शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
2
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
3
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
4
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
5
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
6
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
7
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
8
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
9
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
10
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
11
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
12
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
13
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
14
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
15
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
16
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
17
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
18
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
19
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
20
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."

टाटांच्या धरणांविरुद्ध एकजुटीने लढा द्या! - एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 05:27 IST

वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या धरणांच्या विरोधात आता एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी शनिवारी येथे केले.

सोलापूर  - वीजनिर्मितीसाठी ब्रिटिशांशी करार करून टाटांनी भीमा उर्ध्व खोऱ्यात मुळशीसह पाच धरणे उभारली. या धरणांमुळे पूर्ववाहिनी नद्या पश्चिमकडे वळविण्यात आल्या. त्यामुळे अनेक वर्षांपासून खोºयातील लाखो शेतकरी आणि नागरिकांना त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या धरणांच्या विरोधात आता एकजुटीने लढा द्यावा, असे आवाहन ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांनी शनिवारी येथे केले.पाणी चळवळीतील कार्यकर्ते प्रफुल्ल कदम यांच्या ‘हे पाणी आमचं’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते येथे झाले. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. पाटील बोलत होते. खासदार कुमार केतकर, आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनराव शिंदे, महापौर शोभा बनशेट्टी या वेळी मंचावर उपस्थित होते.एन. डी. पाटील म्हणाले, कृष्णा खोºयाचाच भाग असलेल्या भीमा उर्ध्व खोºयातील पाणी अडवून टाटाने पश्चिमेकडे वळविले. आता आपणाला खोºयातील नदीच्या पाण्याला त्याची नैसर्गिक पूर्व दिशा मिळवून द्यायची आहे.केतकर म्हणाले, निसर्गातील कोणतीही गोष्ट कुणाच्याही मालकीची असू नये, ही गांधीजींची भूमिका होती. विनोबा भावे यांनीही हीच भूमिका होती. भीमा उर्ध्व खोºयातील पाणी हे तेथील शेतकºयांच्या हक्काचे आहे. ते त्यांना मिळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी भूमिका घेतली पाहिजे. पृथ्वीराज चव्हाण यांनी टाटांच्या धरणांचा प्रश्न सामोपचार आणि घटनेच्या आधाराने सोडविण्याचे आवाहन केले. या वेळी आमदार गणपतराव देशमुख यांचेही भाषण झाले.

टॅग्स :TataटाटाDamधरणnewsबातम्याMaharashtraमहाराष्ट्र