शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
4
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
5
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
6
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
7
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
8
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
9
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
10
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
11
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
12
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
13
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
14
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
15
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
16
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
17
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
18
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
19
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
20
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य

महापारेषणच्या २२० केव्ही वाहिनीचे चार मोठे मनोरे वादळामुळे कोसळले

By appasaheb.patil | Updated: May 22, 2020 13:02 IST

भाळवणी-माळीनगर भागातील घटना; निकृष्ट काम करणाºया कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणी

ठळक मुद्देनिकृष्ट काम करणाºया कंत्राटदाराची चौकशी करण्याची मागणीसंबंधित निकृष्ट काम करणाºया कंत्राटदाराची चौकशी सुरूदोषींवर कारवाई करण्याचे मुख्य अभियंत्यांचे संकेत

सोलापूर : महापारेषण कंपनीच्या पुणे परिमंडलांतर्गत सध्या २२० केव्ही भाळवणी-माळीनगर वाहिनीच्या उभारणीचे काम सुरू आहे. या वाहिनीचे काम शेवटच्या टप्प्यात आले असून एक किमी अंतराचे काम शिल्लक राहिले आहे. वाहिनीचे कंडक्टर ओढण्याचे काम सुरू असताना या वाहिनीचे चार मनोरे वादळी वाºयामुळे कोसळले. या घटनेत कंत्राटदाराचे दोन कामगार जखमी झाल्याची घटना बुधवार २० मे रोजी घडली. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने ऊर्जामंत्र्यांकडे निवेदनाव्दारे केली आहे.

महापारेषणच्या पुणे परिमंडलांतर्गत येणाºया सर्वच भागात सध्या उपकेंद्र, वाहिन्या उभारणीचे काम सुरू आहे. एवढेच नव्हे वीजजोडणीचेही काम वेगाने होत आहे. खासगी कंत्राटदाराच्या माध्यमातून २२० केव्ही भाळवणी - माळीनगर वाहिनीचे काम मागील काही वर्षांपासून सुरू होते. 

मार्चअखेर हे काम पूर्ण होणार होते; मात्र कामाची गती मंदावल्याने हे काम पूर्ण होण्यास मे महिना उजाडला. त्यात कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाली अन् काम आणखीन काही महिने थांबले. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात हे काम पुन्हा सुरू करण्यात आले; मात्र २० मे २०२० रोजी उभा करण्यात आलेले चार मनोरे वादळी वाºयामुळे कोसळले. कोसळलेल्या मनोºयामुळे या परिसरातील शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले. शिवाय पूर्ण होणारे काम आणखीन वर्षभरापर्यंत तरी वाढणार असल्याचे दिसून येते.

लॉकडाऊन काळात काम कसे चालू होते?- महापारेषणच्या वतीने उभारण्यात येणारे भाळवणी ते माळीनगरच्या मनोरा उभारणीचे काम लॉकडाऊन काळात कसे सुरू होते असा सवाल महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने ऊर्जामंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. स्थानिक प्रशासनाची परवानगी संबंधित कंत्राटदाराने घेतली किंवा महापारेषणने घेतली होती का ? सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले होते का ? सुरक्षिततेबाबत काय काय उपाययोजना होत्या ? असे अनेक प्रश्न वर्कर्स फेडरेशनने निवेदनाव्दारे उपस्थित केले आहेत. लॉकडाऊनच्या काळात काम पूर्ण करण्याच्या नादात पडलेले मनोरे उभे करण्यासाठी ८ महिन्यांचा काळ लागेल असे महापारेषणकडून सांगण्यात आले.

भाळवणी-माळीनगर वाहिनीच्या कोसळलेल्या कामांची चौकशी व्हावी, संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, भविष्यात असे निकृष्ट कामाचे नमुने पुढे येणार नाही याबाबत महापारेषण प्रशासनाने काळजी घ्यावी. कामांच्या गुणवत्तेबाबत जे अभियंते, कर्मचारी दखल घेत नाहीत त्यांच्यावरही कारवाई करावी. यापुढील कामासाठी पुरेसे मनुष्यबळ देऊन पूर्वीप्रमाणेच उपकेंद्र व वाहिन्यांच्या उभारणीची कामे ही कंपनी कर्मचाºयांकडूनच करावी.- कृष्णा भोयर, सरचिटणीस, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार आवश्यक त्या परवानग्या घेऊनच भाळवणी ते माळीनगर दरम्यानच्या मनोरा उभारणीचे काम कंत्राटदारामार्फत केले आहे. मनोरे पडले आहेत याबाबतची चौकशी करण्यात येत आहे. अशा घटना वारंवार घडू नये यासाठी महापारेषणकडून दक्षता घेण्यात येत आहे.या प्रकरणाची खोलवर जाऊन चौकशी करू, कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई करू.- वंदनकुमार मेंढे, मुख्य अभियंता, महापारेषण, पुणे परिमंडल

टॅग्स :SolapurसोलापूरmahavitaranमहावितरणRainपाऊस