शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

महामार्गांच्या कामातून मिळेल सोलापूरच्या विकासाला चालना : पालकमंत्री विजय देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2018 1:11 PM

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त एम.बी.तांबडे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु, ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण पोलीस दलाच्या विविध पथकांनी संचलनाद्वारे मानवंदना दिलीपोलीस अधिकारी, कर्मचारी, गुणवंत तलाठी यांचा सत्कार

सोलापूर : राष्ट्रीय महामार्गाच्या विकास आणि चौपदरीकरणातून सोलापूरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास पालकमंत्री विजय देशमुख यांनी येथे व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंड येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी पोलीस आयुक्त एम.बी.तांबडे, प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, पोलीस अधीक्षक वीरेश प्रभु, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी   डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, पोलीस उपायुक्त नामदेव चव्हाण आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या आजच्या 58 व्या वर्धापनदिनानिमित्त पोलीस परेड ग्राऊंडवर ध्वजारोहण आणि संचलनाचा कार्यक्रम झाला. यावेळी पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. पोलीस दलाच्या विविध पथकांनी संचलनाद्वारे मानवंदना दिली. त्याचबरोबर पोलीस महासंचालक पदक मिळालेले पोलीस अधिकारी, कर्मचारी, गुणवंत तलाठी यांचा सत्कार करण्यात आला.

पालकमंत्री देशमुख म्हणाले, सोलापूर- सांगली, सोलापूर- विजापूर, सोलापूर- तुळजापूर याचबरोबर जिल्ह्यातून जाणारे पालखी मागार्चे चौपदरीकरण केले जाणार आहे. या रस्त्यांना राष्ट्रीय महामागार्चा दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्यांच्या विकासामुळे सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. सोलापूरचा विविध शहरांशी जलद संपर्क झाल्यामूळे व्यापार, उद्योग याचबरोबर जिल्ह्यातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल.

जिल्ह्यात मुद्रा बँक योजनेतून 1022 कोटी रुपयांचे कर्ज वितरण करुन राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या माध्यमातून जिल्ह्यात नवउद्योजक घडतील, असा विश्वास व्यक्त करुन पालकमंत्री देशमुख म्हणाले, जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतून एक लाख आठ हजार  शेतक-यांना 561 कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत आहे. जिल्ह्याने यंदाही राज्यात प्रथम क्रमांक पटकावला पाहिजे.

जिल्हा परिषद विविध योजनांच्या माध्यमातून विकास विषयक चांगले काम करीत आहे. विशेषत: आरोग्याच्या क्षेत्रात जिल्हा परिषदेने केलेले काम उल्लेखनीय आहे. स्वच्छ भारत योजनेची प्रभावी अंमलबजावणी करुन जिल्हा परिषदेने नवा पॅटर्न विकसित केला आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात 300 किलोमीटरवर रस्ते तयार होतील. यामुळे गावांचा शहरांशी असणारा संपर्क वाढेल, असेही देशमुख म्हणाले.

यावेळी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी, जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले तर मध्यवर्ती इमारत येथे तहसिलदार अमित माळी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

टॅग्स :SolapurसोलापूरMaharashtra Dayमहाराष्ट्र दिनVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय