शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

माणसाची अन् समाजाच्या काळजीसाठी होम क्वारंटाईन...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 13:42 IST

चौदाशेव्या शतकात प्लेगची साथ जोरावर असताना असे 'क्वारंटाईन' केले जाई.

‘क्वारंटाईन’ हा   शब्द मुळातच इटालियन, फ्रेंच आणि लॅटिन भाषेत आपले उगमस्थान दर्शिवतो. ‘क्वारंटाईन’ या शब्दाचा  शब्दश: अर्थ चाळीस दिवस असा होतो . या शब्दाचा वापर संसर्गजन्य रोगाची लागण झाल्याची शक्यता तपासण्यासाठी निरोगी किंवा लागण झालेल्या माणसाला इतरांपासून चाळीस दिवस वेगळे ठेवणे या अर्थाने केला जाऊ लागला. जेणेकरून त्याच्या हालचालीमुळे इतरांना त्या रोगाची लागण होणार नाही. चौदाशेव्या शतकात प्लेगची साथ जोरावर असताना असे 'क्वारंटाईन' केले जाई.

सध्या देश- परदेश जहाजावर काम करणाºया लोकांना समुद्राच्या संपर्कात खूप दिवस राहिल्यामुळे एखादा संसर्ग तर झाला नाही ना? हे तपासण्यासाठी ‘क्वारंटाईन’ केले जाते. त्या माणसाची आणि समाजाची काळजी घेण्यासाठी .

साथीचे रोग आणि ‘क्वारंटाईन’ हा शब्द यांचा निकटचा संबंध आहे. ‘नोवेल कोविड १९’ या विषाणू ने  जगभर थैमान घातले आहे. यावर कोणताही वैद्यकीय  कायम स्वरुपी इलाज नसल्यामुळे सर्व सरकारांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करा आणि स्वत:चे व इतरांचे प्राण वाचवा असे आवाहन केले आहे. आम्हा बहुतांश जनतेला सरकारचे आवाहन म्हणजे सरकारने जनतेवर केलेला जुलूम वाटत आहे. खरे तर सरकारपेक्षा जास्त आपण आपली काळजी घेणे हे सुसंस्कृत पणाचे लक्षण आहे. हे लक्षण च आपण साक्षरते कडून सुशिक्षित होण्याकडे प्रवाहित झालो आहोत याचे प्रमाण आहे.

काही जण आनंदाने सरकारच्या सूचनेचे पालन करत आहेत.त्याला प्रतिसाद देत आहेत. काहीजण व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली पोलिसांचा प्रसाद खात आहेत. ही परिस्थिती कोंडी न समजता संधी समजली पाहिजे.स्वत:ला शोधण्याची आणि नव्याने पुन्हा एकदा स्वत:ची ओळख करून घेण्याची.शाळा,महाविद्यालय,नोकरी,व्यवसाय,जवाबदारी,कर्तव्य आणि वैयक्तिक दिसलेले आयुष्य जगण्यात स्वत्व हरवले आहे. बºयाचदा शोधायला गेले की सापडत नाही. नाही सापडले की शोधायला वेळ मिळत नाही.पुन्हा जीवनगाणे सुरू होते तेच ते, नको ते आणि हवे ते मिळवण्याची स्पर्धा करणारे.जीवन म्हणजे एक आनंद यात्रा आहे.ती एक अनुभव शाळा आहे.मनसोक्त पण सामाजिक भान ठेवून जगण्याची.

काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी सोडून द्यावे लागले आहे हे आता तरी मान्य करायलाच पाहिजे. निसर्ग सर्वात बलवान आहे.नियतीच्या अधीन राहून जगाचे नियमन करणारी यंत्रणा म्हणजे निसर्गच... मागील शेकडो वर्षात माणसाला  स्वत:चे पुनरावलोकन करण्याची संधी क्वचितच उपलब्ध झाली होती. अनिवार्य पद्धतीने ही संधी अख्ख्या जगाला निसगार्ने उपलब्ध करून दिली आहे.संधी प्रत्येकाच्या आयुष्यात येते आणि जाते.कुणाला ती दिसते तर कुणाला दिसत नाही. मग संधीचे सोने आणि संधीची माती हे परिणाम पुढे येतात नेहमीसाठी.

चला आपण ह्या संधीचे घरी बसून सोने करू या. आयुष्यात जे हरवले आहे त्याचा शोध घेवू या; जे चुकले आहे ते बरोबर करू या; जे अर्धवट आहे ते पूर्ण करू या;जे बिघडले आहे ते दुरुस्त करू या...

उभ्या जन्मात अशी संधी,असा निवांत वेळ पुन्हा येणे नाही स्वत:ला शोधण्यासाठी. विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्यासाठी रुसलेल्या नात्याना शोधायला, हरवलेल्या छंदाला जोपासायला आणि माणूस म्हणून जगायला दुसरा जन्म मिळणार नाही म्हणून प्लीज असे म्हणून तर बघा होम क्वारंटाईन म्हणून तर होईल सगळे फाईन...- सुनील शेळगावकर

 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस