शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

'लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, पैसे नसतील तर राज्यपालांचा बंगला विका'; बच्चू कडूंचा सरकारला घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 12:56 IST

Bachchu Kadu : आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारला 'लाडकी बहीण' योजनेवरुन घरचा आहेर दिला आहे.

Bachchu Kadu ( Marathi News ) : राज्य सरकारने महिलांसाठी 'लाडकी बहीण योजना' सुरू केली आहे. या योजनेत महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळणार आहेत. या योजनेवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. दोन दिवसापूर्वी वित्त विभागातूनही या योजनेला विरोध असल्याची चर्चा सुरू आहेत. आता आमदार बच्चू कडू यांनीच राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे. " लाडकी बहीण ऐवजी कष्ट करणाऱ्यांना पैसे द्या, यासाठी पैसे नसतील तर राज्यपाल यांच्या बंगल्याची जागा विका',असा सल्लाही आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. 

Anil Deshmukh News ...तर ठाकरे पिता पुत्र आज जेलमध्ये असते; अनिल देशमुखांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप

"दुधाला भाव द्या, कामगाराला मजुरी द्या. चालकांसाठी चांगली योजना असली पाहिजे, यासाठी पैसे नसतील मी त्यांना चांगला पर्याय देतो. त्यांनी राज्यपाल यांचा ४० एकरातील बंगला विकावा. त्याचे एक लाख कोटी रुपयांपर्यंत पैसे येतील. ते पैसे तिकडे वापरा. राज्यपाल यांना ४० एकर जागा कशाला हवी? त्यांना नवीन तीन, चार मजली इमारत बांधून द्या, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. 

'योजना कष्टकऱ्यांसाठी पाहिजेत'

योजना आणायला काही हरकत नाही, पण त्या योजना कोणासाठी आणाव्यात हे महत्वाचं आहे. योजना कष्टकऱ्यांसाठी असायला पाहिजेत, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

देशात श्रीमंतच अधिक श्रीमंत होत चालला आहे. मुंबईत पारसींकडे महत्वाची ६ हजार एकर जमीन आहे. इंग्रजांकडून त्यांनी बक्षिस म्हणून मिळवली. कष्ट करणाऱ्यांना वन बीएचके घर भेटणे खूप मोठं झालं आहे. कष्ट करणाऱ्यांचे मूल्य जपलं पाहिजे. सरकारला आम्ही शेतकऱ्यांचा वाटा बजेटमध्ये किती आहे हे विचारत आहे. त्यांचा या बजेटमध्ये वाटाच दिसत नाही, असा आरोपही बच्चू कडू यांनी केला. सध्या मोठी विषमता सुरू आहे. ही विषमता तोडली पाहिजे. यासाठी आम्ही ९ ऑगस्टला संभाजीनगरला मोठ्या मोर्चाचे आयोजन करत आहोत, असंही आमदार कडू म्हणाले.  

"आम्ही विधानसभेसाठी संघटन करत आहोत, आता आमचे दोन ते तीन सदस्य आहेत. आता आम्ही २० ते २५ जागांसाठी तयारी करत आहोत. आतापर्यंत आम्हाला अनेकांचे अर्ज आले आहेत, असंही बच्चू कडू म्हणाले. काँग्रेसनेही ज्या योजना आणल्या त्याच योजना आता महायुती सुद्धा आणत आहे. आम्ही आता त्यांना मागण्यांचे पत्र देणार आहे, त्यात आम्ही १६ मुद्दे देणार आहोेत. त्या योजना पूर्ण केल्या तर आम्ही निवडणुकाच लढणार नाही, महायुतीने मान्य केलं तर महायुतीला पाठिंबा देणार. महाविकास आघाडीने मान्य केलं तर त्यांना पाठिंबा देणार, असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडूBJPभाजपाShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे