शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

भरल्या नदीतून अंत्यसंस्कारासाठी जाताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST

नातलगांच्या जिवाचीही होतेय घालमेल लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : हरणा नदीला पूर आला तर मृताच्या नातेवाइकांना चिंता असते त्याच्या ...

नातलगांच्या जिवाचीही होतेय घालमेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : हरणा नदीला पूर आला तर मृताच्या नातेवाइकांना चिंता असते त्याच्या अंत्यसंस्काराची. ही व्यथा आहे शेती, शिक्षण आणि सर्वार्थाने प्रगती साधलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रगतिपथावर असलेल्या मुस्ती गावच्या ग्रामस्थांची.

हरणा नदीच्या काठावर वसलेले मुस्ती गाव. या नदीने गावाला समृद्धीच्या वाटेने नेले. शेत-शिवार हिरवेगार झाले. शेतीच्या क्षेत्रात मुस्तीचे नाव सातासमुद्रापार गेले. गावाच्या सर्वांगीण विकासात हरणा नदीच्या अस्तित्वाने मोठे योगदान दिले. याच नदीने जगण्यासाठी कित्येक पिढ्याना बळ दिले. मात्र मरणानंतर यातनांचा अडथळाही निर्माण केला. मृताच्या अंत्यसंस्काराची शेकडो वर्षांची चिंता कायम राहिली. प्रगतीच्या वाटेवर जाताना हीच हरणा नदी अधोगतीला कारणीभूत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत असतात.

गावाच्या बाहेर हरणा नदीच्या पल्याड स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात हरणा नदीला सातत्याने पूर येतो. एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नातलगांना दुःखाबरोबर अंत्यसंस्काराच्या चिंतेने ग्रासले जाते. नदीतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताच बंद होतो. त्यामुळे अनेकदा स्मशानभूमीऐवजी मिळेल त्या जागेत अंत्यविधी उरकण्याची दुर्दैवी वेळ नातलगावर येऊन ठेपते. गावाने भौतिक प्रगती साधली मात्र हरणा नदीवरचा पूल काही उभारता आला नाही याची खंत ग्रामस्थांना सतत बोचत असते.

-------

चार महिने शेती बेभरवशाची

पावसाळ्यात हरणा नदी दुतर्फा भरून वाहते. या काळात शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. पूर ओसरेपर्यंत भुकेल्या जनावरांची आणि शेतीची चिंता त्यांना सतावत असते. हरणा नदीवर पूल नसल्याने शेती बेभरवशाची बनली आहे. त्याचाच फटका शेतीला बसला. द्राक्षे, पपई, केळी या पिकात प्रगती साधलेल्या शेतकऱ्यांनी बेभरवशाच्या शेतीमुळे नगदी पिकांचा नाद सोडून दिला आणि उसाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

------

स्मशानभूमीचीही होतेय नेहमीच दुरवस्था

नदीपात्रालगत स्मशानभूमी असल्याने तिचा विकास करता येत नाही. त्यासाठी आतापर्यंत अनेकदा केलेला खर्च वाया गेला. भरपावसात अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ नातलगावर येते. हिंदूंची स्मशानभूमी या अवस्थेत आहे तर त्याच्यापुढे अर्ध्या किमीवर मुस्लीम स्मशानभूमी आहे. नदीवर पूल नसल्याने दोन्ही समाजाची अडचण होते. त्यासाठी पर्यायी जागाही नाही.

----

अनेक वर्षांपासून हरणा नदीवर पूल बांधण्याची आमची मागणी आहे. राजकारणात आम्हाला मोठी पदं मिळाली असली तरी या नदीवरचा पूल उभारण्यात अद्याप यश आले नाही. जून महिन्यात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना त्यासाठी साकडे घातले आहे.

- भीमाशंकर जमादार, माजी सभापती