शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पहिली उचल तीन हजार रूपये द्या, ऊसदराबाबत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी संघटना ठाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:37 IST

माढा तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असून ५ साखर कारखाने आहेत. पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी, या मागणीवर सर्व शेतकरी संघटना ठाम असल्याने संघटनेचे नेते जोमात तर शेतकरी मात्र कोमात अशी अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देसंघटनांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या कारखानदारांना परवडत नाहीतआंदोलनामध्ये स्वाभिमानी, बळीराजा, प्रहार आदी संघटना अग्रभागी महिनाभर आंदोलने करुन देखील पदरात काही पडत नसल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक

 इरफान शेख कुर्डूवाडी दि १६ : माढा तालुक्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक असून ५ साखर कारखाने आहेत. पहिली उचल ३ हजार रुपये मिळावी, या मागणीवर सर्व शेतकरी संघटना ठाम असल्याने संघटनेचे नेते जोमात तर शेतकरी मात्र कोमात अशी अवस्था झाली आहे. तर इकडे संघटनांच्या अव्वाच्या सव्वा मागण्या कारखानदारांना परवडत नाहीत, असे कारखानदारांचे म्हणणे आहे. परतीचा मान्सून जोरदार बरसल्याने अगोदरच हंगाम महिनाभर उशिरा सुरू झाला आहे.  त्यातच भविष्यात होणाºया अवकाळी पावसाची भीती, वाढत्या उन्हामुळे घटणारे टनेज, वेळेवर ऊस गेल्यावर खोडवा चांगला फुटतो यासाठी ऊस घालवायची धडपड ऊस उत्पादक करताना दिसून येत आहे; मात्र चाणाक्ष शेतकरी आपला ऊस वेळेवर जावा त्यानंतर आंदोलन तीव्र व्हावे, आपल्याला वाढीव दर मिळावा व सत्ताधाºयांबरोबरचीही सलगी कायम रहावी अशी दुहेरी चाल खेळताना दिसून येत आहेत.यावर्षी सुरुवातीलाच लागणी मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पुढील वर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न उद्भवणार आहे. आपला खोडवा, निडवा जाईल का नाही, यामुळे कारखानदारांचा रोष न पत्करलेला बरा ही मानसिकता गेटकेन ऊस उत्पादकांची झाली आहे. आंदोलनामध्ये स्वाभिमानी, बळीराजा, प्रहार आदी संघटना अग्रभागी आहेत तर जनहित, रयत क्रांती सेना, भूमाता, रघुनाथ पाटील प्रणित शेतकरी संघटना आदींनी निवेदने देऊन वातावरण तापत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महिनाभर आंदोलने करुन देखील पदरात काही पडत नसल्याने शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक होत आहेत.  सहकारमंत्र्यांच्या घरासमोर धरणे आंदोलन, रक्तदान शिबीर, त्यांच्या दोन्ही साखर कारखान्यांपुढे घंटानाद आंदोलन करण्यासाठी बहुसंख्येने सोलापूरला उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते करीत आहेत. सहकारमंत्री व पालकमंत्री यांच्यातील किनारही दिसून येत आहे अंतर्गत मतभेदाचे राजकारण शेतकरी प्रश्नाच्या बाबतीत तरी करु नये, अशी भावना सामान्य शेतकºयांची आहे.----------------------मगच ऊसतोड करु द्या- शासन जो दर ठरवेल तो देण्यास आम्ही बांधिल आहोत. शेतकºयांनी ऊस गाळपासाठी द्यावा, संघटनांनी शांततेच्या माध्यमातून आंदोलने करावीत, वाहतूकदारांचे नुकसान टाळावे, असे आवाहन कारखानदार करीत आहेत, तर संघटना केवळ साखरेच्या भावाचाच विचार न करता मोलॅसिस, बगॅस, इथेनॉल, को-जनरेशन या माध्यमातून मिळणाºया उत्पादनाचा हिशोब शेतकºयांना पटवून देत आधी दर जाहीर करा मगच ऊस तोड करु द्या, असे आवाहन शेतकºयांना करीत आहेत.