शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सोलापूर जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांची कामे आता अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 13:07 IST

सोलापूर : ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेताकडे जाण्यासाठी अनेक शेतकºयांना रस्ताच नसल्याने पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून ...

ठळक मुद्देपालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून २५४ किलोमीटर रस्त्यांचे काम  अंतिम टप्प्यातशेतकºयांना किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी शिवारातून चांगल्या रस्त्यातून शेताकडे जाण्याची सोय झाली

सोलापूर : ग्रामीण भागात शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. शेताकडे जाण्यासाठी अनेक शेतकºयांना रस्ताच नसल्याने पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून २५४ किलोमीटर रस्त्यांचे काम  अंतिम टप्प्यात असून, यामुळे शेतकºयांना किमान उन्हाळ्याच्या दिवसात तरी शिवारातून चांगल्या रस्त्यातून शेताकडे जाण्याची सोय झाली आहे.

अक्कलकोट तालुक्यात या योजनेतून ११ किलोमीटरपर्यंत रस्ते करण्यात येत आहेत. यासाठी ५ लाख ५0 हजारांचा निधी मंजूर आहे. बार्शी तालुक्यात १३ किलोमीटरपर्यंत पाणंद रस्ते करण्यात येत आहेत. यासाठी ६ लाख ५0 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. करमाळा तालुक्यातील २0 किलोमीटरच्या रस्त्यासाठी १0 लाखांचा निधी देण्यात आला आहे. माढा तालुक्यातील २६ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३ लाखांचा निधी देण्यात आला आहे. माळशिरस तालुक्यातील २९ किलोमीटरच्या कामासाठी १४ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. 

मंगळवेढा तालुक्यातील १२ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ लाख ७५ हजारांचा निधी देण्यात आला आहे. मोहोळ तालुक्यातील ३0 किलोमीटरच्या रस्त्यासाठी १४ लाख ९0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. पंढरपूर तालुक्यातील ४१ किलोमीटरच्या पाणंद रस्त्यासाठी २0 लाख ६२ हजारांचा निधी देण्यात आला आहे. सांगोला तालुक्यातील २७ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १३ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील ११ किलोमीटरच्या रस्त्यासाठी ५ लाख ४0 हजार तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ३५ किलोमीटरच्या रस्त्यासाठी १७ लाख ५0 हजारांचा निधी देण्यात आला आहे. 

१ कोटी २७ लाखांचा निधी गेला मातीत- पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून एका कामासाठी ५0 हजारांचा निधी देण्यात येत आहे. या रकमेत केवळ अर्धा किलोमीटरपर्यंतच्या रस्त्यावर माती टाकता येणे शक्य आहे. ही माती पावसाळ्यात पुन्हा वाहून जाणार आहे. त्यामुळे आतापर्यंत या योजनेतून दिलेला १ कोटी २७ लाखांचा निधी मातीतच वाहून जाणार, अशी प्रतिक्रिया शेतकºयांतून उमटत आहे.

निधी वाढविण्याची मागणी- पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून केवळ तात्पुरते काम होणार आहे. शेतकºयांसाठी पाणंद रस्ते उपलब्ध होण्यासाठी खडीकरण व डांबरीकरणाची गरज आहे. डांबरीकरणाचा खर्च मोठा असल्याने किमान खडीकरण करण्याइतपत तरी निधीची तरतूद या योजनेतून करण्यात यावी, अशी अपेक्षा कारंबा ग्रामपंचायतीच्या सरपंच कौशल्या सुतार यांनी व्यक्त केली . 

टॅग्स :Solapurसोलापूरroad transportरस्ते वाहतूकFarmerशेतकरीagricultureशेतीVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुख