शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सोलापूर जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे आता अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:07 IST

सोलापूर : ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेताकडे जाण्यासाठी अनेक शेतकºयांना रस्ताच नसल्याने पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून ...

ठळक मुद्देपालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून २५४ किलोमीटर रस्त्यांचे काम  अंतिम टप्प्यातशेतकºयांना किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी शिवारातून चांगल्या रस्त्यातून शेताकडे जाण्याची सोय झाली

सोलापूर : ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेताकडे जाण्यासाठी अनेक शेतकºयांना रस्ताच नसल्याने पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून २५४ किलोमीटर रस्त्यांचे काम  अंतिम टप्प्यात असून, यामुळे शेतकºयांना किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी शिवारातून चांगल्या रस्त्यातून शेताकडे जाण्याची सोय झाली आहे.

अक्कलकोट तालुक्यात या योजनेतून ११ किलोमीटरपर्यंत रस्ते करण्यात येत आहेत. यासाठी ५ लाख ५0 हजारांचा निधी मंजूर आहे. बार्शी तालुक्यात १३ किलोमीटरपर्यंत पाणंद रस्ते करण्यात येत आहेत. यासाठी ६ लाख ५0 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील २0 किलोमीटरच्या रस्त्यासाठी १0 लाखांचा निधी देण्यात आला आहे. माढा तालुक्यातील २६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३ लाखांचा निधी देण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील २९ किलोमीटरच्या कामासाठी १४ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. 

मंगळवेढा तालुक्यातील १२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ लाख ७५ हजारांचा निधी देण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील ३0 किलोमीटरच्या रस्त्यासाठी १४ लाख ९0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील ४१ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यासाठी २0 लाख ६२ हजारांचा निधी देण्यात आला आहे. सांगोला तालुक्यातील २७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ लाख ४0 हजार तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १७ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. 

१ कोटी २७ लाखांचा निधी गेला मातीत- पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून एका कामासाठी ५0 हजारांचा निधी देण्यात येत आहे. या रकमेत केवळ अर्धा किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर माती टाकता येणे शक्य आहे. ही माती पावसाळ्यात पुन्हा वाहून जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत या योजनेतून दिलेला १ कोटी २७ लाखांचा निधी मातीतच वाहून जाणार, अशी प्रतिक्रिया शेतकºयांतून उमटत आहे.

निधी वाढविण्याची मागणी- पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून केवळ तात्पुरते काम होणार आहे. शेतकºयांसाठी पाणंद रस्ते उपलब्ध होण्यासाठी खडीकरण व डांबरीकरणाची गरज आहे. डांबरीकरणाचा खर्च मोठा असल्याने किमान खडीकरण करण्याइतपत तरी निधीची तरतूद या योजनेतून करण्यात यावी, अशी अपेक्षा कारंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या सुतार यांनी व्यक्त केली . 

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरीagricultureशेतीVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख