शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सोलापुरातील शहरातील हेरिटेज विहिरी भग्नावशेषाच्या गाळात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 13:18 IST

रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : यंदा झालेला अत्यल्प पाऊस... अजून हिवाळ्याचा हंगाम जायच्या आधीच निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईचे संकट... ऐन ...

ठळक मुद्देमहापालिकेच्या ताब्यात असलेल्या ८ विहिरी तर खासगी मालकांच्या ५ विहिरींचीच नोंदकिरीटेश्वर मठातील विहिरीतील गाळ स्वखर्चाने काढला हेरिटेज विहिरी भग्नावशेषाच्या गाळात अडकल्या

रेवणसिद्ध जवळेकर

सोलापूर : यंदा झालेला अत्यल्प पाऊस... अजून हिवाळ्याचा हंगाम जायच्या आधीच निर्माण होत असलेल्या पाणीटंचाईचे संकट... ऐन उन्हाळ्यात या संकटावर मात करण्यासाठी असलेल्या विहिरींचा पुरेपूर वापर करुन घेण्यासाठी उपाययोजना होत नाहीत. याविषयी मंगळवारी ‘लोकमत’ चमूने आॅन दी स्पॉट रिपोर्टिंग केल्यावर या विहिरींना ‘फिश टँक’चे स्वरूप आल्याचे नजरेत भरले. या हेरिटेज विहिरी भग्नावशेषाच्या गाळात अडकल्या आहेत. 

८ आॅगस्ट १९९२ रोजी सोलापूर शहराची हद्दवाढ झाली. शहरालगतची मजरेवाडी, सोरेगाव, देगाव, बसवेश्वरनगर, केगाव, बाळे, शेळगी आदी गावे शहरात समाविष्ट झाली. हद्दवाढ भागातील या गावांमध्ये कुठे एक तर कुठे दोन विहिरी आढळून आल्या. दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी चमू होटगी रोडवरील हत्तुरे वस्तीत (मजरेवाडी) पोहोचला. तेथील भल्यामोठ्या विहिरीत भरपूर पाणी दिसले; मात्र कचरा साचल्याने पाणीच दिसत नव्हते. तेथील एका रहिवाशाला बोलते केले असता त्याने ‘केवळ गणेशोत्सवात मूर्तींचे विसर्जन करण्यापुरतीच ही विहीर आहे’ असे सांगितले. 

तेथून हाकेच्या अंतरावर मजरेवाडी गावातील (कुत्रवाडी) विहिरीनेही आमचे लक्ष वेधून घेतले. येथे काही महिला धुणी धुवत होत्या. महापालिकेने विहिरीवर फिल्टर यंत्रणा बसवली तर उन्हाळ्यात त्या पाण्याचा चांगला उपयोग होत असल्याची प्रतिक्रिया ताकमोगे वस्तीतील बाळासाहेब ताकमोगे यांच्याकडून ऐकावयास मिळाली. होटगी रोडवरीलच कोळगिरी नगरातील जुनी विहीरही शेवटची घटिका मोजत आहे. 

दुपारी साडेबारा वाजता रेल्वे लाईन परिसरातील पंखा बावडी (विहीर) येथे चमू दाखल झाला. ब्रिटिश काळातील या विहिरीची बांधणी (बांधकाम) आजही मजबूत असल्याचे दिसून आले. त्यावेळी विहिरीतील पाण्याचा उपसा करताना पंख्याचा वापर होत होता. त्यामुळे पंखा विहीर म्हणून ती प्रसिद्ध आहे. सभोवताली वाढलेले गवत अन् आत पडलेल्या कचºयामुळे ही विहीर आता नावालाच राहिली आहे. चौकोनी आकारात असलेल्या याच विहिरीलगत दुसरी गोल विहीरही त्याच अवस्थेत असल्याचे आमच्या नजरेत भरले. दुपारी अडीच ते पावणेतीन दरम्यान केलेल्या आॅन दी स्पॉट रिपोर्टिंगवेळी अनेक विहिरी बुजलेल्या दिसल्या. आत्महत्येचे घडलेले प्रकार पाहता या विहिरी बुजविण्यात आल्याचे काहींनी सांगितले. 

गंगा विहिरीतील ‘गंगा’ घरापर्यंत- दुपारी १ वाजून १० मिनिटांनी नवीपेठेतील गंगा विहिरीजवळ आलो. विहिरीला कुठेही धक्का न बसता त्यावर बांधकाम झाल्याचे दिसले. अगदी ५ बाय ५ फूट जागेत त्या विहिरीतील आजही पाणी उपसा केले जाते. महापालिकेच्या ताब्यातील या एकमेव विहिरीतील सांडपाण्याचा उपयोग नवीपेठ, चौपाड, काळी मस्जिद, पत्रा तालीम आदी भागातील नागरिकांसाठी होत असल्याचे तेथील विक्रेते मिथुन यादव यांच्याकडून समजले. 

किरीटेश्वर मठातील विहिरीतील गाळ स्वखर्चाने काढला !- दुपारी दीड वाजता चमू कुंभारवेस येथील श्री किरीटेश्वर मठात पोहोचला. या मठाच्या परिसरात दोन विहिरी पाहावयास मिळाल्या. त्यापैकी एक विहीर मठ संस्थानच्या वापरात आहे. अन्य कामासाठी या विहिरीतील पाण्याचा वापर होतो. मठाधिपती म. नि. प्र. स्वामीनाथ स्वामी यांच्या पाणीचळवळीचा उद्देशही समजला. याच मठातील दुसरी विहीर आज जी जिवंत आहे, ती केवळ तेथील जागरुक युवकांमुळेच. या भागातील रासपचे शहराध्यक्ष अशोक कोळेकर हे भेटले. दीड-दोन वर्षांपूर्वी युवकांनी लोकवर्गणीतून जमा झालेल्या १२ हजार रुपयांमध्ये विहिरीतील गाळ काढल्याचे त्यांनी सांगितले. 

विहिरी अधिग्रहण योजना रखडली- काही वर्षांपूर्वी महापालिकेने ८ विहिरी अधिग्रहण करण्याचा विचार करुन त्यावर फिल्टर यंत्रणा बसविण्याचा प्रस्ताव केला होता. कामाची निविदाही निघाली. एका ठेकेदाराला हे कामही देण्यात आले. मात्र ‘कुठे माशी शिंकली कुणास ठाऊक’ ठेकेदाराकडून हे कामही पूर्ण झाले नाही. त्यानंतर महापालिकेने आजतागायत विहिरींकडे दुर्लक्ष केल्याचे एकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 

केवळ १३ विहिरींचीच नोंद- महापालिकेच्या ताब्यात असलेल्या ८ विहिरी तर खासगी मालकांच्या ५ विहिरींचीच नोंद आहे. सुभाष उद्यान, साखरपेठ शॉपिंग सेंटर, रुपाभवानी मंदिर, दमाणीनगर, विडी घरकूल (एबी ग्रुप), रेवणसिद्धेश्वर मंदिराच्या मागे, देगाव आणि जयभवानी उद्यान येथील विहिरी महापालिकेच्या तर लक्ष्मी विष्णू चाळ, पारसी अग्यारी (लष्कर), मौलाली बावडी (फॉरेस्ट), धोत्रीकर वस्ती आणि अन्य एका ठिकाणची विहीर या विहिरी खासगी मालकांच्या आहेत. 

आम्ही युवा कार्यकर्त्यांनी वर्गणी गोळा करुन किरीटेश्वर मठात असलेल्या विहिरीतील गाळ काढला. सांडपाण्यासाठी का होईना ही विहीर आमच्यासाठी उपयुक्त अशीच आहे. महापालिकेने सर्वच विहिरीतील गाळ काढून पाण्याचा पुनर्वापर करावा, अशी अपेक्षा आहे.-अशोक कोळेकर, अध्यक्ष- रासप.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका