शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

'शिवसेना-भाजपाच्या एकतर्फी प्रेमात कुणाचाही 'ऑनर किलींग' होणार नाही'

By राजा माने | Updated: December 24, 2018 17:33 IST

कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती होणारच, असे भाजपा नेते ठामपणे सांगत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहांपासून ते आपणापर्यंत सर्वच भाजपा नेते सेना-भाजपा युतीचे संकेत देत आहेत.

राजा माने

सोलापूर - कुठल्याही परिस्थितीत शिवसेनेशी युती होणारच, असे भाजपा नेते ठामपणे सांगत आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहांपासून ते आपणापर्यंत सर्वच भाजपा नेते सेना-भाजपा युतीचे संकेत देत आहेत. मात्र, शिवसेना याबाबतीत गंभीर नसून भाजपाचे ते एकतर्फी प्रेम असल्याचे सांगते. त्यामुळे या प्रेमात ऑनर किलींग कोणाचा होईल, की हे प्रेम सफल होणारंय ? असा प्रश्न महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला होता. त्यावर बोलताना, यामध्ये कुणाचाही ऑनर किलींग होणार नाही, असं पाटील यांनी स्पष्ट केलंय.

आगामी निवडणुकांसाठी भाजप आणि शिवसेना युतीबाबत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील  यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना, भारतीय जनता पार्टी मजबूत असून त्यात कील होण्याचा प्रश्नच नाही, असे पाटील यांनी म्हटलं. पुढ बोलताना ते म्हणाले की, मुलगा मोठा झाला की आईला बघत नाही म्हणून आई त्याच्यावरील प्रेम कमी करत नाही. जर, मुलगा म्हटलेलं शिवसेनेला आवडत नसेल तर दोन भावांचंही उदाहरण देता येईल. आता, आमच्या घरात तीन मांजरं आहेत, त्यातली दोन मांजरं एका आईची आहेत. त्यातलं तिसरं मांजर आहे  ते दुसरीचं. मग, त्या दोघा मांजरांच एकमेकांवर खूप प्रेमय, पण तिसरीशी नाही. तसं, सर्वच राजकीय पक्ष आमचे मित्र असावेत, असंही काही नाही. मात्र, हे आमचे सख्खे भाऊ आहेत, त्यामुळे त्यांच आमच्यावर जरा जास्त प्रेम आहे. आमच्या दोघांच्याही रक्तात हिंदुत्व आहे, त्यामुळे ते कसेही वागू आम्ही शेवटपर्यंत हेच म्हणणार. तसेच, यापूर्वी 2014 मध्ये आम्ही वेगळे लढलो, म्हणून काय आमचा पाया ढिसूळ झाला का, असा प्रतिप्रश्नही चंद्रकांत पाटील यांनी केला. आम्ही दोन खासदारांपासून ते सत्ताधारीपर्यंत मजल मारल्याचेही त्यांनी आवर्जुन सांगितले. 

दरम्यान, शिवसेनेनं उचलून धरलेल्या राम मंदिर मुद्द्याबाबत उत्तर देताना पाटील म्हणाले,  राम मंदिर हा ना भाजपाचा मुद्दा आहे, ना संघाचा, ना शिवसेनेचा. राम मंदिर हा देशातील प्रत्येक हिंदूचा मुद्दा आहे. या देशावर प्रेम करणाऱ्या, या मातीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा, मग तो मुस्लीम का असेना. त्यामुळे  शिवसेनेनं हा मुद्दा उचलून धरला तर त्यात बिघडलं काय, शेवटी कुणाच्याही कोंबड्यानं का हुईना, सूर्य उगवला म्हणजे झालं, अशा शब्दात पाटील  यांनी शिवसेनेनं उचलून धरलेल्या राम मंदिराच्या प्रश्नावर उत्तर दिलं.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाSolapurसोलापूर