शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

“लायसन्स नसूनही उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली”: गुलाबराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2021 10:43 IST

गुलाबराव पाटील यांनी ईडी, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली.

सांगोला:शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे कौतुक करताना दुसरीकडे बोलण्याच्या नादात उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री यांच्यावरही शेरेबाजी केली. तर गुलाबराव पाटील यांनी ईडी, नारायण राणे, चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ड्रायव्हिंग लायसन्स नसलेल्या उद्धव ठाकरे यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी थेट व्होल्वो बस चालवायला दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात विनाअपघात प्रवास सुरू आहे, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. 

गेल्या निवडणुकीत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होतील असे कोणी म्हणाले असते तर कोणी विश्वास ठेवला नसता. कोणतेही वाहन चालवायला लायसेन्स लागते, हे आपल्याला माहिती आहे. पण शरद पवार यांनी ज्याच्याकडे कसलेच लायसेन्स नाही त्याला थेट ड्रायव्हर केले तर अजित पवार यांना कंडक्टर. बाळासाहेब थोरात प्रवासी बनले आणि विना लायसेन्स असलेल्या ड्रायव्हरच्या हातात थेट व्होल्वो बस दिली. मात्र, गेल्या दोन वर्षात कितीही अडचणीचे मार्ग आले तरी या ड्रायव्हरने विनाअपघात गाडी सुसाट सोडल्याची टोलेबाजी गुलाबराव पाटील यांनी केली. 

सगळेच चिंतेत असताना शरद पवारांनी आपले ब्रम्हास्त्र काढले

भाजपने निवडणुकीनंतर दगाबाजी केली. दोन महिने आघाडीच्या आमदारांची हॉटेल ते हॉटेल अशी फिरस्ती चालू होती. यातच पहाटेचा शपथविधी झाल्याने सगळेच चिंतेत असताना शरद पवार यांनी आपले ब्रम्हास्त्र काढले आणि  मेरे गाडीने बैठ जा म्हणत पुन्हा सगळे गोळा केले. अखेर महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार बनल्याची आठवण गुलाबराव पाटील यांनी सांगितली. आता ५० हजार सापडले की, आली ईडी असे झालेय. ईडी म्हणजे आपल्या जिल्ह्यातील एलसीबी पोलीस आहे, असा टोला लगावत शिवसेनेला जेलचे काय नावीन्य, शिवसैनिक म्हणजे बॅचलर ऑफ जेल, आम्ही ईडीला घाबरत नाही. चंद्रकांत पाटील यांनी टीका करण्यापूर्वी कधी कापसाची बोन्डे, ऊस, कपाशी, केळी कधी पाहिली का आणि आज ते शेतकऱ्यांना कमी मदत मिळाल्याची टीका करीत आहेत, अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. 

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सतत काहीना काही टीका करत असतात. त्यांनी संयमाने भूमिका घेतली असती तर शिवसेनेचे ५६ आमदार हे आज भाजपसोबत असते. भाजपमधून शिवसेनेत आलेले अनेक नगरसेवक पुन्हा भाजपमध्ये निघाले आहेत. या नगरसेवकांना भाजपने अपात्रतेची भीती दाखवली असावी, अशी शक्यता गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली.  

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShiv Senaशिवसेना