शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

अहो ऐकलं का; बिस्किटाचा नाही पत्ता अन् शाळेच्या खाऊत डाळी मिळताहेत पोतेभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 15:52 IST

शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू; विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर लगेच शाळा सुरू झाल्या; परंतु विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा पत्ता नाही. याविषयी ओरड सुरू झाल्यावर कोरोना काळातील ७ महिन्यांच्या हरभरा व मूग डाळीचे वाटप सुरू झाले आहे. दिवसाप्रमाणे वजनाचे हिशोब घालून विद्यार्थ्याकडे सुपूर्द केलेली ही डाळ नेण्यासाठी पालकांना घरून पोती आणावी लागत आहेत. आता नऊ महिन्यांचा तांदूळ येणार असून, यासाठीही पालकांना पोती शोधावी लागणार आहेत.

कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पोषण आहाराची खिचडी शिजली नाही. साथीच्या उपाययोजनेमुळे आहाराचे वाटपही करता येत नव्हते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विद्यार्थ्यांना ज्वारी, नाचणी, बाजरीची पौष्टिक बिस्कीटे वाटण्याचा निर्णय झाला. यानुसार काही ठिकाणी ही बिस्किटे पाठविण्यात आली. पण सोलापूर शहरातील शाळा यापासून वंचित राहिल्या. तिसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू झाल्या. पोषण आहार व गणवेशासाठी पालकांची ओरड सुरू झाली. पोषण आहार वाटपाला सुरुवात झाली; परंतु बिस्किटाऐवजी पूर्वीप्रमाणे कोरडा आहार देण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात शाळांना हरभरा व मूगडाळ पोहोच करण्यात आली आहे. सात महिन्यांचे प्रमाण घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला डाळीचे वाटप शाळा-शाळांमधून सुरू झाले आहे.

पालक येतात पोते घेऊन

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे प्रमाण ठरलेले आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ४ किलो डाळ द्यायची आहे. पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ६ किलो डाळ द्यायची आहे. सात महिन्यांचा हिशेब केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला २८ ते ४२ किलो डाळ मिळत आहे. त्यामुळे इतकी डाळ घरी नेण्यासाठी पालकांना पोतेच घेऊन यावे लागत आहे.

९ महिन्यांचे तांदूळ मिळणार

पहिल्या टप्प्यात डाळ वाटण्यात येत आहे. त्यामुळे शाळांच्या वर्गखोल्यांना गोदामांचे स्वरूप आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ९ महिन्यांचे तांदूळ वाटपासाठी देण्यात येणार आहेत. महिन्याला दोन ते चार किलोप्रमाणे १८ ते ३६ किलो तांदूळ वाटप करायचा आहे. वजन करून प्रतिविद्यार्थी धान्य वाटपाची जबाबदारी शिक्षकांवर आल्याने शाळांमध्ये दिवसभर रेशन दुकानासारखे चित्र दिसत आहे.

 

गणवेश मिळाला नाहीच

समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुली व मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेशासाठी प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे जिल्हा परिषदेने अनुदान वाटप केले आहे. शालेय समितीने हे गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप करायचे आहेत. बऱ्याच शाळांनी ही प्रक्रिया पार पाडली नसल्याची पालकांची तक्रार आहे.

-------------

असे आहेत लाभार्थी

  • एकूण मुली : १०३४८१
  • मागासवर्गीय मुले : २११८१
  • दारिद्र्यरेषेखालील मुले : २४४०२

-------------

पोषण आहार अंतर्गत १५३ दिवसांच्या डाळीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानंतर तांदळाचे वितरण केले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बिस्कीट वाटपाचा निर्णय झाला होता. आता संसर्ग कमी झाल्याने धान्य वाटप करण्यात येत आहे. ९ मार्चपासून शाळेत आहार देण्यात येईल.

- डॉ. किरण लोहार, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षण