शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
6
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
7
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
8
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
9
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
10
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
11
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
12
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
13
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
14
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
15
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
16
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
17
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
18
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
19
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
20
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा

स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म, श्राद्धविधी लांबणीवर टाकण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 11:44 AM

पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती; धर्मशास्त्र संमत, कोरोना लॉकडाउंनमुळे केले मार्गदर्शन

ठळक मुद्देएखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे वेळेवर दहन करावे लागतेदहावा, अकरावा व बाराव्या दिवसाचे विधी करणे सगळीकडे रूढ आहेवातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म

सोलापूर : स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध हे विधी केले जातात. यासाठी अनेक लोक एकत्र येतात. तसेच या विधीसाठी गुरुजींची देखील गरज असते. मात्र, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून असे लोक एकत्र येणे टाळणे गरजेचे आहे. म्हणून हे संकट निवळल्यानंतरही अंत्यकर्म व श्राद्ध करता येते, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने लॉकडाउनचा आदेश लागू केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या काळात घाटावरील विधी करावयाचे असल्यास लोक एकत्र येतात; पण या स्थितीत हा आजार जास्त पसरू शकतो, याचा विधी पुढे ढकलणे शक्य आहे, असे पंचांगकर्ते दाते म्हणाले. या काळात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर धार्मिक विधी करताना अडचणी येतात. यामुळे दाते यांनी हे मार्गदर्शन केले आहे. 

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे वेळेवर दहन करावे लागते. मात्र, अंत्यकर्म नंतरही करता येऊ शकते. दहावा, अकरावा व बाराव्या दिवसाचे विधी करणे सगळीकडे रूढ आहे. घाटावरील विधी करताना लोक व गुरुजी न येणे या अडचणी होऊ शकतात. हे विधी संकट निवळल्यावरही करता येतात. वातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते. हे धर्मशास्त्रास संमत आहे. मंत्राग्नी झालेला नसेल तर सर्व अस्थी विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधी करून, मग नवव्यापर्यंतचे विधी करावेत. त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे, घरातील दिवा अकराव्या दिवशी विसर्जित करावा, तसेच सुतक अकराव्या दिवशी संपते. त्यामुळे इतर सर्व व्यवहार, घरातील पूजा सुतक संपल्यामुळे करता येईल, असे पंचांगकर्ते  दाते यांनी सांगितले.

प्रथम वर्ष श्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्धसुद्धा जर त्या तिथीला करणे जमले नाही तर, वातावरण निवळल्यावर अष्टमी किंवा व्यतिपात किंवा अमावस्या यापैकी कोणत्याही एका दिवशी अंतरीत प्रथम वर्ष श्राद्ध किंवा दर वर्षीचे श्राद्ध करावे, असे अंतरीत श्राद्ध करणे धर्मशास्त्र संमत आहे.- मोहन दाते, पंचांगकर्ते

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस