शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

भरल्या नदीतून अंत्यसंस्कारासाठी जाताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST

नातलगांच्या जिवाचीही होतेय घालमेल लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : हरणा नदीला पूर आला तर मृताच्या नातेवाइकांना चिंता असते त्याच्या ...

नातलगांच्या जिवाचीही होतेय घालमेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : हरणा नदीला पूर आला तर मृताच्या नातेवाइकांना चिंता असते त्याच्या अंत्यसंस्काराची. ही व्यथा आहे शेती, शिक्षण आणि सर्वार्थाने प्रगती साधलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रगतिपथावर असलेल्या मुस्ती गावच्या ग्रामस्थांची.

हरणा नदीच्या काठावर वसलेले मुस्ती गाव. या नदीने गावाला समृद्धीच्या वाटेने नेले. शेत-शिवार हिरवेगार झाले. शेतीच्या क्षेत्रात मुस्तीचे नाव सातासमुद्रापार गेले. गावाच्या सर्वांगीण विकासात हरणा नदीच्या अस्तित्वाने मोठे योगदान दिले. याच नदीने जगण्यासाठी कित्येक पिढ्याना बळ दिले. मात्र मरणानंतर यातनांचा अडथळाही निर्माण केला. मृताच्या अंत्यसंस्काराची शेकडो वर्षांची चिंता कायम राहिली. प्रगतीच्या वाटेवर जाताना हीच हरणा नदी अधोगतीला कारणीभूत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत असतात.

गावाच्या बाहेर हरणा नदीच्या पल्याड स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात हरणा नदीला सातत्याने पूर येतो. एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नातलगांना दुःखाबरोबर अंत्यसंस्काराच्या चिंतेने ग्रासले जाते. नदीतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताच बंद होतो. त्यामुळे अनेकदा स्मशानभूमीऐवजी मिळेल त्या जागेत अंत्यविधी उरकण्याची दुर्दैवी वेळ नातलगावर येऊन ठेपते. गावाने भौतिक प्रगती साधली मात्र हरणा नदीवरचा पूल काही उभारता आला नाही याची खंत ग्रामस्थांना सतत बोचत असते.

-------

चार महिने शेती बेभरवशाची

पावसाळ्यात हरणा नदी दुतर्फा भरून वाहते. या काळात शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. पूर ओसरेपर्यंत भुकेल्या जनावरांची आणि शेतीची चिंता त्यांना सतावत असते. हरणा नदीवर पूल नसल्याने शेती बेभरवशाची बनली आहे. त्याचाच फटका शेतीला बसला. द्राक्षे, पपई, केळी या पिकात प्रगती साधलेल्या शेतकऱ्यांनी बेभरवशाच्या शेतीमुळे नगदी पिकांचा नाद सोडून दिला आणि उसाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

------

स्मशानभूमीचीही होतेय नेहमीच दुरवस्था

नदीपात्रालगत स्मशानभूमी असल्याने तिचा विकास करता येत नाही. त्यासाठी आतापर्यंत अनेकदा केलेला खर्च वाया गेला. भरपावसात अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ नातलगावर येते. हिंदूंची स्मशानभूमी या अवस्थेत आहे तर त्याच्यापुढे अर्ध्या किमीवर मुस्लीम स्मशानभूमी आहे. नदीवर पूल नसल्याने दोन्ही समाजाची अडचण होते. त्यासाठी पर्यायी जागाही नाही.

----

अनेक वर्षांपासून हरणा नदीवर पूल बांधण्याची आमची मागणी आहे. राजकारणात आम्हाला मोठी पदं मिळाली असली तरी या नदीवरचा पूल उभारण्यात अद्याप यश आले नाही. जून महिन्यात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना त्यासाठी साकडे घातले आहे.

- भीमाशंकर जमादार, माजी सभापती