शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
4
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
5
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
6
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
7
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
8
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
9
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
10
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
11
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
12
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
13
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
14
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
15
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
16
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
17
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
18
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
19
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
20
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक

दोन जीबीचा हँग होतोय; सहा जीबीचा मोबाईल हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST

सोलापूर : सतत मोबाईल हँग होतात. बॅटऱ्या फुगल्या आहेत. चार्जिंग केल्यावर मोबाईल गरम होताे. दुरुस्तीचा खर्च मिळत नाही. खर्चही ...

सोलापूर : सतत मोबाईल हँग होतात. बॅटऱ्या फुगल्या आहेत. चार्जिंग केल्यावर मोबाईल गरम होताे. दुरुस्तीचा खर्च मिळत नाही. खर्चही परवडत नाही, म्हणून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी वैतागून मोबाईल परत केले आहेत. आता दोन जीबीच्या मोबाईलऐवजी किमान सहा जीबीचा चांगला मोबाईल दिल्यास कामे करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

कोरोना काळात अंगणवाडीतील सर्व माहिती ऑनलाईनद्वारे भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाकडून ॲँड्राॅईड मोबाईल दिले आहेत. त्या मोबाईलवर दररोज माहिती अपडेट करून वरिष्ठांकडे पाठविणे बंधनकारक आहे. शासनाकडून दिलेले मोबाईल सतत हँग होत आहेत, अशी ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आंदाेलन करून मोबाईल अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत. त्यामुळे कामे ठप्प पडली आहेत. आता वरिष्ठांनी मोबाईल परत घ्या, म्हणून तगादा सुरू केल्याचे सांगण्यात आले. मात्र, खराब मोबाईल घेऊन कामे कशी करायची, असे म्हणत आशाताई मोबाईल घेण्यास तयार नाहीत. त्यांना आता नवीन स्मार्ट मोबाईल हवा आहे.

.........................

कामाचा व्याप वाढला

मोबाईल दिल्यापासून कामाचा व्याप वाढला आहे. कोरोनाबाबत काम करीत मोबाईलमध्ये माहिती अपडेट करणे, मुलांचे वय, आधार क्रमांक, अनपौरिक माहिती, आहार, वजन, गरोदर महिलांची माहिती, मासिक माहिती भरावी लागते. शिवाय आता पोषण आहाराची माहिती इंग्रजीमध्ये भरावी लागत आहे. काही कमी शिकलेल्या सेविका आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पोषण आहाराची माहिती मराठीत भरण्यासाठी ॲप तयार करून देण्याची मागणी होत आहे.

............

असून अडचण नसून खोळंबा

मोबाईल खराब असल्यामुळे माहिती भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मोबाईल परत केला आहे. दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ५ हजार ते आठ हजारांपर्यंत खर्च सांगतात. खर्चही मिळत नाही. चांगला मोबाईल दिल्यास काम करू.

- उषा नलावडे, अंगणवाडी सेविका

.............

मोबाईलची रॅम कमी असल्याने हँग होत आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत. शासनाकडे मोबाईल परत केले आहेत. आता वरिष्ठांकडून पुन्हा परत देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेच खराब मोबाईल घेऊन काय उपयोग होणार आहे.

- हेमा गव्हाणे, अंगणवाडी सेविका

...........

दोन टक्केच मोबाईल खराब

सर्वच मोबाईल खराब आहेत, असे नाही. केवळ दोन टक्केच मोबाईल हँग होत आहेत. तेही दुरुस्तीसाठी माणसे नेमली आहेत. त्या त्या तालुक्यात जाऊन दुरुस्ती करण्यात येत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोबाईल परत घेण्याचे सूचित केले आहे.

-जावेद शेख, महिला व बालकल्याण अधिकारी

...........

म्हणून केला मोबाईल परत

१) मोबाईल सतत हँग होत आहेत. बॅटऱ्या खराब आहेत. त्यामुळे मोबाईल फुटण्याची भीती वाटते.

२) ९५ टक्के मोबाईल खराब आहेत. दुरुस्तीचा खर्च परवडत नाही. त्यामुळे नवीन चांगला मोबाईल द्यावा.

३) पोषण आहाराची माहिती इंग्रजीऐवजी मराठीत भरून देण्यासाठी नवीन ॲप तयार करा

.......

जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या : ४२११

अंगणवाडी सेविका : ३१७५

मदतनीस : ३०२७

मिनी अंगणवाडी सेविका ९१६

परत केलेले मोबाईल संख्या : ३२५०