शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
5
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
6
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
7
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
8
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
9
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
10
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
11
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
12
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
13
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
14
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
15
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
16
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
17
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
18
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
19
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
20
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

दिलायादायक बातमी; रेल्वे प्रवासात तुम्हाला मदत हवीय ? तर मग १३९ वर करा ना कॉल

By appasaheb.patil | Updated: August 19, 2022 16:00 IST

रेल्वेचं प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य; प्रत्येक कॉल्सला मिळतं समाधानकारक उत्तर

आप्पासाहेब पाटील

सोलापूर : भारतीय रेल्वेने प्रवाशांचा प्रवास अजून सुखकर हाेण्यासाठी माेठे पाऊल उचलले आहे. रेल्वेमध्ये याआधी मदतीसाठी वेगळा क्रमांक, तक्रारींसाठी भिन्न क्रमांक आणि चाैकशीसाठी वेगळाच नंबर, अशी अवस्था हाेती. प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान येणाऱ्या विविध समस्या आणि आवश्यक चाैकशांसाठी वेगवेगळ्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधण्याच्या गैरसाेयीपासून रेल्वे प्रवाशांची सुटका करण्याच्या उद्देशाने, प्रवासादरम्यान प्रवाशांना काही समस्या उद्भवल्या किंवा काही चाैकशी करावयाची असेल, तर त्यासाठी भारतीय रेल्वे विभागाच्या १३९ या एकाच एकीकृत हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधायचा आहे.

सध्या परिचलनात असलेल्या रेल्वेच्या सर्व हेल्पलाइन क्रमांकांऐवजी आता १३९ हा एकच क्रमांक अस्तित्वात आला आहे. गेल्या वर्षी रेल्वे विभागाच्या तक्रार निवारण हेल्पलाइन्स खंडित करण्यात आल्या. आता, १८२ हा सध्या परिचालनात असलेला हेल्पलाइन क्रमांक देखील खंडित करण्यात आल्या आणि त्यावरील सेवा १३९ क्रमांकाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवांमध्ये विसर्जित हाेतील.

---------

१२ भाषांमध्ये करता येईल तक्रार

१२ भाषांमध्ये हेल्पलाइन क्रमांक १३९ च्या सेवा उपलब्ध असतील. प्रवाशांना आयव्हीआरएस प्रणालीद्वारे ही सेवा वापरता येईल किंवा फाेनवरील (अस्टेरीस्क) हे चिन्ह दाबून काॅल सेंटरमधील साहाय्यकाशी प्रत्यक्ष बाेलता येईल. आपल्या तक्रारीवरून सहाय्यक संबंधित यंत्रणेला कळवतील अन् काही वेळानं प्रवाशांची मदत होईल.

----------

स्मार्टफोनच असावा असं काही नाही

१३९ या क्रमांकावर संपर्क साधण्यासाठी स्मार्टफाेन उपलब्ध असण्याची गरज नाही. त्यामुळे सर्व प्रकारचे फाेन वापरणारे प्रवासी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. फक्त कोणताही कॉल केल्यावर समोरच्या सहाय्यकाला स्पष्ट ऐकू आलं पाहिजे. त्यांनी सांगितलेले रेल्वे गाडीचा नंबर, तक्रार व अडचणीविषयी समोरच्याला समजलं पाहिजे.

-------

दररोज येतात कॉल...

सध्या १३९ या हेल्पलाइन क्रमांकावर चाैकशीसाठी सरासरी प्रतिदिन ३ लाख ४४ हजार ५१३ काॅल अथवा संदेश येत आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. यात सोलापूर विभागात दररोज १० ते १५ कॉल्स येतात. यातील काही कॉल्स फेकही येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान, दिवसभरात येणारे सर्व कॉल्सला रेल्वेकडून मदत केली जाते.

---------

कोणत्या कारणास्तव करता येतो कॉल

  • - चोरीचा प्रयत्न झाला.
  • - अनोळखी बॅग डब्यात दिसली.
  • - नातेवाइकांना फोन लागत नाही.
  • - अस्वच्छता, डब्यात गर्दी
  • - स्मोकिंग अन् दारू पिलेल्या व्यक्तीविरोधात

--------

रेल्वेत प्रवास करताना प्रवासी १३९ या टोल फ्री नंबरवर कॉल करतात. त्यांना तातडीने मदत केली जाते. मदतीनंतर संबंधित प्रवाशांकडून आम्ही फिडबॅकही घेतो. रेल्वेचा प्रवास आता सुरक्षित प्रवास बनला आहे. प्रवाशांना कोणत्याही अडचणी आम्ही येऊ देत नाही. प्रवाशांच्या सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो.

- श्रेयांश चिंचवाडे, सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा बल, सोलापूर मंडल

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वे