शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

सोलापूर जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे आता अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:07 IST

सोलापूर : ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेताकडे जाण्यासाठी अनेक शेतकºयांना रस्ताच नसल्याने पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून ...

ठळक मुद्देपालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून २५४ किलोमीटर रस्त्यांचे काम  अंतिम टप्प्यातशेतकºयांना किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी शिवारातून चांगल्या रस्त्यातून शेताकडे जाण्याची सोय झाली

सोलापूर : ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेताकडे जाण्यासाठी अनेक शेतकºयांना रस्ताच नसल्याने पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून २५४ किलोमीटर रस्त्यांचे काम  अंतिम टप्प्यात असून, यामुळे शेतकºयांना किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी शिवारातून चांगल्या रस्त्यातून शेताकडे जाण्याची सोय झाली आहे.

अक्कलकोट तालुक्यात या योजनेतून ११ किलोमीटरपर्यंत रस्ते करण्यात येत आहेत. यासाठी ५ लाख ५0 हजारांचा निधी मंजूर आहे. बार्शी तालुक्यात १३ किलोमीटरपर्यंत पाणंद रस्ते करण्यात येत आहेत. यासाठी ६ लाख ५0 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील २0 किलोमीटरच्या रस्त्यासाठी १0 लाखांचा निधी देण्यात आला आहे. माढा तालुक्यातील २६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३ लाखांचा निधी देण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील २९ किलोमीटरच्या कामासाठी १४ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. 

मंगळवेढा तालुक्यातील १२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ लाख ७५ हजारांचा निधी देण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील ३0 किलोमीटरच्या रस्त्यासाठी १४ लाख ९0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील ४१ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यासाठी २0 लाख ६२ हजारांचा निधी देण्यात आला आहे. सांगोला तालुक्यातील २७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ लाख ४0 हजार तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १७ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. 

१ कोटी २७ लाखांचा निधी गेला मातीत- पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून एका कामासाठी ५0 हजारांचा निधी देण्यात येत आहे. या रकमेत केवळ अर्धा किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर माती टाकता येणे शक्य आहे. ही माती पावसाळ्यात पुन्हा वाहून जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत या योजनेतून दिलेला १ कोटी २७ लाखांचा निधी मातीतच वाहून जाणार, अशी प्रतिक्रिया शेतकºयांतून उमटत आहे.

निधी वाढविण्याची मागणी- पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून केवळ तात्पुरते काम होणार आहे. शेतकºयांसाठी पाणंद रस्ते उपलब्ध होण्यासाठी खडीकरण व डांबरीकरणाची गरज आहे. डांबरीकरणाचा खर्च मोठा असल्याने किमान खडीकरण करण्याइतपत तरी निधीची तरतूद या योजनेतून करण्यात यावी, अशी अपेक्षा कारंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या सुतार यांनी व्यक्त केली . 

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरीagricultureशेतीVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख