शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

ग्रीन पीसच्या अहवालानुसार सोलापुरातील हवा प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 13:36 IST

२०१८ चा अहवाल प्रसिद्ध; देशात सोलापूरचा १९८ वा क्रमांक

ठळक मुद्देशहरातील हवा प्रदूषित झाली असल्याने श्वसनाच्या आजाराचा धोका वाढतोग्रीन पीसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार देशातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे ही प्रदूषित आहेत भारतात सर्वाधिक प्रदूषित असणाºया शहरांच्या यादीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झाला

सोलापूर : भारतात सर्वाधिक प्रदूषित असणाºया शहरांच्या यादीमध्ये सोलापूर शहराचा समावेश झाला आहे. ग्रीन पीस इंडिया या पर्यावरणसंबंधी काम करणाºया संस्थेने नुकताच एक अहवाल प्रकाशित केला आहे. सोलापुरात हवेच्या दोन गुणवत्ता मापक केंद्रामधून घेतलेल्या चाचणीनुसार हा अहवाल तयार करण्यात आला आहे.

ग्रीन पीसने प्रकाशित केलेल्या अहवालानुसार देशातील २८७ शहरांपैकी २३१ शहरे ही प्रदूषित आहेत. या प्रदूषित शहरांमध्ये २० शहरे ही महाराष्ट्रातील असून यात सोलापूर शहराचा देखील समावेश आहे. हवेतील अतिसूक्ष्म कणांची (पर्टीक्युलेट मॅटर १०) तपासणी करण्यात आली होती. यात सोलापूर शहराचा २०१८ मधील पीएम १० हा ७१ असा आहे. 

२०१७ मध्ये पीएम १० हा ६४ इतका होता. या एका वर्षामध्ये हवेमधील सूक्ष्मकणात ७ पीएम १० ने वाढ झाली आहे. शहरासाठी ठरविण्यात आलेल्या प्रमाणानुसार जर पीएम १० हा १०० च्या वर गेल्यास हवा अधिक धोकादायक बनू शकते. प्रदूषित शहरांच्या यादीमध्ये सोलापूरचा क्रमांक हा देशात १९८ वा तर राज्यामध्ये १७ वा आहे.

श्वसनाच्या आजारांचा धोक ा- शहरातील हवा प्रदूषित झाली असल्याने श्वसनाच्या आजाराचा धोका वाढतो. सर्दी, शिंका, नाकातून पाणी येणे, दम्याचा त्रास वाढणे असे त्रास होतात. जुना दमा असेल तर तो पुन्हा डोके वर काढतो. डोळे जळजळ करतात. श्वसनाचे नवे रुग्ण असल्यास त्यांना लवकर दम लागतो, फुफ्फुसाचे आजार होण्याचा धोका. अंगावर पुरळ येणे, खाज सुटणे, त्वचा लाल होणे आदी त्रास होऊ शकतात असे कान-नाक व घसा तज्ज्ञ डॉ. रामेश्वर खटावकर यांनी सांगितले.

शहरातील वाहनांची संख्या वाढणे, रस्त्यांची परिस्थिती, शहरातील जागेवर इमारतींची संख्या वाढणे, झाडांची कमतरता, झाडे लावताना प्रदूषणासंबंधीचा विचार न करता लावणे आदी कारणामुळे प्रदूषण वाढीस लागते. शहरात वापरली जाणारी जुनी वाहने हे देखील प्रदूषणाचे कारण आहे. सध्या शहराच्या हवेतील पीएमचे प्रमाण हे ७१ असून १०० च्या दिशेने वाटचाल सुरु आहे. प्रदूषणाची हीच गती कायम राहिल्यास अतिधोकादायक वातावरण तयार होण्यास वेळ लागणार नाही.- डॉ. विनायक धुळप, पर्यावरण विभाग प्रमुख,  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ.

टॅग्स :Solapurसोलापूरenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण