शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

सोलापूर - पराभवाच्या भीतीमुळे सरकार पालिका निवडणुकीला घाबरते : प्रणिती शिंदे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 09:21 IST

काँग्रेसच्या ‘हात से हात जाेडाे’ अभियान बैठकीदरम्यान त्या बाेलत हाेत्या.

सोलापूर : राज्यात सरकार येऊनही लाेक आपल्या बाजूने नाहीत. आपल्या बाजूने जनाधार नाही, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलत आहेत. हे खोके सरकार निवडणुकांना घाबरते, अशी टीका प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवारी केली.

काँग्रेसच्या ‘हात से हात जाेडाे’ अभियान बैठकीदरम्यान त्या बाेलत हाेत्या. शिंदे म्हणाल्या, पुण्याच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री आले.  प्रचंड पैसा वापरून प्रचार यंत्रणा राबविली. तरीही भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा मतदारसंघात दारुण पराभव झाला.

सरकारचा नाकर्तेपणाशिंदे म्हणाल्या, उजनी ते साेलापूर पाइपलाइनमुळे साेलापूर शहराला पाणी मिळते. ही पाइपलाइन सुशीलकुमार शिंदे यांनी आणली. परंतु, भाजपच्या नाकर्तेपणामुळे आज शहराला पाच ते सहा दिवसाआड पाणी मिळते. भाजपवाल्यांना जनतेशी काही देणे-घेणे नाही. त्यांना फक्त सत्तेशी देणे-घेणे आहे. सत्ता मिळाली की, जनतेला वाऱ्यावर सोडून स्वतःचे खिसे भरायचे व आपल्या उद्योगपती मित्रांचेही खिसे भरण्याचे काम ते करतात. पराभवाच्या भीतीमुळे सरकार महापालिका निवडणुकीला घाबरत असल्याचे त्या म्हणाल्या.

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेcongressकाँग्रेस