शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
2
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
3
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
5
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
6
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
7
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
8
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
9
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
10
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
11
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
12
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?
13
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
14
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
15
Anna Hazare: पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
16
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
17
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
18
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
19
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
20
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी

अहो ऐकलं का; बिस्किटाचा नाही पत्ता अन् शाळेच्या खाऊत डाळी मिळताहेत पोतेभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 15:52 IST

शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू; विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर लगेच शाळा सुरू झाल्या; परंतु विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा पत्ता नाही. याविषयी ओरड सुरू झाल्यावर कोरोना काळातील ७ महिन्यांच्या हरभरा व मूग डाळीचे वाटप सुरू झाले आहे. दिवसाप्रमाणे वजनाचे हिशोब घालून विद्यार्थ्याकडे सुपूर्द केलेली ही डाळ नेण्यासाठी पालकांना घरून पोती आणावी लागत आहेत. आता नऊ महिन्यांचा तांदूळ येणार असून, यासाठीही पालकांना पोती शोधावी लागणार आहेत.

कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पोषण आहाराची खिचडी शिजली नाही. साथीच्या उपाययोजनेमुळे आहाराचे वाटपही करता येत नव्हते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विद्यार्थ्यांना ज्वारी, नाचणी, बाजरीची पौष्टिक बिस्कीटे वाटण्याचा निर्णय झाला. यानुसार काही ठिकाणी ही बिस्किटे पाठविण्यात आली. पण सोलापूर शहरातील शाळा यापासून वंचित राहिल्या. तिसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू झाल्या. पोषण आहार व गणवेशासाठी पालकांची ओरड सुरू झाली. पोषण आहार वाटपाला सुरुवात झाली; परंतु बिस्किटाऐवजी पूर्वीप्रमाणे कोरडा आहार देण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात शाळांना हरभरा व मूगडाळ पोहोच करण्यात आली आहे. सात महिन्यांचे प्रमाण घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला डाळीचे वाटप शाळा-शाळांमधून सुरू झाले आहे.

पालक येतात पोते घेऊन

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे प्रमाण ठरलेले आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ४ किलो डाळ द्यायची आहे. पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ६ किलो डाळ द्यायची आहे. सात महिन्यांचा हिशेब केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला २८ ते ४२ किलो डाळ मिळत आहे. त्यामुळे इतकी डाळ घरी नेण्यासाठी पालकांना पोतेच घेऊन यावे लागत आहे.

९ महिन्यांचे तांदूळ मिळणार

पहिल्या टप्प्यात डाळ वाटण्यात येत आहे. त्यामुळे शाळांच्या वर्गखोल्यांना गोदामांचे स्वरूप आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ९ महिन्यांचे तांदूळ वाटपासाठी देण्यात येणार आहेत. महिन्याला दोन ते चार किलोप्रमाणे १८ ते ३६ किलो तांदूळ वाटप करायचा आहे. वजन करून प्रतिविद्यार्थी धान्य वाटपाची जबाबदारी शिक्षकांवर आल्याने शाळांमध्ये दिवसभर रेशन दुकानासारखे चित्र दिसत आहे.

 

गणवेश मिळाला नाहीच

समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुली व मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेशासाठी प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे जिल्हा परिषदेने अनुदान वाटप केले आहे. शालेय समितीने हे गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप करायचे आहेत. बऱ्याच शाळांनी ही प्रक्रिया पार पाडली नसल्याची पालकांची तक्रार आहे.

-------------

असे आहेत लाभार्थी

  • एकूण मुली : १०३४८१
  • मागासवर्गीय मुले : २११८१
  • दारिद्र्यरेषेखालील मुले : २४४०२

-------------

पोषण आहार अंतर्गत १५३ दिवसांच्या डाळीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानंतर तांदळाचे वितरण केले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बिस्कीट वाटपाचा निर्णय झाला होता. आता संसर्ग कमी झाल्याने धान्य वाटप करण्यात येत आहे. ९ मार्चपासून शाळेत आहार देण्यात येईल.

- डॉ. किरण लोहार, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षण