शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

एक किलो पेढ्याच्या खव्यासाठी म्हशीचे चार तर गायीचे साडेपाच लिटर लागते दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 13:00 IST

पंढरपुरी पेढ्याला भाविकांची पसंती; आषाढीसाठी बाहेरूनही येतात पेढे विक्रेते

ठळक मुद्देआषाढी वारीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतातप्रत्येक वारकरी विठ्ठलाचा प्रसाद म्हणून पंढरपुरातील पेढ्याची खरेदी नक्कीच करतोपंढरीत लाड, कुलकर्णी, देशपांडे या मोठ्या व्यापाºयांसह अनेक लहान-मोठे व्यावसायिक पेढा विक्री करतात

ज्योतिराम शिंदे

पंढरपूर : पेढा तयार करण्यासाठी लागणाºया एक किलो खव्यासाठी म्हशीचे चार लिटर तर गायीच्या साडेपाच लिटर दुधाचा वापर केला जातो, असे पेहे येथील खवा व्यावसायिक पिंटू पाटील यांनी सांगितले.

पंढरपुरातील काही व्यापारी येथीलच खवा बाजारासह सोलापूर, येरमाळा येथून खव्याची खरेदी करतात. हा पेढा तयार करण्यासाठी लागणारा खवा वातानुकूलित वातावरणात ठेवला तर साधारणत: दोन ते तीन आठवडे चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतो़ या खव्यापासून बनविलेला पेढा साधारण एक ते दीड महिना खाण्यायोग्य राहतो, असे स्थानिक व्यापाºयांनी सांगितले.

आषाढी वारीच्या निमित्ताने राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीच्या सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी येतात. यावेळी प्रत्येक वारकरी विठ्ठलाचा प्रसाद म्हणून पंढरपुरातील पेढ्याची खरेदी नक्कीच करतो. हा पेढा तयार करण्यासाठी लागणारा खवा वातानुकूलित वातावरणात ठेवला तर दोन ते तीन आठवडे चांगल्या स्थितीमध्ये राहू शकतो़ या खव्यापासून बनविलेला पेढाही एक ते दीड महिना खाण्यायोग्य असतो.

पंढरीत लाड, कुलकर्णी, देशपांडे या मोठ्या व्यापाºयांसह अनेक लहान-मोठे व्यावसायिक पेढा विक्री करतात. पंढरीत शनिवार आणि मंगळवार असे दोन दिवस खव्याचा बाजार भरतो. या बाजारामध्ये खेडभाळवणी, मेंढापूर, खेडभोसे, व्होळे, गुरसाळे, पेहे, बार्डी येथील शेतकरी म्हशीच्या दुधापासून घरीच खवा तयार करून बाजारात विक्रीसाठी आणतात. तसेच काही खवा विक्रेते स्थानिक शेतकºयांकडून दुधाची खरेदी करून मशीनद्वारेही खवा तयार करतात. आषाढी वारीपूर्वी दोन दिवस कर्नाटक, उस्मानाबाद, कुंथलगिरी, बीडसह मराठवाड्यातूनही काही व्यावसायिक पेढा विक्रीसाठी आणतात.

आषाढी वारीच्या कालावधीमध्ये प्रत्येक पेढे विक्रेते साधारणत: १०० ते १२५ किलोपर्यंत पेढ्याची विक्री करतात. यातून सात-आठ दिवसांच्या वारीकाळात सुमारे ४५ ते ५० टन पेढ्याची विक्री केली जाते.

खव्यातील साखरेच्या प्रमाणानुसार दर्जा- खव्यामध्ये किती साखर वापरायची याचे प्रमाण ठरलेले असते़ त्यानुसारच पेढ्याचा दर्जा ठरतो़ उत्कृष्ट दर्जाचा पेढा तयार करण्यासाठी ७५ टक्के खवा आणि २५ टक्के साखरेचा वापर केला जातो. मध्यम दर्जाचा पेढा तयार करण्यासाठी ५० टक्के खवा आणि ५० टक्के साखरेचा वापर करतात. याबरोबरच २५ टक्के खवा आणि ७५ टक्के साखरेचा वापर करूनही काही व्यापारी पेढा तयार करतात. 

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी