शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

सुखी जीवन हवंय ?; मग विचार बदला : प्रल्हाद पै, जीवन विद्या मिशनतर्फे प्रेरणादायी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:00 IST

तुम्हाला जर जीवन सुखी आणि समृध्द करायचे असेल तर विचार बदला...जीवनाला आकार देण्यासाठी मनाला वश करा, असे प्रेरणादायी प्रबोधन आज जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या जीवन व्यवस्थापन मालिकेतील २२ वा कार्यक्रम सायंकाळी येथील हुतात्मा स्मृती मंदिरात झाला.

ठळक मुद्देउच्चविद्याविभूषित असलेल्या प्रल्हादजींकडे जीवन विद्या मिशनचे नेतृत्वएक मन हातात आले म्हणजे आपला प्रपंच सुखाचा आणि उत्कर्षाचा होईलआपण दिवसभरात  ६० हजार विचारांना जन्म देत असतो

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : तुम्हाला जर जीवन सुखी आणि समृध्द करायचे असेल तर विचार बदला...जीवनाला आकार देण्यासाठी मनाला वश करा, असे प्रेरणादायी प्रबोधन आज जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या जीवन व्यवस्थापन मालिकेतील २२ वा कार्यक्रम सायंकाळी येथील हुतात्मा स्मृती मंदिरात झाला.प्रल्हाद पै हे सद्गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र आहेत. उच्चविद्याविभूषित असलेल्या प्रल्हादजींकडे जीवन विद्या मिशनचे नेतृत्व आहे. त्यांना ऐकण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती; पण अतिशय शिस्तबध्द व्यवस्थेमुळे सर्वांना हा कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐकता आला. ‘विचार देई जीवना आकार’ हा पै यांच्या मार्गदर्शनाचा विषय होता. मन म्हणजे काय?  मनाचे प्रकार, त्याचे महत्त्व, विचार आणि त्यामुळे जीवनात येणारे सकारात्मक परिवर्तन, याबाबत प्रल्हाद यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मन हे आपल्या हातात आले पाहिजे. आपण मनाच्या खूपच आहारी गेलो आहोत. त्याच्यावर नियंत्रण मिळविले पाहिजे. एक मन हातात आले म्हणजे आपला प्रपंच सुखाचा आणि उत्कर्षाचा होईल.बहिर्मन आणि अंतर्मन हे मनाचे दोन प्रकार आहेत. हे दोन्हीही मनं जीवनात गोंधळ घालत असतात. त्यांना शिस्त लावली पाहिजे. आपण दिवसभरात  ६० हजार विचारांना जन्म देत असतो. हे सारे विचार बहिर्मनात चाललेले असतात. अंतर्मन आपोआप विचार करते आणि बहिर्मनाच्या विचारांना तथास्तू म्हणते. एखादी गोष्ट आपणाला साकारायची असल्यास त्या गोष्टीचा बहिर्मनात आलेला विचार अंतर्मनाला पटला पाहिजे. दोन्ही  मनांचे एकमत झाल्यावर ती गोष्ट साकार होते. यावरून आपल्या जीवनात जे जे घडते ते ते सारे विचारातूनच आकार घेते, हे स्पष्ट होते. त्यामुळे आपण प्रत्येकानेच आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला शिकले पाहिजे, असे ते म्हणाले.माणसाचे अंतर्मन आणि बहिर्मन नेहमीच आत्मशक्तीच्या रूपात असते, असे सांगून पै यांनी अंतर्मनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, या मनावरील श्रध्दा वाढविल्यास तुम्हाला जीवनात जे जे साकार करायचे ते सारे मिळेल; पण यासाठी आपल्या क्षमतेनुसार मागा. आशावादी राहा. जे साकार करायचे आहे, त्याच्या विचारांची उजळणी करत चला आणि साकार झाल्यानंतर ते यश साजरे करा.जीवनात सारे काही विचारांमुळेच घडत असल्यामुळे प्रत्येकानेच चांगला आणि सहकारात्मक विचार केला पाहिजे. विचार पाहत असताना एखादा वाईट विचार आला तर त्याला थांबवून सकारात्मक विचार केला पाहिजे. अंतर्मनालाही नेहमीच सकारात्मक संदेश द्यायला हवेत. विचारांना कल्पना आणि भावनांचे खतपाणी घातले पाहिजे, असेही ते म्हणाले.------------------उत्तम विचारांचे फायदेउत्तम विचारांचा नेहमी तन, मन,धन, वन आणि जनांवर सकारात्मक परिणाम होतो. चांगल्या विचारांमुळे आपले आरोग्य चांगले राहील याशिवाय मन सुदृढ होईल. तुमचे उत्पन्न वाढून श्रीमंती येईल. चांगल्या विचारांमुळे विचारांचे प्रदूषण दूर होईल आणि विश्वशांती नांदेल, असे प्रल्हाद पै यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर