शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

परराज्यातील मुलींची व्यथा: सगळं ठीक आहे, पण आम्हाला घरी जायचंय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 12:29 IST

लॉकडाउनचा परिणाम; नोकरीसाठी आल्या अन् २५ दिवसांपासून सोलापुरातच अडकून पडल्या

ठळक मुद्देलातूरमधील एका इन्स्टिट्यूूटमध्ये विजयपूर, हुबळी, धारवाड येथील मुली विविध कंपन्यांच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण घेतातलातूरमध्ये विविध ठिकाणी भाड्याने खोल्या घेऊन राहतातलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घरमालकांनी या रुम रिकाम्या करायला सांगितल्या

राकेश कदम

सोलापूर : इथे आमची राहायची, जेवणाची व्यवस्था आहे. औषधं, गोळ्यासुध्दा मिळतात. पण घर ते घर आहे शेवटी. आम्हाला घरी जायचंय, असं परप्रांतांतील अनेक मुली सांगताहेत. 

लातूरमधील एका इन्स्टिट्यूूटमध्ये विजयपूर, हुबळी, धारवाड येथील मुली विविध कंपन्यांच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण घेतात. लातूरमध्ये विविध ठिकाणी भाड्याने खोल्या घेऊन राहतात. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घरमालकांनी या रुम रिकाम्या करायला सांगितल्या. एका खासगी वाहनाने सर्व मुली सोलापूरमार्गे विजयपूरकडे निघाल्या होत्या. सोलापुरात त्यांची बस अडवून त्यांना नूतन विद्यालयातील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी केरळ, तामिळनाडू येथील मुले होती. मुले व मुली एकत्र नको म्हणून महापालिकेने मुलींसाठी अंत्रोळीकरनगर येथील पुष्पस्नेह मंगल कार्यालयातील निवारा केंद्र सुरू केले. इतर निवारा केंद्रांच्या तुलनेत हे एक चांगले निवारा केंद्र आहे. 

हुबळी येथील रमिझा नवर, नगिना शेख, पवित्रा नवर म्हणाल्या, आम्हाला सुरुवातीला सोलापुरात आणले तेव्हा आमची इथे राहायची इच्छा नव्हती. एकेदिवशी एक मॅडम आल्या. बाहेर पडलात तर तुम्हाला कोरोनाची बाधा होईल. तुमच्या गावाचे रस्ते बंद आहेत. तुम्हाला कुठेतरी अडकून पडावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे आम्ही इथे राहायचा निर्णय घेतला. घरची आठवण तर येते. व्हिडीओ कॉल करुन या ठिकाणी कसे वातावरण आहे हे घरच्यांना दाखवतो. दिवसभर बसून तर काय करायचे. कधी एकदा लॉकडाऊन संपेल याची वाट पाहतोय. 

विरंगुळा देण्याचा मनपा कर्मचाºयांचा प्रयत्न- महापालिकेतील शेफाली दिलपाक, सुचेता आमणगी या निवारा केंद्रातील मुलींची व्यवस्था पाहतात. पुष्पस्रेहच्या लॉनवर सायंकाळी फुटबॉल, बॅडमिंटनसह वातावरण हलके-फुलके करण्यासाठी खेळ रंगलेले असतात. घरापासून दूर असलेल्या या परप्रांतातील मुलींना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करीत असतात.  

अनुकंपा नोकरीसाठी आल्या, २५ दिवस सोलापुरातच अडकून पडल्या 

  • - अनुकंपावरील नोकरीचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मुंबईच्या नेहा कोंतम २० मार्च रोजी सोलापुरात आल्या होत्या. दुसºया दिवशी मुंबईला परतणार होत्या. तत्पूर्वी जनता कर्फ्यु जाहीर झाला. मुंबईकडे जाणारी वाहने बंद झाली. पतीने मुंबईतून खासगी वाहन पाठवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परवानगी दिली नाही.
  • - काही दिवस नातेवाईकांकडे राहिल्या. तिथे इतरांना त्रास नको म्हणून आता निवारा केंद्रात आल्या आहेत. गेले २५ दिवस मी सोलापुरात आहे. माझं घर, संसार सगळं मुंबईत आहे. उदगीरला सासर आहे. कुठेतरी जायची मला परवानगी द्या, असं आर्जव त्या करीत आहेत. 
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollegeमहाविद्यालय