शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

दोन जीबीचा हँग होतोय; सहा जीबीचा मोबाईल हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:26 IST

सोलापूर : सतत मोबाईल हँग होतात. बॅटऱ्या फुगल्या आहेत. चार्जिंग केल्यावर मोबाईल गरम होताे. दुरुस्तीचा खर्च मिळत नाही. खर्चही ...

सोलापूर : सतत मोबाईल हँग होतात. बॅटऱ्या फुगल्या आहेत. चार्जिंग केल्यावर मोबाईल गरम होताे. दुरुस्तीचा खर्च मिळत नाही. खर्चही परवडत नाही, म्हणून जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांनी वैतागून मोबाईल परत केले आहेत. आता दोन जीबीच्या मोबाईलऐवजी किमान सहा जीबीचा चांगला मोबाईल दिल्यास कामे करू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

कोरोना काळात अंगणवाडीतील सर्व माहिती ऑनलाईनद्वारे भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाकडून ॲँड्राॅईड मोबाईल दिले आहेत. त्या मोबाईलवर दररोज माहिती अपडेट करून वरिष्ठांकडे पाठविणे बंधनकारक आहे. शासनाकडून दिलेले मोबाईल सतत हँग होत आहेत, अशी ओरड सुरू झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील अंगणवाडी सेविकांनी आंदाेलन करून मोबाईल अधिकाऱ्यांकडे जमा केले आहेत. त्यामुळे कामे ठप्प पडली आहेत. आता वरिष्ठांनी मोबाईल परत घ्या, म्हणून तगादा सुरू केल्याचे सांगण्यात आले. मात्र, खराब मोबाईल घेऊन कामे कशी करायची, असे म्हणत आशाताई मोबाईल घेण्यास तयार नाहीत. त्यांना आता नवीन स्मार्ट मोबाईल हवा आहे.

.........................

कामाचा व्याप वाढला

मोबाईल दिल्यापासून कामाचा व्याप वाढला आहे. कोरोनाबाबत काम करीत मोबाईलमध्ये माहिती अपडेट करणे, मुलांचे वय, आधार क्रमांक, अनपौरिक माहिती, आहार, वजन, गरोदर महिलांची माहिती, मासिक माहिती भरावी लागते. शिवाय आता पोषण आहाराची माहिती इंग्रजीमध्ये भरावी लागत आहे. काही कमी शिकलेल्या सेविका आहेत. त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे पोषण आहाराची माहिती मराठीत भरण्यासाठी ॲप तयार करून देण्याची मागणी होत आहे.

............

असून अडचण नसून खोळंबा

मोबाईल खराब असल्यामुळे माहिती भरताना अडचणी येत आहेत. त्यामुळे मोबाईल परत केला आहे. दुरुस्तीसाठी दिल्यानंतर ५ हजार ते आठ हजारांपर्यंत खर्च सांगतात. खर्चही मिळत नाही. चांगला मोबाईल दिल्यास काम करू.

- उषा नलावडे, अंगणवाडी सेविका

.............

मोबाईलची रॅम कमी असल्याने हँग होत आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत. शासनाकडे मोबाईल परत केले आहेत. आता वरिष्ठांकडून पुन्हा परत देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तेच खराब मोबाईल घेऊन काय उपयोग होणार आहे.

- हेमा गव्हाणे, अंगणवाडी सेविका

...........

दोन टक्केच मोबाईल खराब

सर्वच मोबाईल खराब आहेत, असे नाही. केवळ दोन टक्केच मोबाईल हँग होत आहेत. तेही दुरुस्तीसाठी माणसे नेमली आहेत. त्या त्या तालुक्यात जाऊन दुरुस्ती करण्यात येत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांना मोबाईल परत घेण्याचे सूचित केले आहे.

-जावेद शेख, महिला व बालकल्याण अधिकारी

...........

म्हणून केला मोबाईल परत

१) मोबाईल सतत हँग होत आहेत. बॅटऱ्या खराब आहेत. त्यामुळे मोबाईल फुटण्याची भीती वाटते.

२) ९५ टक्के मोबाईल खराब आहेत. दुरुस्तीचा खर्च परवडत नाही. त्यामुळे नवीन चांगला मोबाईल द्यावा.

३) पोषण आहाराची माहिती इंग्रजीऐवजी मराठीत भरून देण्यासाठी नवीन ॲप तयार करा

.......

जिल्ह्यातील एकूण अंगणवाड्या : ४२११

अंगणवाडी सेविका : ३१७५

मदतनीस : ३०२७

मिनी अंगणवाडी सेविका ९१६

परत केलेले मोबाईल संख्या : ३२५०