शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

अहो ऐकलं का; बिस्किटाचा नाही पत्ता अन् शाळेच्या खाऊत डाळी मिळताहेत पोतेभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 15:52 IST

शालेय पोषण आहाराचे वाटप सुरू; विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा

सोलापूर : कोरोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर लगेच शाळा सुरू झाल्या; परंतु विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचा पत्ता नाही. याविषयी ओरड सुरू झाल्यावर कोरोना काळातील ७ महिन्यांच्या हरभरा व मूग डाळीचे वाटप सुरू झाले आहे. दिवसाप्रमाणे वजनाचे हिशोब घालून विद्यार्थ्याकडे सुपूर्द केलेली ही डाळ नेण्यासाठी पालकांना घरून पोती आणावी लागत आहेत. आता नऊ महिन्यांचा तांदूळ येणार असून, यासाठीही पालकांना पोती शोधावी लागणार आहेत.

कोरोनामुळे यंदाच्या शैक्षणिक सत्रात शाळा सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे सलग दुसऱ्या वर्षी पोषण आहाराची खिचडी शिजली नाही. साथीच्या उपाययोजनेमुळे आहाराचे वाटपही करता येत नव्हते. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर विद्यार्थ्यांना ज्वारी, नाचणी, बाजरीची पौष्टिक बिस्कीटे वाटण्याचा निर्णय झाला. यानुसार काही ठिकाणी ही बिस्किटे पाठविण्यात आली. पण सोलापूर शहरातील शाळा यापासून वंचित राहिल्या. तिसरी लाट ओसरल्यानंतर शाळा सुरू झाल्या. पोषण आहार व गणवेशासाठी पालकांची ओरड सुरू झाली. पोषण आहार वाटपाला सुरुवात झाली; परंतु बिस्किटाऐवजी पूर्वीप्रमाणे कोरडा आहार देण्याचे नियाेजन करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात शाळांना हरभरा व मूगडाळ पोहोच करण्यात आली आहे. सात महिन्यांचे प्रमाण घेऊन प्रत्येक विद्यार्थ्यांला डाळीचे वाटप शाळा-शाळांमधून सुरू झाले आहे.

पालक येतात पोते घेऊन

विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराचे प्रमाण ठरलेले आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ४ किलो डाळ द्यायची आहे. पाचवी ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रतिमहिना ६ किलो डाळ द्यायची आहे. सात महिन्यांचा हिशेब केल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला २८ ते ४२ किलो डाळ मिळत आहे. त्यामुळे इतकी डाळ घरी नेण्यासाठी पालकांना पोतेच घेऊन यावे लागत आहे.

९ महिन्यांचे तांदूळ मिळणार

पहिल्या टप्प्यात डाळ वाटण्यात येत आहे. त्यामुळे शाळांच्या वर्गखोल्यांना गोदामांचे स्वरूप आले आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ९ महिन्यांचे तांदूळ वाटपासाठी देण्यात येणार आहेत. महिन्याला दोन ते चार किलोप्रमाणे १८ ते ३६ किलो तांदूळ वाटप करायचा आहे. वजन करून प्रतिविद्यार्थी धान्य वाटपाची जबाबदारी शिक्षकांवर आल्याने शाळांमध्ये दिवसभर रेशन दुकानासारखे चित्र दिसत आहे.

 

गणवेश मिळाला नाहीच

समग्र शिक्षा अंतर्गत शासकीय शाळांमधील पहिली ते आठवीत शिकणाऱ्या मुली व मागासवर्गीय, दारिद्र्यरेषेखालील मुलांना मोफत गणवेशासाठी प्रत्येकी ३०० रुपयांप्रमाणे जिल्हा परिषदेने अनुदान वाटप केले आहे. शालेय समितीने हे गणवेश खरेदी करून विद्यार्थ्यांना वाटप करायचे आहेत. बऱ्याच शाळांनी ही प्रक्रिया पार पाडली नसल्याची पालकांची तक्रार आहे.

-------------

असे आहेत लाभार्थी

  • एकूण मुली : १०३४८१
  • मागासवर्गीय मुले : २११८१
  • दारिद्र्यरेषेखालील मुले : २४४०२

-------------

पोषण आहार अंतर्गत १५३ दिवसांच्या डाळीचे वाटप करण्यात येत आहे. त्यानंतर तांदळाचे वितरण केले जाणार आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी बिस्कीट वाटपाचा निर्णय झाला होता. आता संसर्ग कमी झाल्याने धान्य वाटप करण्यात येत आहे. ९ मार्चपासून शाळेत आहार देण्यात येईल.

- डॉ. किरण लोहार, शिक्षणाधिकारी

 

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाEducationशिक्षण