शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
3
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
4
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
5
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
6
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
7
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
9
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
10
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
11
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
12
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
13
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
14
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
15
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
16
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
17
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
18
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
19
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
20
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
Daily Top 2Weekly Top 5

किल्लारी भूकंपातील मृतांच्या दहनानंतर प्रथमच महामारीत विद्युत दाहिनीवर ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2020 12:20 IST

कर्मचाºयांचे अनुभव; धुराड्यातून सतत बाहेर पडतोय धूर; नवीन दाहिनीचे काम सुरू

ठळक मुद्दे आयुक्त पी. शिवशंकर यांनी नवी विद्युत दाहिनी बसविण्याचे आदेश दिल्यामुळे या दाहिनीवरील ताण कमी होईलदाहिनीवर काम करणारे राजू डोलारे म्हणाले, मृतदेहाचे वजन जादा असेल तर दाहिनीत तत्काळ दहन होतेमृतदेह सडपातळ असेल तर दहन व्हायला वेळ लागतो, जळाल्यानंतर हाडांची पावडर होते

राकेश कदमसोलापूर : लातूर जिल्ह्यातील किल्लारीमध्ये १९९३ साली भूकंप झाला होता. त्या काळात सिव्हिल हॉस्पिटलमधून मोठ्या संख्येने मृतदेह मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीत आले होते. तेव्हा पहिल्यांदा या विद्युत दाहिनीचे महत्त्व प्रकर्षाने समोर आले होते. आता कोरोनाच्या काळात आणखी एका दाहिनीची गरज निर्माण झाली. त्या दृष्टीने कामाला सुरुवात झाली.

मोदी स्मशानभूमीतील विद्युत दाहिनी खरे तर १९८४ मध्ये खरेदी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ती १९९१ मध्ये बसवण्यात आली. यानंतरच तिचा वापर सुरू झाला. लोक पारंपरिक पद्धतीने लाकडाची चिता रचून दहन करण्यास प्राधान्य देत होते. आजही अनेक लोक देतात. 

किल्लारीच्या भूकंपात मरण पावलेल्या अनेक लोकांना सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. अनेक मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत होते. त्यामुळे या मृतदेहांचे विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सलग आठ दिवस अनेक मृतदेह या दाहिनीमध्ये आल्याचे महापालिकेचे मशीन आॅपरेटर शिवलिंग हिरेमठ यांनी सांगितले. हिरेमठ १९९१ पासून विद्युत दाहिनीची देखभाल दुरुस्ती करीत आहेत. परंतु, या दाहिनीवर कोरोनाच्या काळात पहिल्यांदा मोठा ताण पडल्याचे ते सांगतात. 

कोरोनाबाधित मृतदेहांसह न्यूमोनिया किंवा इतर आजाराने बाधित मृतदेहांचे दाहिनीत दहन करण्यात येत आहे. दररोज सरासरी चार ते पाच मृतदेहांचे दहन होत आहे. कारखान्याच्या चिमणीतून सतत धूर बाहेर पडतो. या दाहिनीत दररोज पाच ते सहा मृतदेहांचे दहन होत आहे. दाहिनीच्या चिमणीतून सतत धूर बाहेर पडत असल्याचे आजूबाजूचे लोक सांगतात. त्यांनाही या धुराचा त्रास होऊ लागला आहे.

देखभाल मोठे जिकिरीचे काम- दाहिनीची देखभाल दुरुस्ती हे जिकिरीचे काम असल्याचे मनपाच्या विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी सांगतात. दाहिनी सतत तापलेली असते. मृतदेहाचे दहन करताना तापमान ६०० ते ६५० डिग्री असते. दाहिनीचा बाहेरचा पार्ट खराब झाला तर बदलण्यासाठी तापमान कमी होण्याची वाट पाहावी लागते. त्यासाठी एक दिवस तरी जातो. दाहिनीचा आतील पार्ट खराब झाला असेल तर मशीनही बंद ठेवावे लागते. हे थंड होण्यासाठी दीड ते दोन दिवस लागतात. त्यानंतर काम सुरू होते. काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तापविण्यासाठी अर्धा दिवस जात असल्याचे येथील कामगारांनी सांगितले. अनेक साहित्य पुण्यावरून मागवावे लागते.

आता अनेक जण रक्षाही मागायला आले नाहीत...- दाहिनीवर काम करणारे राजू डोलारे म्हणाले, मृतदेहाचे वजन जादा असेल तर दाहिनीत तत्काळ दहन होते. मृतदेह सडपातळ असेल तर दहन व्हायला वेळ लागतो. जळाल्यानंतर हाडांची पावडर होते. इतर काळात लोक तिसºया दिवशी ही राख घेऊन जायला येतात. कोरोनाच्या काळात काही मोजके नातेवाईक राख घेऊन गेले. राखेतूनही कोरोना होईल, या भीतीमुळे निम्म्यापेक्षा जास्त मृतांचे नातेवाईक राखही घेऊन जायला आले नाहीत.

तो दिवस भीतीदायक - गेल्या दोन महिन्यात ही दाहिनी तीन वेळा बंद पडली. पहिल्यांदा कोरोनाच्या भीतीमुळे कर्मचारी हातात पाना घ्यायला तयार नव्हते. तो दिवस भीतीदायकच होता. या दिवशी विद्युत विभागाचे प्रमुख राजेश परदेशी पुढे आले. रात्री-अपरात्री या ठिकाणी थांबून दुरुस्ती करण्यात आली आहे. आता सर्वांचीच भीती उडाली आहे. आयुक्त पी. शिवशंकर यांनी नवी विद्युत दाहिनी बसविण्याचे आदेश दिल्यामुळे या दाहिनीवरील ताण कमी होईल, असे हिरेमठ म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू