शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
2
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
3
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
5
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
6
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
7
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
8
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
9
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
10
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
11
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
12
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
13
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
14
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
15
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
16
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
17
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
18
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
19
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
20
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?

सुखी जीवन हवंय ?; मग विचार बदला : प्रल्हाद पै, जीवन विद्या मिशनतर्फे प्रेरणादायी प्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 13:00 IST

तुम्हाला जर जीवन सुखी आणि समृध्द करायचे असेल तर विचार बदला...जीवनाला आकार देण्यासाठी मनाला वश करा, असे प्रेरणादायी प्रबोधन आज जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या जीवन व्यवस्थापन मालिकेतील २२ वा कार्यक्रम सायंकाळी येथील हुतात्मा स्मृती मंदिरात झाला.

ठळक मुद्देउच्चविद्याविभूषित असलेल्या प्रल्हादजींकडे जीवन विद्या मिशनचे नेतृत्वएक मन हातात आले म्हणजे आपला प्रपंच सुखाचा आणि उत्कर्षाचा होईलआपण दिवसभरात  ६० हजार विचारांना जन्म देत असतो

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २८ : तुम्हाला जर जीवन सुखी आणि समृध्द करायचे असेल तर विचार बदला...जीवनाला आकार देण्यासाठी मनाला वश करा, असे प्रेरणादायी प्रबोधन आज जीवन विद्या मिशनचे प्रल्हाद पै यांनी येथे केले. जीवन विद्या मिशनच्या जीवन व्यवस्थापन मालिकेतील २२ वा कार्यक्रम सायंकाळी येथील हुतात्मा स्मृती मंदिरात झाला.प्रल्हाद पै हे सद्गुरू वामनराव पै यांचे सुपुत्र आहेत. उच्चविद्याविभूषित असलेल्या प्रल्हादजींकडे जीवन विद्या मिशनचे नेतृत्व आहे. त्यांना ऐकण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती; पण अतिशय शिस्तबध्द व्यवस्थेमुळे सर्वांना हा कार्यक्रम व्यवस्थितपणे ऐकता आला. ‘विचार देई जीवना आकार’ हा पै यांच्या मार्गदर्शनाचा विषय होता. मन म्हणजे काय?  मनाचे प्रकार, त्याचे महत्त्व, विचार आणि त्यामुळे जीवनात येणारे सकारात्मक परिवर्तन, याबाबत प्रल्हाद यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मन हे आपल्या हातात आले पाहिजे. आपण मनाच्या खूपच आहारी गेलो आहोत. त्याच्यावर नियंत्रण मिळविले पाहिजे. एक मन हातात आले म्हणजे आपला प्रपंच सुखाचा आणि उत्कर्षाचा होईल.बहिर्मन आणि अंतर्मन हे मनाचे दोन प्रकार आहेत. हे दोन्हीही मनं जीवनात गोंधळ घालत असतात. त्यांना शिस्त लावली पाहिजे. आपण दिवसभरात  ६० हजार विचारांना जन्म देत असतो. हे सारे विचार बहिर्मनात चाललेले असतात. अंतर्मन आपोआप विचार करते आणि बहिर्मनाच्या विचारांना तथास्तू म्हणते. एखादी गोष्ट आपणाला साकारायची असल्यास त्या गोष्टीचा बहिर्मनात आलेला विचार अंतर्मनाला पटला पाहिजे. दोन्ही  मनांचे एकमत झाल्यावर ती गोष्ट साकार होते. यावरून आपल्या जीवनात जे जे घडते ते ते सारे विचारातूनच आकार घेते, हे स्पष्ट होते. त्यामुळे आपण प्रत्येकानेच आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला शिकले पाहिजे, असे ते म्हणाले.माणसाचे अंतर्मन आणि बहिर्मन नेहमीच आत्मशक्तीच्या रूपात असते, असे सांगून पै यांनी अंतर्मनाचे महत्त्व सांगितले. ते म्हणाले, या मनावरील श्रध्दा वाढविल्यास तुम्हाला जीवनात जे जे साकार करायचे ते सारे मिळेल; पण यासाठी आपल्या क्षमतेनुसार मागा. आशावादी राहा. जे साकार करायचे आहे, त्याच्या विचारांची उजळणी करत चला आणि साकार झाल्यानंतर ते यश साजरे करा.जीवनात सारे काही विचारांमुळेच घडत असल्यामुळे प्रत्येकानेच चांगला आणि सहकारात्मक विचार केला पाहिजे. विचार पाहत असताना एखादा वाईट विचार आला तर त्याला थांबवून सकारात्मक विचार केला पाहिजे. अंतर्मनालाही नेहमीच सकारात्मक संदेश द्यायला हवेत. विचारांना कल्पना आणि भावनांचे खतपाणी घातले पाहिजे, असेही ते म्हणाले.------------------उत्तम विचारांचे फायदेउत्तम विचारांचा नेहमी तन, मन,धन, वन आणि जनांवर सकारात्मक परिणाम होतो. चांगल्या विचारांमुळे आपले आरोग्य चांगले राहील याशिवाय मन सुदृढ होईल. तुमचे उत्पन्न वाढून श्रीमंती येईल. चांगल्या विचारांमुळे विचारांचे प्रदूषण दूर होईल आणि विश्वशांती नांदेल, असे प्रल्हाद पै यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूर