शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

संचारबंदीत अन्नाची ओढ; भाकरी आली रे... म्हणत भुकेल्यांची गाडीमागे धावाधाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2020 12:54 IST

संचारबंदीत अन्नाची ओढ असणाºया या मंडळींचा मिळेल ते खायचं आणि दिवस काढायचा असा प्रकार सुरू आहे. 

ठळक मुद्दे रेल्वे स्टेशन, भैय्या चौक मार्गावरील फुटपाथ, डॉ. आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर, कुष्ठरोग (लेप्रसी) वसाहत या भागात अनेक निराधार दररोज जेवणाची वाट पाहत असतातसध्या कोरोना का काय तो रोग आलाय.., सोलापूर बंद झालंय. रोज मागून खातो मात्र सध्या मागायची सोय राहिली नाही. पोट भागवायचं कसं असा प्रश्न आम्हाला रोज पडतो

संताजी शिंदे

सोलापूर : भाकरी आली रे चला... असे म्हणत भर उन्हात पोटाची भूक भागविण्यासाठी, रस्त्याच्या कडेला फुटपाथवर बसलेले निराधार अन्न वाटप करणारी गाडी पाहताच पळत सुटले. संचारबंदीत अन्नाची ओढ असणाºया या मंडळींचा मिळेल ते खायचं आणि दिवस काढायचा असा प्रकार सुरू आहे. 

मार्च महिन्यात संचारबंदीला सुरुवात झाली. दि. ३१ मार्चपर्यंत जाहीर झालेली संचारबंदी दि. १ एप्रिलपासून १४ एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली. नंतर पुन्हा दि. १५ ते ३० एप्रिलपर्यंत ही संचारबंदी वाढली. सुरुवातीच्या काळात बहुतांश सामाजिक संघटनांच्या वतीने निराधारांना अन्नदान करण्यात आले. मात्र हळूहळू अन्नदान करणारे हात आखडते झाले. सध्या बोटांवर मोजण्याइतक्या काही संस्था यथा शक्य ते अन्न वाटप करीत आहेत. रविवारी दुपारी दोननंतर शहरात संचारबंदी कडक करण्यात आली आहे. त्यामुळे निराधारांचे मोठे हाल होत आहेत. मार्केट, किराणा दुकान बंद असल्याने सकाळपासून रस्त्यावर कोणी दिसत नव्हते. रस्त्याच्या कडेला बसलेले निराधार येणाºया-जाणाºयांकडे मोठ्या आशेने पाहत होते. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास अन्न वाटप करणारी व्हॅन सिद्धेश्वर मंदिराजवळ आली. तेव्हा दोन्ही रस्त्यांच्या कडेला बसलेले निराधार एक एक करून व्हॅनच्या दिशेने धावू लागले. व्हॅनमधून एक व्यक्ती येणाºया प्रत्येकाला अन्नााचे पाकीट देत होते. 

हा प्रकार इतरांच्या लक्षात येताच महिला, वृद्ध व अपंग व्हॅनकडे येत होते. पळत असलेले निराधार अन्नाचे पाकीट हातात पडल्यानंतर मोठ्या समाधानाने हळूहळू चालत निघून जात होते. एकवेळच्या अन्नाचा प्रश्न मिटला, असे म्हणत सुटकेचा नि:श्वास टाकत होते. 

भूक काय असते याची जाणीव आहे : हिंगमिरे- माणसाला जगायचं असेल तर त्याला जेवणाची आवश्यकता असते. आज शहरात परिस्थितीमुळे रस्त्यावर दुर्दैवी जीवन जगणाºयांची संख्याही मोठी आहे. सर्वसामान्य माणूस घरात चटणी-भाकर खाऊन बसू शकतो, मात्र निराधार मंडळींना तेही शक्य होत नाही. घर नाही, दार नाही, रस्त्याच्या कडेला आसरा पाहून ही मंडळी भुकेल्या नजरेने आमची वाट पाहत असतात. भूक म्हणजे काय असते याची जाणीव मला असल्याने मी दररोज यथा शक्य अन्नदान करतो. जनावरांना चाराही देतो, अशी माहिती व्यावसायिक वीरेंद्र हिंगमिरे यांनी दिली. 

साहेब, ही माणसं येतात म्हणून आम्ही जगतोय- साहेब, सध्या कोरोना का काय तो रोग आलाय.., सोलापूर बंद झालंय. रोज मागून खातो मात्र सध्या मागायची सोय राहिली नाही. पोट भागवायचं कसं असा प्रश्न आम्हाला रोज पडतो. मात्र साहेब, अन्नदान करणारी ही माणसं जेव्हा येतात तेव्हा आम्हाला देव आल्यासारखा वाटतो. ही माणसं आहेत म्हणून आम्ही जगतोय, अशी भावनिक प्रतिक्रिया सिद्धेश्वर मंदिर येथील एका निराधाराने दिली. - डीआरएम आॅफिस, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक मार्गावरील फुटपाथ, डॉ. आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर, कुष्ठरोग (लेप्रसी) वसाहत या भागात अनेक निराधार दररोज जेवणाची वाट पाहत असतात. 

निराधारांचं पोट भरलं की समाधान वाटतं : तमशेट्टीसध्या संचारबंदीमुळे निराधारांचे हाल होत आहेत. सोलापूर बंद असल्यामुळे निराधारांना मागूनही खाता येत नाही. पैसे नसल्यामुळे त्यांना काही घेता येत नाही. मोठ्या आशेने ही मंडळी आमची वाट पाहत असतात. निराधारांचं पोट भरलं की आम्हाला समाधान मिळतं, असे मत जय हिंद फूड बँकेचे सतीश तमशेट्टी यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस