शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
4
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
5
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
6
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
7
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
8
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
9
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
10
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
11
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
12
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
13
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
14
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन
15
Tulsi Vivah 2025: ज्यांना मुलगी नाही त्यांनाही तुळशी विवाह लावल्याने मिळते कन्यादानाचे पुण्य!
16
चीन-पाकिस्तानसह अमेरिकेलाही एकाचवेळी बसेल चाप; 'बगराम एअरबेस' भारतासाठी किती महत्त्वपूर्ण?
17
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
18
देशातील सर्वात श्रीमंत राजघराणे! अजूनही जगतात राजेशाही जीवन! कमाईचे मुख्य साधन कोणतं?
19
क्रिकेट लीगसाठी गेल, गप्टिलसह ७० क्रिकेटपटूंना श्रीनगरला नेले, अन् आयोजकच फरार झाले, नेमकं प्रकरण काय? 
20
IAS Anuradha Pal : स्वप्न होती मोठी! घरची परिस्थिती बिकट, वडील विकायचे दूध; लेक झाली IAS, डोळे पाणावणारी गोष्ट

Good News; कोरोनाच्या जागृतीमुळे डेंग्यू हद्दपार; वर्षभरात एकाचाही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 13:01 IST

मागील दोन वर्षांत डेंग्यूचे प्रमाण झाले कमी- कोरोनामुळे जागृतीत वाढ

सोलापूर-ः जिल्ह्यात मागील दोन वर्षांत डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, २०२० मध्ये १३२ जणांना डेंग्यू झाला होता. चांगली बाब म्हणजे, २०२० मध्ये डेंग्यूने एकाचाही मृत्यू झाला नाही.

कोरोनामुळे इतर विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना बराच काळ उपचारापासून वंचित रहावे लागले आहे. मात्र, डेंग्यू, मलेरिया या डासांचा नाश करण्यासाठी आरोग्य विभाग व महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने स्वच्छतेच्या कामात सक्रिय सहभाग घेतला. कोरोनासह साथीच्या आजारांवर उपचार करण्यासाठीही पालिकेचे दवाखाने, आरोग्य केंद्रांसह रुग्णालयांत उपाययोजना कऱण्यात आल्या आहेत.

डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया हे आजार होऊ नये म्हणून आरोग्य विभाग काम करत आहे. २०१९ मध्ये ७६८ संशयित नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यातून ७५ जणांना डेंग्यूचे निदान झाले, तर एकाचा मृत्यू झाला.

महापालिकेतर्फे जुलै महिन्यापासून कंटेनर सर्व्हेक्षण सुरू आहे. यात महापालिकेचे कर्मचारी घरोघरी जाऊन पाण्याची तपासणी केली. वापरण्याच्या पाण्यात लारवा (अळी) आढळल्यास त्यात रसायन टाकण्यात आले. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मागील वर्षी ज्या परिसरात रुग्ण आढळला त्या परिसराची पाहणी करण्यात आली.

------

कुठल्यावर्षी किती रुग्ण

  • २०१६ - ५७९
  • २०१७ - ५५२
  • २०१८ - ५६८
  • २०१९ - ७५
  • २०२० - १३२

डेंग्यूची लक्षणे

  • - डेंग्‍यू तापाची लक्षणे ही इतर विषाणूजन्‍य गंभीर तापाच्‍या लक्षणांसारखीच असतात.
  • - अचानक चढणारा ताप, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी ही मुख्य लक्षणे
  • - डोकेदुखी, भूक मंदावणे, मळमळणे व पोटदुखी
  • - रक्‍तस्‍त्रावित डेंग्‍यू तापाचे निदान हे हात-पाय, चेहरा व मान यावर आलेल्‍या पुरळांवरून केले जाते.
  • - नाकातून, हिरड्यातून व गुदद्वारातून रक्‍तस्‍त्राव ही लक्षणे कमी प्रमाणात आढळून येतात.

------

२ लाख ९७ हजार २९७ घरांना प्रत्यक्ष भेटी

आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यातील विविध ठिकाणी पाहणी करण्यात येते. आरोग्यसेवकांकडून नागरिक साठवत असलेल्या पाण्यांची तपासणी करण्यात आली. गरज असल्यास त्यात औषधही टाकण्यात आले. २०२० मध्ये जिल्ह्यातीस २ लाख ९७ हजार २९७ घरांना भेटी देऊन पाण्याची तपासणी करण्यात आली. कोरोनामुळे नागरिकांनी स्वताची काळजी घेतली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वच्छतेचे महत्त्व जाणल्यामुळे यंदा डेंग्यू रुग्णांची संख्या कमी झाली आहे, असे सहाय्यक हिवताप अधिकारी विजय बागल यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यhospitalहॉस्पिटलdengueडेंग्यूcorona virusकोरोना वायरस बातम्या