शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

समूह शेतीच शेतकºयाला वाचवू शकते - विजयकुमार बरबडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 14:32 IST

शेतीचे तुकडे तुकडे झाल्याने शेती तोट्यात

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यात ३५० शेतकरी समूहाची आत्माकडे नोंदअक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे महिलांनी समूह शेती केलीगुलाब फुलापासून गुलाब पाणी बनवण्याचा प्रकल्प चालू

बाळासाहेब बोचरे 

सोलापूर: शासकीय धोरण म्हणून असो वा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटण्या असोत, त्यामुळे शेतीचे छोटे-छोटे तुकडे पडले असून, त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढला असल्याने शेती व्यवसाय घाट्यात आला आहे. अजूनही छोट्या-छोट्या शेतकºयांनी एकत्र येऊन समूह शेती केली तर उत्पादन खर्चात बचत होणार असल्याने हीच शेती देशाच्या बळीराजाला वाचवू शकते, असे प्रतिपादन कृषी तंत्र व्यवस्थापन यंत्रणेचे (आत्मा) प्रकल्प उपसंचालक विजयकुमार बरबडे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच सोलापूर जिल्हा दौरा केला आहे. जिल्ह्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यापार्श्वभूमीवर आत्माच्या माध्यमातून दुष्काळावर कशी मात करता येईल याबाबत त्यांच्याशी केलेली बातचीत.

प्रश्न: दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी ‘आत्मा’ची भूमिका काय आहे?बरबडे: दुष्काळ असो वा सुकाळ ‘आत्मा’ ही यंत्रणा शेतकºयांना स्वयंपूर्ण करण्यासाठीच काम करत आहे. दुष्काळी परिस्थितीमध्ये चारा टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने चारा उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी ‘आत्मा’ वर सोपविली आहे. त्या माध्यमातून पाणी असलेल्या भागातील १५०० हेक्टर क्षेत्रात चारा लागवड करण्यात येणार आहे. त्यासाठी ११ तालुक्यांतील ६० ठिकाणे निवडण्यात आली आहेत. 

प्रश्न : शेतकरी अल्पभूधारक का झाला? बरबडे: शासनाने अल्पभूधारक शेतकºयांसाठी अनेक योजना दिल्याने शेतकºयांनी शेतीचे तुकडे पाडले. शिवाय वडिलोपार्जित शेतीच्या वाटण्या झाल्यामुळे मोठमोठे शेतकरीही आज अल्पभूधारक झाले आहेत. अल्पभूधारक शेतकºयांना मशागतीसाठी यंत्रे विकत घेणे किंवा बैलबारदाणा सांभाळणे परवडत नाही. त्यामुळे सध्या शेतकरी अडचणीत आहेत. 

प्रश्न : समूह शेतीचे फायदे काय आहेत?बरबडे: लागवडीपासून विक्रीपर्यंतच्या ज्या-ज्या अडचणी येतात त्या सामूहिकपणे सोडवल्या जातात. शिवाय मनुष्यबळ आणि खर्चाची बचत होते. खते, बियाणे खरेदी करताना सवलत मिळते. एकत्रितरित्या कीड व रोगाचे निर्मूलन शक्य होते. यासाठी शासनाकडून शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन मोफत मिळते. शेतमाल बाजारात पाठवणे किंवा बाजारातून खते, बी-बियाणे आणणे खर्चिक होते. त्याऐवजी अनेक शेतकरी एकत्र आले तर उत्पादन खर्च हा शेतकºयांच्या संख्येमध्ये व क्षेत्रामध्ये विभागला गेल्याने तो निश्चित कमी येतो हा समूह शेतीचा फायदा आहे. 

प्रश्न : प्रोत्साहन म्हणून शासनाच्या काय योजना आहेत?बरबडे: समूह शेतीसाठी शासनाने अनेक योजना दिल्या असून, प्रकल्प मार्गदर्शन व प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या तांत्रिक मदतीबरोबरच विपणनासाठीही मार्गदर्शन केले जाते.  किमान २० शेतकरी एकत्र येऊन त्यांनी शंभर एकरामध्ये एखादा प्रकल्प राबवला तर त्याला केंद्र व राज्य सरकारकडून अर्थसहाय्य मिळते. त्यामध्ये तीन कोटींच्या प्रकल्पासाठी एक कोटीचे अनुदान आहे. शिवाय समूहाला यांत्रिकीकरणासाठी ४० टक्के अनुदानावर ट्रॅक्टरसह अनेक अवजारे खरेदी करता येतात. 

प्रश्न: जिल्ह्यात समूह शेतीला कसा प्रतिसाद आहे?बरबडे: सोलापूर जिल्ह्यात ३५० शेतकरी समूहाची आत्माकडे नोंद आहे. त्यापैकी वडजी (ता. दक्षिण सोलापूर) येथे गुलाब फुलापासून गुलाब पाणी बनवण्याचा प्रकल्प चालू आहे. अक्कलकोट तालुक्यातील कडबगाव येथे महिलांनी समूह शेती केली आहे. अरण (ता. माढा ) येथे सामूहिकरित्या सेंद्रिय शेती केली जाते. या शेतकºयांनी देशी गायींचे पालन केले आहे. कडधान्याचेही उत्पादन केले जाते. या पध्दतीने शेतकºयांनी एकत्र येऊन आपल्या विकासाचा मार्ग साधला आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्र