शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
2
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
3
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
4
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
5
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
6
Video: महादेव बनलेल्या तरुणाचा सगळ्यांसमोरच गेला जीव; शोभायात्रेतील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप
8
८ कोटींच्या पॅकेजची नोकरी अवघ्या ५ महिन्यात सोडली; IIT मुंबईतील पदवीधर युवकानं का घेतला निर्णय?
9
Koyel Bar : अभिमानास्पद! लेकीने वेटलिफ्टर बनून पूर्ण केलं वडिलांचं मोठं स्वप्न; जिंकले २ गोल्ड मेडल
10
घटस्फोटाच्या चर्चा, चतुर्थीला नववधूसारखी नटली ही अभिनेत्री, एकटीनेच केली बाप्पाची पूजा
11
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ
12
विमाधारकांनो सावधान! पॉलिसी घेताना 'ही' चूक पडेल महागात! क्लेमचा एक पैसाही मिळणार नाही!
13
प्रेमासाठी ओलांडल्या धर्माच्या सीमा; रुखसाना-रूबी, जास्मिन झाली चांदणी, लग्नाची तुफान चर्चा
14
पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमय; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर
15
"फॅक्ट्री, घर, दागिने गहाण... लाखोंचं कर्ज पण कुटुंबाने केला नाही सपोर्ट"; सचिनने मांडली व्यथा
16
"मी तुझ्या पतीची दुसरी बायको..."; फोनवरून इतकंच ऐकताच महिलेने आईच्या मांडीवर सोडला जीव
17
श्री गणेशा! नव्या इनिंगची नवी सुरुवात अन् पृथ्वी-आकृती यांच्यातील नात्यातील नवा बंध
18
डोक्यावर पदर घेत पार्थ पवारांसोबत लालबागच्या राजाचं दर्शन घेणारी 'ही' बॉलिवूड अभिनेत्री कोण?
19
Bal Karve: 'गुंड्याभाऊ' काळाच्या पडद्याआड! ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं ९५ व्या वर्षी निधन
20
 "…तर तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल", मनोज जरांगे पाटलांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

अक्कलकोटमधील बागायतदारांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:21 IST

अतिवृष्टीचा फटका; अक्कलकोट तालुक्यात ५०० हेक्टरवर फळपिकांचे नुकसान

ठळक मुद्देअक्कलकोट तालुक्यात नागणसूर, जेऊर, तडवळ, दुधनी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्रफळद्राक्ष बागायतदारांची संघटना असून, एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मजूर पुरवठा करण्याचे काम करतातफवारणीवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची सल आता शेतकºयांना आहे

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : मागील १५ दिवसांपासून सतत होणाºया पावसामुळे तालुक्यातील फळपिके आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ दुष्काळसदृश स्थितीत पाणीटंचाई असतानाही टँकरने पाणीपुरवठा करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग जगविली़ आज अक्कलकोट तालुक्यातील शेतकºयांच्या तोंडचा घास अतिवृष्टीने हिरावला आहे़ तालुक्यात ५०० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़ या नैसर्गिक संकटाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.

द्राक्ष म्हटलं की सर्वप्रकारच्या पिकांमधील नाजूक फळपीक. या पिकाकडे सर्वसामान्य शेतकरी शक्यतो वळत नाही. कारण खर्चिक पीक म्हणून याकडे पाहिले जाते. अलीकडच्या काळात शासनाकडून फळपिकांबाबत शेतकºयांना प्रोत्साहन मिळाल्याने द्राक्ष, डाळिंब या पिकांच्या क्षेत्रफळात मोठी वाढ झाली़ एखादे वर्ष वगळता अचानक रोगराई पसरण्याचे प्रकार घडत आहेत़ मात्र औषध फवारणी केल्याबरोबर तत्काळ सुधारणा होत असे. यंदा मात्र नेमके सर्वकाही उलटं होत आहे.

दरवर्षी औषधाच्या खर्चात तिपटीने वाढ होत आहे़ २४ सप्टेंबरपर्यंत म्हणावा तसा पाऊस झाला नाही़ द्राक्षाच्या काडीची वाढ व्यवस्थित झाली नाही. एकंदरीत द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, लिंबू यासह वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, बटाटे अशाप्रकारे ५०० हेक्टरवरील बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

आता मजुरांचा तुटवडा - गतवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे बागा जगवताना बागायतदारांना नाकीनऊ आले होते. दरम्यान, पावसाळ्यात पाऊस झाला नाही़ १० आॅक्टोबर २०१९ पूर्वी छाटणी केलेल्या बागावर दावणी, करपा यासारख्या रोगांचा प्रसार झाला आहे़ यामुळे हातातून बागा जाण्याच्या भीतीने महागडी औषध फवारणी केली आहे तसेच ज्यांनी १६ व १७ आॅक्टोबरदरम्यान बागांची छाटणी केली आहे त्यांच्या बागेवर मोठ्या प्रमाणात दावणी, करपा रोग फैलावला आहे. रोग पसरल्यानंतर तत्काळ आटोक्यात आणावे लागते. त्यासाठी मजुरांची फार मोठी गरज भासते. नेमके ते मिळत नाहीत. कमतरतेमुळे वेळेवर कामे होत नाहीत़ याचाही फटका शेतकºयांना बसला आहे.

फवारणीदेखील वाया...- रोज सायंकाळी पाऊस होत असल्याने रात्रभर द्राक्षाची पाने ओलसरपणा धरतात़ त्यात भर म्हणून सकाळी दव व धुके पडत आहेत़ द्राक्षावर मारण्यात आलेल्या औषधांचा फारसा परिणाम झालेला नाही़ फवारणीवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची सल आता शेतकºयांना आहे़ 

तडवळ, नागणसूर, जेऊर भागात सर्वाधिक बागायती- अक्कलकोट तालुक्यात नागणसूर, जेऊर, तडवळ, दुधनी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्रफळ आहे. अनेक वेळा मजुरांअभावी कामे वेळेत होत नाहीत. द्राक्ष बागायतदारांची संघटना असून, एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मजूर पुरवठा करण्याचे काम करतात़ यंदा मात्र मजूर मिळत नाहीत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसakkalkot-acअक्कलकोट