शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

देशातील वाढती विषमता हीच देशातील मंदीचे कारण : अच्युत गोडबोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 14:18 IST

‘लोकमत’ शी साधला संवाद; १ टक्के लोकांकडे आहे ५८ टक्के संपत्ती

ठळक मुद्देशिक्षण, आरोग्य क्षेत्रात जीडीपीच्या तुलनेमध्ये कमी खर्च केल्यामुळे याचा फटका देशाला बसत आहे - अच्युत गोडबोलेदेशातील ४१.५ टक्के लोक शाळेत कधी गेलेच नाहीत, ५८ टक्के महिला ३३ टक्के पुरुष कधीच शाळेला गेले नाहीत - अच्युत गोडबोले

सोलापूर : जागतिकीकरण स्वीकारल्यानंतर याचा फायदा खूप कमी लोकांना झाला़ जागतिकीकरणामुळे आपले लक्ष फक्त शहराकडे गेले. यामुळे रोजगार वाढला नाही, जीडीपीमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही़ यामुळेच बेकारी, विषमता, प्रदूषण हे तीन राक्षस निर्माण झाले. याचाच परिणाम विकासावर होत आहे़ आज देशात १ टक्के लोकांकडे ५८ टक्के संपत्ती आहे़ तर नऊ लोकांकडे असलेली संपत्ती देशातील ५० टक्के लोकांकडे असलेल्या संपत्तीपेक्षा जास्त आहे़ अशा घटकामुळे विषमता वाढत आहे़ ही वाढती विषमता ही मंदीचे कारण आहे असे मत साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या वतीने किर्लोस्कर सभागृह येथे भारताची विकासनीती वास्तव व धोका या विषयावर लेखक अच्युत गोडबोले यांच्याशी संगणक अभ्यासक अतुल कहाते यांनी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर श्रीकांत येळेगावकर उपस्थित होते.

गोडबोले पुढे म्हणाले, शिक्षण, आरोग्य, रोजगार यांच्यावर पुरेसा खर्च करण्याबरोेबर वीज, पाणी आदी सुविधा सर्वांपर्यंत पोहोचवणे म्हणजे खरा सर्वांगीण विकास होय़ विकासामध्ये पर्यावरण हा खूप महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा आहे़ विकासाकडे पाऊल ठेवताना आपण पर्यावरणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे़ जागतिकीकरणाचा फायदा खूप कमी लोकांना झाला आहे़ सरकारी आकडेवारीनुसार देशात ८.१ टक्के लोक बेरोजगार आहेत़ पण रोजगार संबंधी खूप कमी लोक नाव नोंदणी करत असतात़ देशात ९३ टक्के असुरक्षित  कामगार आहेत़ त्यांना उद्या आपण कुठे काम करणार आहेत याची माहितीही नसते. याचबरोबर आरोग्यासंबंधित जागृतीही नसणाºयांची संख्याही खूप कमी आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षणावर कमी खर्च ...- शिक्षण, आरोग्य क्षेत्रात जीडीपीच्या तुलनेमध्ये कमी खर्च केल्यामुळे याचा फटका देशाला बसत आहे. यामुळेच देशातील ४१.५ टक्के लोक शाळेत कधी गेलेच नाहीत, ५८ टक्के महिला ३३ टक्के पुरुष कधीच शाळेला गेले नाहीत, शाळेचे शिक्षण पूर्ण केलेले १५.७ टक्के लोक आहेत. पदवीधर शिक्षण घेतलेले ४.५ टक्के लोक आहेत. द्विपदवीधर हे १.१ टक्के लोक आहेत तर २०१७ च्या आकडेवारीनुसार ७० टक्के शाळांमध्ये प्रयोगशाळा नाहीत. ४० टक्के शाळांमध्ये मैदान नाही, अशी माहिती अच्युत गोडबोले यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरIndiaभारतAchyut Godboleअच्युत गोडबोले