शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

एक किलो पेढ्याच्या खव्यासाठी म्हशीचे चार तर गायीचे साडेपाच लिटर लागते दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:00 IST

पंढरपुरी पेढ्याला भाविकांची पसंती; आषाढीसाठी बाहेरूनही येतात पेढे विक्रेते

ठळक मुद्देआषाढी वारीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतातप्रत्येक वारकरी विठ्ठलाचा प्रसाद म्हणून पंढरपुरातील पेढ्याची खरेदी नक्कीच करतोपंढरीत लाड, कुलकर्णी, देशपांडे या मोठ्या व्यापाºयांसह अनेक लहान-मोठे व्यावसायिक पेढा विक्री करतात

ज्योतिराम शिंदे

पंढरपूर : पेढा तयार करण्यासाठी लागणाºया एक किलो खव्यासाठी म्हशीचे चार लिटर तर गायीच्या साडेपाच लिटर दुधाचा वापर केला जातो, असे पेहे येथील खवा व्यावसायिक पिंटू पाटील यांनी सांगितले.

पंढरपुरातील काही व्यापारी येथीलच खवा बाजारासह सोलापूर, येरमाळा येथून खव्याची खरेदी करतात. हा पेढा तयार करण्यासाठी लागणारा खवा वातानुकूलित वातावरणात ठेवला तर साधारणत: दोन ते तीन आठवडे चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतो़ या खव्यापासून बनविलेला पेढा साधारण एक ते दीड महिना खाण्यायोग्य राहतो, असे स्थानिक व्यापाºयांनी सांगितले.

आषाढी वारीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी प्रत्येक वारकरी विठ्ठलाचा प्रसाद म्हणून पंढरपुरातील पेढ्याची खरेदी नक्कीच करतो. हा पेढा तयार करण्यासाठी लागणारा खवा वातानुकूलित वातावरणात ठेवला तर दोन ते तीन आठवडे चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतो़ या खव्यापासून बनविलेला पेढाही एक ते दीड महिना खाण्यायोग्य असतो.

पंढरीत लाड, कुलकर्णी, देशपांडे या मोठ्या व्यापाºयांसह अनेक लहान-मोठे व्यावसायिक पेढा विक्री करतात. पंढरीत शनिवार आणि मंगळवार असे दोन दिवस खव्याचा बाजार भरतो. या बाजारामध्ये खेडभाळवणी, मेंढापूर, खेडभोसे, व्होळे, गुरसाळे, पेहे, बार्डी येथील शेतकरी म्हशीच्या दुधापासून घरीच खवा तयार करून बाजारात विक्रीसाठी आणतात. तसेच काही खवा विक्रेते स्थानिक शेतकºयांकडून दुधाची खरेदी करून मशीनद्वारेही खवा तयार करतात. आषाढी वारीपूर्वी दोन दिवस कर्नाटक, उस्मानाबाद, कुंथलगिरी, बीडसह मराठवाड्यातूनही काही व्यावसायिक पेढा विक्रीसाठी आणतात.

आषाढी वारीच्या कालावधीमध्ये प्रत्येक पेढे विक्रेते साधारणत: १०० ते १२५ किलोपर्यंत पेढ्याची विक्री करतात. यातून सात-आठ दिवसांच्या वारीकाळात सुमारे ४५ ते ५० टन पेढ्याची विक्री केली जाते.

खव्यातील साखरेच्या प्रमाणानुसार दर्जा- खव्यामध्ये किती साखर वापरायची याचे प्रमाण ठरलेले असते़ त्यानुसारच पेढ्याचा दर्जा ठरतो़ उत्कृष्ट दर्जाचा पेढा तयार करण्यासाठी ७५ टक्के खवा आणि २५ टक्के साखरेचा वापर केला जातो. मध्यम दर्जाचा पेढा तयार करण्यासाठी ५० टक्के खवा आणि ५० टक्के साखरेचा वापर करतात. याबरोबरच २५ टक्के खवा आणि ७५ टक्के साखरेचा वापर करूनही काही व्यापारी पेढा तयार करतात. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी