शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Good News; आजपासून केशरी कार्डधारकांना मिळणार धान्य...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 08:15 IST

सोलापूर जिल्ह्यासाठी ४२ हजार क्विंटल धान्य: वाटपासाठी उचलले २१ हजार क्विंटल

ठळक मुद्देसोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातही संचारबंदीगावा गावातील रेशन दुकानातून मिळणारे धान्यधन्यवाद पास साठी जिल्ह्यातील सर्वच रेशन दुकानदार सज्ज

सोलापूर : आतापर्यंत धान्य मिळालेले नव्हते, पण आता लॉकडाउनच्या काळात मागणी असलेल्या केशरी कार्डधारकांना २६ एप्रिलपासून गहू व तांदूळ वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.

अंत्योदय व प्राधान्य कुटुंबाच्या कार्डधारकांना एप्रिल, मे व जून अशा तीन महिन्यांचे धान्य वाटपाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. तसेच केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे यातील प्रत्येकास ५ किलो मोफत तांदळाचे वितरण करण्यात आले आहे. आता आॅनलाईन नसलेल्या व प्रगत उत्पन्न गट असलेल्या केशरी कार्डधारकांनाही शासनाने घोषित केल्याप्रमाणे धान्य वाटप करण्यात येणार आहे. यापूर्वी १ मे पासून हे धान्य वितरित करण्यात येईल, असे सांगितले होते. पण आता धान्याचा कोटा आलेला आहे.

शासनाकडून केशरी कार्डधारकांसाठी धान्य वितरित करण्यासाठी ४२ हजार ९० क्विंटल गहू व तांदळाचा साठा आलेला आहे. हे धान्य वितरित करण्यासाठी रेशन धान्य दुकानदारांना वितरण सुरू केले आहे. आतापर्यंत दुकानदारांनी २१ हजार ५०० क्विंटल धान्य उचलले आहे. त्यामुळे हे धान्य रविवारपासून वाटण्यात यावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

२७ एप्रिलपर्यंत 'जैसे थे'

सोलापुरात २७ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यानंतर या धान्याचे वाटप होईल. तालुक्याच्या ठिकाणीही अशी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. पण बऱ्याच गावांमध्ये अशी परिस्थिती नाही. ज्या त्या ठिकाणच्या परिस्थितीनुसार धान्य वाटपाचे वेळापत्रक ठरविले जाणार आहे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस