शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

उजनीचे पाणी पळविण्यासाठीच पालकमंत्री दत्तात्रय भरणे सोलापुरात आले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 17:15 IST

नव्या नियोजनावर संताप : जिल्ह्याच्या वाट्याचे थेंब नेऊ देणार नसल्याची भूमिका

सोलापूर : शासनाने उजनी पाणी वाटपाचे नव्याने केलेल्या नियोजनावर सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा तुटून पडले आहेत. शाब्दिक घोळ घालत उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा इंदापूरला पाणी पळविण्याचा डाव यशस्वी होऊ देणार नाही अशी भूमिका प्रतिक्रिया देताना मांडली आहे.

जलसंपदा विभागाने बुधवारी उजनीच्या पाणी वाटपाचे नव्याने नियोजन जाहीर केले आहे. यात सोलापूर जिल्ह्यात सीना, भीमेच्या पात्रात कोल्हापूर पद्धतीचे बंधारे वाढल्याने कालव्यातील पाण्याची मागणी घटल्याचे दाखवून मंगळवेढा व इंदापूरच्या लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेचे पाणी वाढविले आहे. माढा, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील योजना अर्थवट असताना कालव्याच्या पाण्याची मागणी नसल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात या तालुक्यांना मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे कायम दुष्काळी असलेल्या या तालुक्याच्या वाटणीचा थेंब मिळाल्याशिवाय पाण्याचे नवीन वाटप करू देणार नाही अशी भूमिका सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी घेतल्याचे दिसून येत आहे.

----

पालकमंत्री कशाला आले?

आमदार विजयकुमार देशमुख यांनी उजनीच्या नवीन पाणी वाटप धोरणाला विरोध असेल असे सांगितले. फेब्रुवारी ते मे या चार महिन्यात उजनी धरण शून्यावर जाते. मग जिल्ह्यात पाण्याची गरज नाही का. अजून अक्कलकोट, दक्षिणच्या योजना व्हायच्या आहेत. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांना केवळ इंदापूरला पाणी न्यायचे आहे म्हणून ते सोलापूरला आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार व भरणे यांना सोलापूर विषयी काही देणं घेणं दिसत नाही. त्यांनी सोलापूर साठी एकतरी काम केलेले दाखवावे. नव्या नियोजन विरूद्ध आम्ही पुन्हा आंदोलन उभा करू.

-------

नियोजन चुकीचेच आहे

शासनाने उजनी पाणी वाटपाचे नवीन केलेले नियोजन चुकीचे आहे. कालव्याच्या पाण्याची मागणी घटल्याचे त्यांनी दाखविले आहे. कालव्यात पाणीच सोडले जात नाही. पाण्याची मागणी करण्याचे शेतकऱ्यांना माहिती नाही. याचा फायदा घेतला जात आहे. आम्ही या नियोजनाला विरोध करू व हक्काचे पाणी मिळवू असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.

---------

अन्याय होऊ देणार नाही

उजनीचे पाणी पळविण्याचा मागे प्रयत्न झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही बाब निदर्शनाला आणून दिल्यावर हा प्रयत्न थांबला. आता नवे नियोजन मी पाहिले. अक्कलकोट, दक्षिणला अजून पाणी मिळालेले नाही. सोलापूरच्या वाट्याचे आधी पाणी येऊ द्या. मगच आम्ही इतरांना पाणी देऊ. इतर लोकप्रतिनिधींनी याचा अभ्यास करावा. मुख्यमंत्र्याकडे हा विषय पुन्हा मांडू अशी भूमिका शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे यांनी मांडली.

---------

नियोजन पाहिले नाही...

याशिवाय मोहोळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांना उजनी पाण्याच्या नवीन नियोजनावर प्रतिक्रिया विचारली असता पाटील यांनी नवीन नियोजन माहित नसल्याचे सांगितले. आमदार माने यांनी बाहेर जिल्ह्यात असल्याने नवीन नियोजन पाहिले नसल्याचे स्पष्ट केले

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater shortageपाणीकपातIndapurइंदापूरPoliticsराजकारण