊन ते त्या वेळेत उपलब्ध होतात. आणखी जेवढे दिवस लॉकडाऊन असेल तेवढे सगळे दिवस विनामूल्य सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. या रुग्ण सेवेदरम्यान रस्त्यात जर कोणी पोलीस, नर्स, वाटसरु जरी अडकला असेल तर त्यांनाही ते सुविधा देतात. आतापर्यंत त्यांनी जोगेश्वरी, बोरीवली, मुंबई, मुलुंड, घाटकोपर, कल्याण, डोंबिवली शहरभर सर्वत्र अशी सेवा दिली आहे.यामध्ये जास्तीत जास्त करुन डायलीसीसचे रुग्ण असल्याचे ते सांगतात.

आदित्य ठाकरेंकडून कौतुकरुपेश रेपाळ यांच्या या विशेष कामगिरीबद्दल राज्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनीही मोबाईलद्वारे संपर्क साधून त्यांचे कौतुक केले आहे. यामुळे तुळशी गावचे नाव रोशन झाले आहे, त्यांचा आम्हाला गर्व आहे असे तुळशी गावचे सरपंच दिगंबर माळी व उपसरपंच डॉ. शरद मोरे यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस