शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्र्यांनी सोडवला चार गावाच्या पाण्याचा प्रश्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:41 IST

ऑनलाइन निवेदनाची घेतली दखल; सुपली, पळशी, उपरी व भंडीशेगावचा पाणी प्रश्न मिटला...!!

पंढरपूर :-  होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पंढरपूर तालुक्यातील उपरी, पळशी, सुपली, भंडिशेगाव या चार गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. याबाबत उपरी गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे आॅनलाईन निवेदन पाठवून मागणी केली होती.उजनी उजव्या कालव्यावर असणार्‍या कासाळगंगा ओढ्यावर सुपली, पळशी, उपरी व भंडीशेगाव याठिकाणचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना, कासाळगंगा ओढ्यातील पाणी पुर्णपणे आटले होते.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता.यासंदर्भात उपरी ग्रामपंचायतच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आॅनलाईन निवेदन पाठवून, कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आ. शहाजीबापू पाटील, आ. प्रशांत परिचारक यांच्याकडेही निवेदन दिले होते. सदर मागणी पालकमंत्री आव्हाड यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांनी सहकार्य करुन, सदर प्रश्नाचे गांर्भीय पालकमंत्र्यांच्या कानावर घातले. डाॅ. आव्हाड यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्यात आले असून उपरी,पळशी,सुपली व भंडिशेगाव या चार गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळJitendra Awhadजितेंद्र आव्हाड