शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

सोलापूर जिल्ह्यात ३ लाख ४२ हजार मुलांना गोवर — रूबेलाचा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 15:50 IST

उदिष्ठाच्या ६0 टक्के काम: ग्रामीण भागात मिळतोय चांगला प्रतिसाद

ठळक मुद्दे३ लाख ९३ हजार ६४८ मुलांना लसीकरण करण्याचे उदिष्ठ३ लाख ४२ हजार म्हणजे ८६ टक्के उदिष्ठ पूर्ण झालेगोवर, रुबेला रोग प्रतिबंधासाठी शासनाने ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना ही लस देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम

सोलापूर: गोवर, रुबेला प्रतिबंधक लसीकरणाच्या मोहीमेत ६ डिसेंबर अखेर जिल्हयात ३ लाख ४१ हजार ९४२ मुलांना डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार यांनी शुक्रवारी दिली.

२७ नोव्हेंबरपासून लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य विभागाअंतर्गत ८ लाख ४७ हजार ४६८ तर ग्रामीण रुग्णालयाअतंर्गत १ लाख ३ हजार ३७६ मुलांना डोस देण्याचे उदिष्ठ आहे. त्याप्रमाणे लसीकरण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. आत्तापर्यंत मोहीमेला शाळा व पालकांचा चांगला प्रतिसाद मिळाला असून, दररोज सरासरी ८६ टक्के लसीकरण होत आहे. आत्तापर्यंत २२२८ शाळांमधून २४३६ लसीकरण सत्र घेण्यात आले. यामध्ये ३ लाख ९३ हजार ६४८ मुलांना लसीकरण करण्याचे उदिष्ठ दिले होते, त्यापैकी ३ लाख ४२ हजार म्हणजे ८६ टक्के उदिष्ठ पूर्ण झाले आहे. 

गोवर, रुबेला लस दिल्यानंतर भीतीने काही मुलांना चक्कर येण्याचे किरकोळ प्रकार घडले. पण या रोगांच्या विषाणूची गंभीरता लक्षात घेता पालकांनी कोणताही गैरसमज किंवा अफवांवर विश्वास न ठेवता ही लस मुलांना द्यावी असे आवाहन डॉ. जमादार यांनी केले आहे. जगातील १७३ देशात या रोगांना बळी पडणाºयांची ३६ टक्के इतकी संख्या भारतात आहे. जगात भारत डेंजर झोनमध्ये असल्याने गोवर, रुबेला रोग प्रतिबंधासाठी शासनाने ९ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना ही लस देण्याचा राष्ट्रीय कार्यक्रम घेतला आहे. आतापर्यंत २७ राज्यात ही मोहीम यशस्वी झालेली आहे. त्यामुळे शाळांमधील शिक्षकांनी या रोगांचे गांभीर्य पालकांना पटवून द्यावे. ही लस एकदम सुरक्षीत असून, आपल्या बालकाचा या रोगांपासून बचाव करणारी आहे. 

नाहीतर हे घडू शकते...गोवर, रुबेला हा आजार विषाणूमुळे होतो. मुलांना याची बाधा झाल्यावर न्युमोनिया, डायरेरिचा प्रभाव होऊन मृत्यू्चा धोका वाढतो. गरोदर मातांना लागण झाल्यावर जन्मणारे मूल कर्णबधीर, अंध किंवा हृदयाला छिद्र असणारे वा मृत असू शकते. याशिवाय लागण झाल्यावर गर्भपाताचा मोठा धोका आहे. या रोगाची लागण झाल्यावर औषध नाही, त्यामुळे उपचार हाच प्रतिबंध आहे. ही लस सुरक्षित असून, बालकांना टोचून घ्यावी. चक्कर येणे, ताप आल्यास कोणीही घाबरू नये. यासाठी आरोग्य विभागाची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे डॉ. जमादार यांनी सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदHealthआरोग्यGovernmentसरकार