शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पन्नास हजार वारकºयांनी केला नावेतून चंद्रभागेत स्वछंद विहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2019 14:30 IST

पंढरपुरातील भक्तांची होडीतून प्रवास : पंढरीतील चारशे ते साडेचारशे कोळी बांधवांचा व्यवसाय; उपजीविकेचे मुख्य साधन

ठळक मुद्देआषाढीला पंढरीत दाखल झालेले वारकरी गोपाळकाला करून परतीच्या प्रवासाला लागले आहेतविठुदर्शनाने तृप्त झालेल्या बहुतेक भक्तांची ओढ असते ती चंद्रभागेत नावेतून स्वछंद विहार करण्याचीनदी परिसरातील सर्व मंदिरातील देवतांचे दर्शन घेत गोपाळपूरपर्यंत नौकाविहाराचा आनंद घेत असतात

यशवंत सादूल 

पंढरपूर : आषाढीला पंढरीत दाखल झालेले वारकरी गोपाळकाला करून परतीच्या प्रवासाला लागले आहेत. विठुदर्शनाने तृप्त झालेल्या बहुतेक भक्तांची ओढ असते ती चंद्रभागेत नावेतून स्वछंद विहार करण्याची. नदी परिसरातील सर्व मंदिरातील देवतांचे दर्शन घेत गोपाळपूरपर्यंत नौकाविहाराचा आनंद घेत असतात. यंदा जवळपास पन्नास हजार वारकरी व इतर भक्तांनी या होडीतून प्रवास केला आहे.

चंद्रभागा स्नान, नामदेव पायरी दर्शन अन् विठ्ठलाच्या दर्शनानंतर बहुतेक वारकºयांचे पाय आपोआप वळवंटाकडे वळतात. नदीपात्रालगत असलेल्या नारदमुनी, हरे कृष्ण, म्हसोबा मंदिर, राघोजी भांगरे स्मारक यासोबत नावेतून गोपाळपूरला जाऊन गोपालकृष्णाचे दर्शन घेण्यात भक्त स्वत:ला धन्य मानतात. दिंड्या आळंदीतून निघाल्या की, पंढरीकडे भक्तांचा ओघ सुरू होतो. त्यासोबत नावेतून प्रवास करणाºया भक्तांची संख्या वाढत जाते. 

महादेव कोळी समाजाच्या होडी चालक-मालक संघाच्या दोनशे होडी भक्तांच्या सेवेत आहेत. एका खेपेस वीस ते तीस प्रवासी होडीतून विहार करतात. पंढरीतील चारशे ते साडेचारशे कोळी बांधव या नाव वल्हविण्याच्या व्यवसायात असून, त्यांच्या उपजीविकेचे हे मुख्य साधन आहे. वर्षातील चारही वारीत यांची सेवा अखंडपणे सुरू असते. नौकाविहारामुळे चंद्रभागेतील पाणी वर्षभर स्वच्छ राहण्यास मदत होते.

वारकरी भक्तांना विरंगुळ्यासह देवांचे दर्शन होते. पर्यटनाच्या दृष्टीने अधिक विकसित व्हावे, यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत, असे मत उत्तम प्रचंडे, दिलीप कोरे, रामभाऊ कोळी, पुंडलिक प्रचंडे, पोपट कोरे यांनी व्यक्त केले. 

सागवान, सुबाभूळ, निलगिरी लाकडाचा वापर- एक नाव तयार करण्यासाठी चाळीस ते पन्नास हजार रुपये खर्च येतो. ती दहा ते बारा वर्षे टिकते. त्यासाठी सागवान, सुबाभूळ, निलगिरी लाकडाचा वापर केला जातो. नावेची लांबी वीस फूट असते तर रुंदी मध्यभागी सात फूट असते. दोन्ही बाजूस निमूळते होत रुंदी कमी होत एक फूट ते सहा इंच होते. उंची अडीच ते तीन फूट असते. नावेच्या मागील बाजूस चांदा तर पुढील बाजूस मोहरा किंवा घोडा, असे संबोधले जाते. नाव वल्हविणाºयाच्या मागील बाजूस हा मोहरा असतो. ही जागा सात फूट लांब व तीन फूट रुंद असते.

कोळी बांधवांची सामाजिक बांधिलकी- पंढरपूरच्या कोळी बांधवांकडून नाव चालविण्याबरोबरच बुडणाºया भाविकांना वाचविण्याचे काम केले जाते. या वर्षभरात दोनशेहून अधिक लोकांचे प्राण वाचविण्यात आले. नदीपात्रातील बेवारस प्रेत काढणे, चोरी रोखण्यासाठी पोलिसांना मदत करणे, नदीपात्र स्वच्छ राखण्यासाठी प्रशासनाला मदतीची भूमिका असते. वारीनंतर वाळवंटात आढळून येणारे मतिमंद, हरवलेल्या व्यक्तींना पोलिसांकडे सुपूर्द करण्याचे कामसुद्धा केले जाते, अशी माहिती होडीचालक संघाचे प्रमुख गणेश अंकुशराव यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळा