शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
2
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
3
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
4
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
5
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
6
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
7
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
8
तारीख ठरली, वेळ बदलली? 'या' दिवशी सुरु होणार 'बिग बॉस मराठी ६'; पाहा प्रोमो
9
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
10
खोकला, घशात खवखव; मुंबईकरांचे आरोग्य बिघडले; वातावरणातील बदलामुळे रुग्ण संख्येत मोठी वाढ
11
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
12
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
13
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
14
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
15
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
16
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
17
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
18
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
19
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
20
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोटमधील बागायतदारांचे कंबरडे मोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 15:21 IST

अतिवृष्टीचा फटका; अक्कलकोट तालुक्यात ५०० हेक्टरवर फळपिकांचे नुकसान

ठळक मुद्देअक्कलकोट तालुक्यात नागणसूर, जेऊर, तडवळ, दुधनी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्रफळद्राक्ष बागायतदारांची संघटना असून, एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मजूर पुरवठा करण्याचे काम करतातफवारणीवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची सल आता शेतकºयांना आहे

शिवानंद फुलारी

अक्कलकोट : मागील १५ दिवसांपासून सतत होणाºया पावसामुळे तालुक्यातील फळपिके आणि भाजीपाल्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ दुष्काळसदृश स्थितीत पाणीटंचाई असतानाही टँकरने पाणीपुरवठा करुन तळहाताच्या फोडाप्रमाणे बाग जगविली़ आज अक्कलकोट तालुक्यातील शेतकºयांच्या तोंडचा घास अतिवृष्टीने हिरावला आहे़ तालुक्यात ५०० हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे़ या नैसर्गिक संकटाने शेतकºयांचे कंबरडेच मोडले आहे.

द्राक्ष म्हटलं की सर्वप्रकारच्या पिकांमधील नाजूक फळपीक. या पिकाकडे सर्वसामान्य शेतकरी शक्यतो वळत नाही. कारण खर्चिक पीक म्हणून याकडे पाहिले जाते. अलीकडच्या काळात शासनाकडून फळपिकांबाबत शेतकºयांना प्रोत्साहन मिळाल्याने द्राक्ष, डाळिंब या पिकांच्या क्षेत्रफळात मोठी वाढ झाली़ एखादे वर्ष वगळता अचानक रोगराई पसरण्याचे प्रकार घडत आहेत़ मात्र औषध फवारणी केल्याबरोबर तत्काळ सुधारणा होत असे. यंदा मात्र नेमके सर्वकाही उलटं होत आहे.

दरवर्षी औषधाच्या खर्चात तिपटीने वाढ होत आहे़ २४ सप्टेंबरपर्यंत म्हणावा तसा पाऊस झाला नाही़ द्राक्षाच्या काडीची वाढ व्यवस्थित झाली नाही. एकंदरीत द्राक्ष, डाळिंब, सीताफळ, चिक्कू, लिंबू यासह वांगी, टोमॅटो, ढोबळी मिरची, बटाटे अशाप्रकारे ५०० हेक्टरवरील बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

आता मजुरांचा तुटवडा - गतवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे बागा जगवताना बागायतदारांना नाकीनऊ आले होते. दरम्यान, पावसाळ्यात पाऊस झाला नाही़ १० आॅक्टोबर २०१९ पूर्वी छाटणी केलेल्या बागावर दावणी, करपा यासारख्या रोगांचा प्रसार झाला आहे़ यामुळे हातातून बागा जाण्याच्या भीतीने महागडी औषध फवारणी केली आहे तसेच ज्यांनी १६ व १७ आॅक्टोबरदरम्यान बागांची छाटणी केली आहे त्यांच्या बागेवर मोठ्या प्रमाणात दावणी, करपा रोग फैलावला आहे. रोग पसरल्यानंतर तत्काळ आटोक्यात आणावे लागते. त्यासाठी मजुरांची फार मोठी गरज भासते. नेमके ते मिळत नाहीत. कमतरतेमुळे वेळेवर कामे होत नाहीत़ याचाही फटका शेतकºयांना बसला आहे.

फवारणीदेखील वाया...- रोज सायंकाळी पाऊस होत असल्याने रात्रभर द्राक्षाची पाने ओलसरपणा धरतात़ त्यात भर म्हणून सकाळी दव व धुके पडत आहेत़ द्राक्षावर मारण्यात आलेल्या औषधांचा फारसा परिणाम झालेला नाही़ फवारणीवर खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेल्याची सल आता शेतकºयांना आहे़ 

तडवळ, नागणसूर, जेऊर भागात सर्वाधिक बागायती- अक्कलकोट तालुक्यात नागणसूर, जेऊर, तडवळ, दुधनी या भागात सर्वाधिक द्राक्षाचे क्षेत्रफळ आहे. अनेक वेळा मजुरांअभावी कामे वेळेत होत नाहीत. द्राक्ष बागायतदारांची संघटना असून, एकमेकांमध्ये समन्वय ठेवून मजूर पुरवठा करण्याचे काम करतात़ यंदा मात्र मजूर मिळत नाहीत़ 

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊसakkalkot-acअक्कलकोट