शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

परराज्यातील मुलींची व्यथा: सगळं ठीक आहे, पण आम्हाला घरी जायचंय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 12:29 IST

लॉकडाउनचा परिणाम; नोकरीसाठी आल्या अन् २५ दिवसांपासून सोलापुरातच अडकून पडल्या

ठळक मुद्देलातूरमधील एका इन्स्टिट्यूूटमध्ये विजयपूर, हुबळी, धारवाड येथील मुली विविध कंपन्यांच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण घेतातलातूरमध्ये विविध ठिकाणी भाड्याने खोल्या घेऊन राहतातलॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घरमालकांनी या रुम रिकाम्या करायला सांगितल्या

राकेश कदम

सोलापूर : इथे आमची राहायची, जेवणाची व्यवस्था आहे. औषधं, गोळ्यासुध्दा मिळतात. पण घर ते घर आहे शेवटी. आम्हाला घरी जायचंय, असं परप्रांतांतील अनेक मुली सांगताहेत. 

लातूरमधील एका इन्स्टिट्यूूटमध्ये विजयपूर, हुबळी, धारवाड येथील मुली विविध कंपन्यांच्या मार्केटिंगचे प्रशिक्षण घेतात. लातूरमध्ये विविध ठिकाणी भाड्याने खोल्या घेऊन राहतात. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर घरमालकांनी या रुम रिकाम्या करायला सांगितल्या. एका खासगी वाहनाने सर्व मुली सोलापूरमार्गे विजयपूरकडे निघाल्या होत्या. सोलापुरात त्यांची बस अडवून त्यांना नूतन विद्यालयातील निवारा केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी केरळ, तामिळनाडू येथील मुले होती. मुले व मुली एकत्र नको म्हणून महापालिकेने मुलींसाठी अंत्रोळीकरनगर येथील पुष्पस्नेह मंगल कार्यालयातील निवारा केंद्र सुरू केले. इतर निवारा केंद्रांच्या तुलनेत हे एक चांगले निवारा केंद्र आहे. 

हुबळी येथील रमिझा नवर, नगिना शेख, पवित्रा नवर म्हणाल्या, आम्हाला सुरुवातीला सोलापुरात आणले तेव्हा आमची इथे राहायची इच्छा नव्हती. एकेदिवशी एक मॅडम आल्या. बाहेर पडलात तर तुम्हाला कोरोनाची बाधा होईल. तुमच्या गावाचे रस्ते बंद आहेत. तुम्हाला कुठेतरी अडकून पडावे लागेल, असे सांगितले. त्यामुळे आम्ही इथे राहायचा निर्णय घेतला. घरची आठवण तर येते. व्हिडीओ कॉल करुन या ठिकाणी कसे वातावरण आहे हे घरच्यांना दाखवतो. दिवसभर बसून तर काय करायचे. कधी एकदा लॉकडाऊन संपेल याची वाट पाहतोय. 

विरंगुळा देण्याचा मनपा कर्मचाºयांचा प्रयत्न- महापालिकेतील शेफाली दिलपाक, सुचेता आमणगी या निवारा केंद्रातील मुलींची व्यवस्था पाहतात. पुष्पस्रेहच्या लॉनवर सायंकाळी फुटबॉल, बॅडमिंटनसह वातावरण हलके-फुलके करण्यासाठी खेळ रंगलेले असतात. घरापासून दूर असलेल्या या परप्रांतातील मुलींना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करीत असतात.  

अनुकंपा नोकरीसाठी आल्या, २५ दिवस सोलापुरातच अडकून पडल्या 

  • - अनुकंपावरील नोकरीचा कायदेशीर सल्ला घेण्यासाठी मुंबईच्या नेहा कोंतम २० मार्च रोजी सोलापुरात आल्या होत्या. दुसºया दिवशी मुंबईला परतणार होत्या. तत्पूर्वी जनता कर्फ्यु जाहीर झाला. मुंबईकडे जाणारी वाहने बंद झाली. पतीने मुंबईतून खासगी वाहन पाठवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी परवानगी दिली नाही.
  • - काही दिवस नातेवाईकांकडे राहिल्या. तिथे इतरांना त्रास नको म्हणून आता निवारा केंद्रात आल्या आहेत. गेले २५ दिवस मी सोलापुरात आहे. माझं घर, संसार सगळं मुंबईत आहे. उदगीरला सासर आहे. कुठेतरी जायची मला परवानगी द्या, असं आर्जव त्या करीत आहेत. 
टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcollegeमहाविद्यालय