शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

किल्लारी भूकंपातील मृतांच्या दहनानंतर प्रथमच महामारीत विद्युत दाहिनीवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:20 IST

कर्मचाºयांचे अनुभव; धुराड्यातून सतत बाहेर पडतोय धूर; नवीन दाहिनीचे काम सुरू

ठळक मुद्दे आयुक्त पी. शिवशंकर यांनी नवी विद्युत दाहिनी बसविण्याचे आदेश दिल्यामुळे या दाहिनीवरील ताण कमी होईलदाहिनीवर काम करणारे राजू डोलारे म्हणाले, मृतदेहाचे वजन जादा असेल तर दाहिनीत तत्काळ दहन होतेमृतदेह सडपातळ असेल तर दहन व्हायला वेळ लागतो, जळाल्यानंतर हाडांची पावडर होते

राकेश कदमसोलापूर : लातूर जिल्ह्यातील किल्लारीमध्ये १९९३ साली भूकंप झाला होता. त्या काळात सिव्हिल हॉस्पिटलमधून मोठ्या संख्येने मृतदेह मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत आले होते. तेव्हा पहिल्यांदा या विद्युत दाहिनीचे महत्त्व प्रकर्षाने समोर आले होते. आता कोरोनाच्या काळात आणखी एका दाहिनीची गरज निर्माण झाली. त्या दृष्टीने कामाला सुरुवात झाली.

मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी खरे तर १९८४ मध्ये खरेदी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ती १९९१ मध्ये बसवण्यात आली. यानंतरच तिचा वापर सुरू झाला. लोक पारंपरिक पद्धतीने लाकडाची चिता रचून दहन करण्यास प्राधान्य देत होते. आजही अनेक लोक देतात. 

किल्लारीच्या भूकंपात मरण पावलेल्या अनेक लोकांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होते. त्यामुळे या मृतदेहांचे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सलग आठ दिवस अनेक मृतदेह या दाहिनीमध्ये आल्याचे महापालिकेचे मशीन आॅपरेटर शिवलिंग हिरेमठ यांनी सांगितले. हिरेमठ १९९१ पासून विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करीत आहेत. परंतु, या दाहिनीवर कोरोनाच्या काळात पहिल्यांदा मोठा ताण पडल्याचे ते सांगतात. 

कोरोनाबाधित मृतदेहांसह न्यूमोनिया किंवा इतर आजाराने बाधित मृतदेहांचे दाहिनीत दहन करण्यात येत आहे. दररोज सरासरी चार ते पाच मृतदेहांचे दहन होत आहे. कारखान्याच्या चिमणीतून सतत धूर बाहेर पडतो. या दाहिनीत दररोज पाच ते सहा मृतदेहांचे दहन होत आहे. दाहिनीच्या चिमणीतून सतत धूर बाहेर पडत असल्याचे आजूबाजूचे लोक सांगतात. त्यांनाही या धुराचा त्रास होऊ लागला आहे.

देखभाल मोठे जिकिरीचे काम- दाहिनीची देखभाल दुरुस्ती हे जिकिरीचे काम असल्याचे मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी सांगतात. दाहिनी सतत तापलेली असते. मृतदेहाचे दहन करताना तापमान ६०० ते ६५० डिग्री असते. दाहिनीचा बाहेरचा पार्ट खराब झाला तर बदलण्यासाठी तापमान कमी होण्याची वाट पाहावी लागते. त्यासाठी एक दिवस तरी जातो. दाहिनीचा आतील पार्ट खराब झाला असेल तर मशीनही बंद ठेवावे लागते. हे थंड होण्यासाठी दीड ते दोन दिवस लागतात. त्यानंतर काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तापविण्यासाठी अर्धा दिवस जात असल्याचे येथील कामगारांनी सांगितले. अनेक साहित्य पुण्यावरून मागवावे लागते.

आता अनेक जण रक्षाही मागायला आले नाहीत...- दाहिनीवर काम करणारे राजू डोलारे म्हणाले, मृतदेहाचे वजन जादा असेल तर दाहिनीत तत्काळ दहन होते. मृतदेह सडपातळ असेल तर दहन व्हायला वेळ लागतो. जळाल्यानंतर हाडांची पावडर होते. इतर काळात लोक तिसºया दिवशी ही राख घेऊन जायला येतात. कोरोनाच्या काळात काही मोजके नातेवाईक राख घेऊन गेले. राखेतूनही कोरोना होईल, या भीतीमुळे निम्म्यापेक्षा जास्त मृतांचे नातेवाईक राखही घेऊन जायला आले नाहीत.

तो दिवस भीतीदायक - गेल्या दोन महिन्यात ही दाहिनी तीन वेळा बंद पडली. पहिल्यांदा कोरोनाच्या भीतीमुळे कर्मचारी हातात पाना घ्यायला तयार नव्हते. तो दिवस भीतीदायकच होता. या दिवशी विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी पुढे आले. रात्री-अपरात्री या ठिकाणी थांबून दुरुस्ती करण्यात आली आहे. आता सर्वांचीच भीती उडाली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी नवी विद्युत दाहिनी बसविण्याचे आदेश दिल्यामुळे या दाहिनीवरील ताण कमी होईल, असे हिरेमठ म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू