शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

गुड बोला.. गोड बोला..! आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो : मंगल शहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 14:58 IST

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा ...

ठळक मुद्देचांगले बोलण्यासाठी संस्काराची गरज असते़संस्कार भारतीय संस्कृतीत आणि जीवनपरंपरेत पाहावयास मिळतात़रागावर नियंत्रण ठेवून जीवनाची वाटचाल केल्यास समाजातील सर्वच लोक आपुलकीने वागतात

‘तीळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत मकरसंक्रांत दिवशी सर्वजण एकमेकांना तीळगूळ देऊन गोड बोलण्याचा संदेश देतो शिवाय तिळाचा स्नेह व गुळाची गोडी बोलण्यात यावी, असं सांगतो़ सर्वांशी गोड बोलावे ही सभ्यता आहे. गोड बोलण्यामुळे खूप काही शिकायलाही मिळते़

झाले असे की, पालवीमध्ये मुलांची काळजी घेणाºया ताईनेच रागाने लहान मुलाला धपाटा मारला़ परंतु तिने त्या मुलाची चूक काय हे समजून घेतले नाही़ तिला ती चूक कळाल्यानंतर मोठी असूनही त्या मुलाला सॉरी म्हणाली़ त्यानंतर थोड्या वेळाने झालेला प्रसंग विसरून दोघेही पुन्हा एकमेकांना गोड बोलू लागले़ यातून एकच संदेश मिळतो की, राग करण्यासाठी कृती समजावून घेतली पाहिजे़ गोड बोलण्याचा परिणाम खूप काही शिकवून जातो़ निराशा दूर होते़ उत्साह वाढवतो़ संतापलेली व्यक्ती स्वत:च्या मनावरील नियंत्रण हरवतो़ याचा स्वत:च्या आरोग्यावर परिणाम होतो़ म्हणून प्रत्येकाने मनावर संयम ठेवले पाहिजे़ तरच आयुष्य सुखकर बनते़ सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीने तर खूपच जपून बोलले पाहिजे़ त्यावरच त्यांची प्रतिष्ठा अवलंबून असते़

आयुष्यातील सकारात्मक बदल जीवन फुलवितो़ परंतु एखाद्याबद्दल वाईट बोलण्यासाठी कशाचीच गरज भासत नसते़ चांगले बोलण्यासाठी संस्काराची गरज असते़ तेच संस्कार भारतीय संस्कृतीत आणि जीवनपरंपरेत पाहावयास मिळतात़ केवळ ते कृतीत आणले पाहिजेत़ रागावर नियंत्रण ठेवून जीवनाची वाटचाल केल्यास समाजातील सर्वच लोक आपुलकीने वागतात.  -मंगल शहा, संचालिका, पालवी प्रकल्प, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरLokmat Eventलोकमत इव्हेंटPandharpurपंढरपूर