शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
2
ना गोवा ना काश्मीर, २०२५ मध्ये लोकांनी 'गुगल'वर 'या' छोट्या शहराला सर्वाधिक केले सर्च
3
प्रवाशांचे हाल! मुंबई-पुण्यासह देशभरातील ६००हून अधिक इंडिगो विमानांचे उड्डाण रद्द!
4
Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी
5
जिद्दीला सलाम ! डोळ्याला इन्फेक्शन... तरीही गॉगल लावून मैदानात उतरला अन् पठ्ठाने शतकच ठोकलं
6
आसिम मुनीर यांची ताकद वाढली; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे 'हे' ५ मोठे अधिकार संपुष्टात!
7
पुतिन-मोदींची 'सरप्राइज राइड', सफेद रंगाच्या Fortuner ची सगळीकडे चर्चा, महाराष्ट्राशी कनेक्शन
8
Matthew Hayden: 'कपडे काढून धावेन' म्हणणारा मॅथ्यू हेडन जो रूटच्या शतकानंतर काय म्हणाला?
9
"आईशप्पथ हे पुन्हा करणार नाही"; तरुणाचा मास्टर प्लॅन बघून स्कॅमरने टेकले हात, लोकेशन कळताच आरोपी घाबरला
10
एआय: महासत्ता की महासंकट?, गरीब-श्रीमंतांमधील...; 'संयुक्त राष्ट्र संघा'ने या तंत्रज्ञानाबद्दल दिला गंभीर इशारा
11
टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
12
इन्स्टावरच्या गर्लफ्रेंडशी लग्न करायला पोहोचला तरुण; वरातही वाजत निघाली अन् अचानक मुलगी फोनच उचलेना..
13
BB 19: "असं संपायला नको होतं...", मालती चहर घराबाहेर गेल्यानंतर प्रणित मोरेची अशी अवस्था
14
काळजी घ्या! फोन नंबरद्वारे तुमचे लोकेशन ही वेबसाईट उघड करतेय; वैयक्तिक डेटा होतोय लीक
15
IND vs SA : श्रेयस अय्यर संघात आल्यावर ऋतुराज गायकवाडचं काय होणार? आर. अश्विन स्पष्टच बोलला
16
Parth Pawar Land Deal:२१ कोटींचे मुद्रांक शुल्क  आम्ही भरणारच नाही; पार्थ पवारांच्या कंपनीचा न्यायालयात नकार
17
पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक
18
सातपुड्यातील ‘दशरथ मांझी’! रायसिंग वळवी हातात फावडे, कुदळ घेऊन घाटमार्गातील बुजवताहेत खड्डे
19
Personal Loan चं प्रीपेमेंट केलं की क्रेडिट स्कोअरवर परिणाम होतो का? लोन बंद करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
20
ऐनवेळी इंडिगोचे विमान रद्द; नवविवाहित जोडप्याने व्हिडिओ कॉलवर लावली रिसेप्शनला हजेरी; आई-वडील बसले खुर्चीवर
Daily Top 2Weekly Top 5

भरल्या नदीतून अंत्यसंस्कारासाठी जाताना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:25 IST

नातलगांच्या जिवाचीही होतेय घालमेल लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : हरणा नदीला पूर आला तर मृताच्या नातेवाइकांना चिंता असते त्याच्या ...

नातलगांच्या जिवाचीही होतेय घालमेल

लोकमत न्यूज नेटवर्क

सोलापूर : हरणा नदीला पूर आला तर मृताच्या नातेवाइकांना चिंता असते त्याच्या अंत्यसंस्काराची. ही व्यथा आहे शेती, शिक्षण आणि सर्वार्थाने प्रगती साधलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रगतिपथावर असलेल्या मुस्ती गावच्या ग्रामस्थांची.

हरणा नदीच्या काठावर वसलेले मुस्ती गाव. या नदीने गावाला समृद्धीच्या वाटेने नेले. शेत-शिवार हिरवेगार झाले. शेतीच्या क्षेत्रात मुस्तीचे नाव सातासमुद्रापार गेले. गावाच्या सर्वांगीण विकासात हरणा नदीच्या अस्तित्वाने मोठे योगदान दिले. याच नदीने जगण्यासाठी कित्येक पिढ्याना बळ दिले. मात्र मरणानंतर यातनांचा अडथळाही निर्माण केला. मृताच्या अंत्यसंस्काराची शेकडो वर्षांची चिंता कायम राहिली. प्रगतीच्या वाटेवर जाताना हीच हरणा नदी अधोगतीला कारणीभूत असल्याची खंत ग्रामस्थ व्यक्त करीत असतात.

गावाच्या बाहेर हरणा नदीच्या पल्याड स्मशानभूमी आहे. पावसाळ्यात हरणा नदीला सातत्याने पूर येतो. एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्या नातलगांना दुःखाबरोबर अंत्यसंस्काराच्या चिंतेने ग्रासले जाते. नदीतून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताच बंद होतो. त्यामुळे अनेकदा स्मशानभूमीऐवजी मिळेल त्या जागेत अंत्यविधी उरकण्याची दुर्दैवी वेळ नातलगावर येऊन ठेपते. गावाने भौतिक प्रगती साधली मात्र हरणा नदीवरचा पूल काही उभारता आला नाही याची खंत ग्रामस्थांना सतत बोचत असते.

-------

चार महिने शेती बेभरवशाची

पावसाळ्यात हरणा नदी दुतर्फा भरून वाहते. या काळात शेतकऱ्यांची मोठी अडचण होते. पूर ओसरेपर्यंत भुकेल्या जनावरांची आणि शेतीची चिंता त्यांना सतावत असते. हरणा नदीवर पूल नसल्याने शेती बेभरवशाची बनली आहे. त्याचाच फटका शेतीला बसला. द्राक्षे, पपई, केळी या पिकात प्रगती साधलेल्या शेतकऱ्यांनी बेभरवशाच्या शेतीमुळे नगदी पिकांचा नाद सोडून दिला आणि उसाकडे वळण्याचा निर्णय घेतला.

------

स्मशानभूमीचीही होतेय नेहमीच दुरवस्था

नदीपात्रालगत स्मशानभूमी असल्याने तिचा विकास करता येत नाही. त्यासाठी आतापर्यंत अनेकदा केलेला खर्च वाया गेला. भरपावसात अंत्यविधी करण्याची दुर्दैवी वेळ नातलगावर येते. हिंदूंची स्मशानभूमी या अवस्थेत आहे तर त्याच्यापुढे अर्ध्या किमीवर मुस्लीम स्मशानभूमी आहे. नदीवर पूल नसल्याने दोन्ही समाजाची अडचण होते. त्यासाठी पर्यायी जागाही नाही.

----

अनेक वर्षांपासून हरणा नदीवर पूल बांधण्याची आमची मागणी आहे. राजकारणात आम्हाला मोठी पदं मिळाली असली तरी या नदीवरचा पूल उभारण्यात अद्याप यश आले नाही. जून महिन्यात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना त्यासाठी साकडे घातले आहे.

- भीमाशंकर जमादार, माजी सभापती