शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
3
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
4
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
5
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
6
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
7
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
8
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
9
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
11
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
12
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
13
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
14
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
15
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
16
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
17
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
18
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
19
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
20
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील मुलींची व्यथा: सगळं ठीक आहे, पण आम्हाला घरी जायचंय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 12:29 IST

लॉकडाउनचा परिणाम; नोकरीसाठी आल्या अन् २५ दिवसांपासून सोलापुरातच अडकून पडल्या

ठळक मुद्देलातूरमधील एका इन्स्टिट्यूूटमध्ये विजयपूर, हुबळी, धारवाड येथील मुली विविध कंपन्यांच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण घेतातलातूरमध्ये विविध ठिकाणी भाड्याने खोल्या घेऊन राहतातलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घरमालकांनी या रुम रिकाम्या करायला सांगितल्या

राकेश कदम

सोलापूर : इथे आमची राहायची, जेवणाची व्यवस्था आहे. औषधं, गोळ्यासुध्दा मिळतात. पण घर ते घर आहे शेवटी. आम्हाला घरी जायचंय, असं परप्रांतांतील अनेक मुली सांगताहेत. 

लातूरमधील एका इन्स्टिट्यूूटमध्ये विजयपूर, हुबळी, धारवाड येथील मुली विविध कंपन्यांच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण घेतात. लातूरमध्ये विविध ठिकाणी भाड्याने खोल्या घेऊन राहतात. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घरमालकांनी या रुम रिकाम्या करायला सांगितल्या. एका खासगी वाहनाने सर्व मुली सोलापूरमार्गे विजयपूरकडे निघाल्या होत्या. सोलापुरात त्यांची बस अडवून त्यांना नूतन विद्यालयातील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी केरळ, तामिळनाडू येथील मुले होती. मुले व मुली एकत्र नको म्हणून महापालिकेने मुलींसाठी अंत्रोळीकरनगर येथील पुष्पस्नेह मंगल कार्यालयातील निवारा केंद्र सुरू केले. इतर निवारा केंद्रांच्या तुलनेत हे एक चांगले निवारा केंद्र आहे. 

हुबळी येथील रमिझा नवर, नगिना शेख, पवित्रा नवर म्हणाल्या, आम्हाला सुरुवातीला सोलापुरात आणले तेव्हा आमची इथे राहायची इच्छा नव्हती. एकेदिवशी एक मॅडम आल्या. बाहेर पडलात तर तुम्हाला कोरोनाची बाधा होईल. तुमच्या गावाचे रस्ते बंद आहेत. तुम्हाला कुठेतरी अडकून पडावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे आम्ही इथे राहायचा निर्णय घेतला. घरची आठवण तर येते. व्हिडीओ कॉल करुन या ठिकाणी कसे वातावरण आहे हे घरच्यांना दाखवतो. दिवसभर बसून तर काय करायचे. कधी एकदा लॉकडाऊन संपेल याची वाट पाहतोय. 

विरंगुळा देण्याचा मनपा कर्मचाºयांचा प्रयत्न- महापालिकेतील शेफाली दिलपाक, सुचेता आमणगी या निवारा केंद्रातील मुलींची व्यवस्था पाहतात. पुष्पस्रेहच्या लॉनवर सायंकाळी फुटबॉल, बॅडमिंटनसह वातावरण हलके-फुलके करण्यासाठी खेळ रंगलेले असतात. घरापासून दूर असलेल्या या परप्रांतातील मुलींना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करीत असतात.  

अनुकंपा नोकरीसाठी आल्या, २५ दिवस सोलापुरातच अडकून पडल्या 

  • - अनुकंपावरील नोकरीचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मुंबईच्या नेहा कोंतम २० मार्च रोजी सोलापुरात आल्या होत्या. दुसºया दिवशी मुंबईला परतणार होत्या. तत्पूर्वी जनता कर्फ्यु जाहीर झाला. मुंबईकडे जाणारी वाहने बंद झाली. पतीने मुंबईतून खासगी वाहन पाठवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परवानगी दिली नाही.
  • - काही दिवस नातेवाईकांकडे राहिल्या. तिथे इतरांना त्रास नको म्हणून आता निवारा केंद्रात आल्या आहेत. गेले २५ दिवस मी सोलापुरात आहे. माझं घर, संसार सगळं मुंबईत आहे. उदगीरला सासर आहे. कुठेतरी जायची मला परवानगी द्या, असं आर्जव त्या करीत आहेत. 
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollegeमहाविद्यालय