शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

पितृपंधरवडा; दिवंगत व्यक्तीचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 20:50 IST

दिवंगत व्यक्तीचे श्रद्धापूर्वक केलेले स्मरण म्हणजे श्राद्ध. पूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते. तसेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण अमावस्या या १५ दिवसांच्या काळात महालय श्राद्ध केले जाते. या काळाला पितृपक्ष अथवा पितृ पंधरवडा असे म्हणतात. महालय या शब्दाचे अपभ्रष्ट रुप महाळ असे होते, असे डॉ. अपर्णा कल्याणी यांनी ...

ठळक मुद्देकिंबहुना नेहमीच्या वर्षश्राद्धापेक्षाही महालय श्राद्ध अधिक महत्त्वाचेभाद्रपद अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतातपूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते

दिवंगत व्यक्तीचे श्रद्धापूर्वक केलेले स्मरण म्हणजे श्राद्ध. पूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते. तसेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण अमावस्या या १५ दिवसांच्या काळात महालय श्राद्ध केले जाते. या काळाला पितृपक्ष अथवा पितृ पंधरवडा असे म्हणतात. महालय या शब्दाचे अपभ्रष्ट रुप महाळ असे होते, असे डॉ. अपर्णा कल्याणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

एकीकडे अपत्ये जन्माला येतात तर दुसरीकडे वृद्ध व्यक्ती देह ठेवीत असतात. त्यांचे कौटुंबिक, सामाजिक दायित्व, उत्तमोत्तम गुणांचा वारसा पुढच्या पिढीकडे येत असतो. तथापि जे इहलोक सोडून गेले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. पूज्यभाव व्यक्त करावा, ही मानवी मनाची सहज प्रवृत्ती आहे. तिला अनुसरुनच श्राद्ध संस्काराची संकल्पना उदयाला आली. पूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते. भाद्रपद अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. महालय हा देखील एक श्राद्ध विधी आहे.

किंबहुना नेहमीच्या वर्षश्राद्धापेक्षाही महालय श्राद्ध अधिक महत्त्वाचे आहे, नेहमीचे वर्षश्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला अर्थात पणजोबा, आजोबा, वडील यांना उद्देशून असते तर महालय हा आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असतो. महालयात दिवंगत आई-वडील, वडिलांचे आई-वडील, आजी-आजोबा, आईचे आई-वडील, स्वत:चे सासू-सासरे, भाऊ, वहिनी, बहीण, मेव्हणा, आत्या, काका-काकू, मावशी, मामा-मामी, गुरु, आश्रयदाते, उपकारकर्ते, पाळीव प्राणी लावून तोडलेले वृक्ष, देशासाठी प्राणार्पण करणारे सैनिक, शेतकरी, सर्वच क्षेत्रांमधील आदरणीय, श्रद्धेय व्यक्ती अशा सर्वांसाठी कृतज्ञता, ऋण व्यक्त करायचे असते. तिथीदिनी श्राद्ध करणे जमले नाही तर सर्वपित्री अमावस्येला सगळ्या पितरांचे श्राद्ध करता येते. पितृपक्षात पितरांचे वास्तव्य पृथ्वीवर असते. पूर्वजांचे शुभाशीर्वाद आणि कृपा प्राप्तासाठी पितृसूक्तांचे पठण आणि हवनही केले जाते. त्यामुळे सर्वांनी पितरांचे महालय श्राद्ध अवश्य करावे, असे डॉ. अपर्णा कल्याणी सांगतात. 

टॅग्स :Solapurसोलापूर