शहरं
Join us  
Trending Stories
1
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
2
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
3
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
4
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
5
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
6
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
7
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
8
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
9
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
10
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
11
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
12
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
13
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
14
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
15
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
16
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
17
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
18
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
19
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
20
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्र्यांनी सोडवला चार गावाच्या पाण्याचा प्रश्न !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 13:41 IST

ऑनलाइन निवेदनाची घेतली दखल; सुपली, पळशी, उपरी व भंडीशेगावचा पाणी प्रश्न मिटला...!!

पंढरपूर :-  होम क्वाॅरांटाईन असतानाही पालकमंत्री डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी पंढरपूर तालुक्यातील उपरी, पळशी, सुपली, भंडिशेगाव या चार गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. याबाबत उपरी गावातील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यांकडे आॅनलाईन निवेदन पाठवून मागणी केली होती.उजनी उजव्या कालव्यावर असणार्‍या कासाळगंगा ओढ्यावर सुपली, पळशी, उपरी व भंडीशेगाव याठिकाणचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना, कासाळगंगा ओढ्यातील पाणी पुर्णपणे आटले होते.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला होता.यासंदर्भात उपरी ग्रामपंचायतच्यावतीने सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्याकडे आॅनलाईन निवेदन पाठवून, कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच आ. शहाजीबापू पाटील, आ. प्रशांत परिचारक यांच्याकडेही निवेदन दिले होते. सदर मागणी पालकमंत्री आव्हाड यांच्यापर्यंत पोहचवण्यासाठी कर्मवीर औदुंबरआण्णा पाटील प्रतिष्ठानचे संस्थापक अमरजित पाटील यांनी सहकार्य करुन, सदर प्रश्नाचे गांर्भीय पालकमंत्र्यांच्या कानावर घातले. डाॅ. आव्हाड यांनी तातडीने या प्रकरणी लक्ष घालून कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार कासाळगंगा ओढ्याला पाणी सोडण्यात आले असून उपरी,पळशी,सुपली व भंडिशेगाव या चार गावाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरwater transportजलवाहतूकdroughtदुष्काळJitendra Awhadजितेंद्र आव्हाड