शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म, श्राद्धविधी लांबणीवर टाकण्यास मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 11:48 IST

पंचागकर्ते मोहन दाते यांची माहिती; धर्मशास्त्र संमत, कोरोना लॉकडाउंनमुळे केले मार्गदर्शन

ठळक मुद्देएखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे वेळेवर दहन करावे लागतेदहावा, अकरावा व बाराव्या दिवसाचे विधी करणे सगळीकडे रूढ आहेवातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म

सोलापूर : स्मशानातील कर्तव्य पूर्ण केल्यानंतर अंत्यकर्म व श्राद्ध हे विधी केले जातात. यासाठी अनेक लोक एकत्र येतात. तसेच या विधीसाठी गुरुजींची देखील गरज असते. मात्र, कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून असे लोक एकत्र येणे टाळणे गरजेचे आहे. म्हणून हे संकट निवळल्यानंतरही अंत्यकर्म व श्राद्ध करता येते, असे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

कोरोना आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी शासनाने लॉकडाउनचा आदेश लागू केला आहे. १४ एप्रिलपर्यंत हा आदेश लागू असणार आहे. या काळात घाटावरील विधी करावयाचे असल्यास लोक एकत्र येतात; पण या स्थितीत हा आजार जास्त पसरू शकतो, याचा विधी पुढे ढकलणे शक्य आहे, असे पंचांगकर्ते दाते म्हणाले. या काळात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर धार्मिक विधी करताना अडचणी येतात. यामुळे दाते यांनी हे मार्गदर्शन केले आहे. 

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचे वेळेवर दहन करावे लागते. मात्र, अंत्यकर्म नंतरही करता येऊ शकते. दहावा, अकरावा व बाराव्या दिवसाचे विधी करणे सगळीकडे रूढ आहे. घाटावरील विधी करताना लोक व गुरुजी न येणे या अडचणी होऊ शकतात. हे विधी संकट निवळल्यावरही करता येतात. वातावरण निवळल्यावर चार दिवस सवडीचे काढून १० ते १४ दिवसांचे कर्म अंतरीत म्हणून करता येते. हे धर्मशास्त्रास संमत आहे. मंत्राग्नी झालेला नसेल तर सर्व अस्थी विसर्जन कराव्यात आणि पुढे अंत्यकर्म करताना आधी पालाश विधी करून, मग नवव्यापर्यंतचे विधी करावेत. त्याच दिवशी दहाव्याचे कर्म करावे, घरातील दिवा अकराव्या दिवशी विसर्जित करावा, तसेच सुतक अकराव्या दिवशी संपते. त्यामुळे इतर सर्व व्यवहार, घरातील पूजा सुतक संपल्यामुळे करता येईल, असे पंचांगकर्ते  दाते यांनी सांगितले.

प्रथम वर्ष श्राद्ध किंवा दरवर्षीचे श्राद्धसुद्धा जर त्या तिथीला करणे जमले नाही तर, वातावरण निवळल्यावर अष्टमी किंवा व्यतिपात किंवा अमावस्या यापैकी कोणत्याही एका दिवशी अंतरीत प्रथम वर्ष श्राद्ध किंवा दर वर्षीचे श्राद्ध करावे, असे अंतरीत श्राद्ध करणे धर्मशास्त्र संमत आहे.- मोहन दाते, पंचांगकर्ते

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस