शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

पितृपंधरवडा; दिवंगत व्यक्तीचे स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 20:50 IST

दिवंगत व्यक्तीचे श्रद्धापूर्वक केलेले स्मरण म्हणजे श्राद्ध. पूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते. तसेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण अमावस्या या १५ दिवसांच्या काळात महालय श्राद्ध केले जाते. या काळाला पितृपक्ष अथवा पितृ पंधरवडा असे म्हणतात. महालय या शब्दाचे अपभ्रष्ट रुप महाळ असे होते, असे डॉ. अपर्णा कल्याणी यांनी ...

ठळक मुद्देकिंबहुना नेहमीच्या वर्षश्राद्धापेक्षाही महालय श्राद्ध अधिक महत्त्वाचेभाद्रपद अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतातपूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते

दिवंगत व्यक्तीचे श्रद्धापूर्वक केलेले स्मरण म्हणजे श्राद्ध. पूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते. तसेच भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते भाद्रपद कृष्ण अमावस्या या १५ दिवसांच्या काळात महालय श्राद्ध केले जाते. या काळाला पितृपक्ष अथवा पितृ पंधरवडा असे म्हणतात. महालय या शब्दाचे अपभ्रष्ट रुप महाळ असे होते, असे डॉ. अपर्णा कल्याणी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

एकीकडे अपत्ये जन्माला येतात तर दुसरीकडे वृद्ध व्यक्ती देह ठेवीत असतात. त्यांचे कौटुंबिक, सामाजिक दायित्व, उत्तमोत्तम गुणांचा वारसा पुढच्या पिढीकडे येत असतो. तथापि जे इहलोक सोडून गेले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी. पूज्यभाव व्यक्त करावा, ही मानवी मनाची सहज प्रवृत्ती आहे. तिला अनुसरुनच श्राद्ध संस्काराची संकल्पना उदयाला आली. पूर्वजांचे वर्षश्राद्ध त्यांच्या मृत्यूतिथीला केले जाते. भाद्रपद अमावस्येला सर्वपित्री अमावस्या म्हणतात. महालय हा देखील एक श्राद्ध विधी आहे.

किंबहुना नेहमीच्या वर्षश्राद्धापेक्षाही महालय श्राद्ध अधिक महत्त्वाचे आहे, नेहमीचे वर्षश्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीला अर्थात पणजोबा, आजोबा, वडील यांना उद्देशून असते तर महालय हा आपल्या संबंधातील सर्व मृत व्यक्तींना उद्देशून असतो. महालयात दिवंगत आई-वडील, वडिलांचे आई-वडील, आजी-आजोबा, आईचे आई-वडील, स्वत:चे सासू-सासरे, भाऊ, वहिनी, बहीण, मेव्हणा, आत्या, काका-काकू, मावशी, मामा-मामी, गुरु, आश्रयदाते, उपकारकर्ते, पाळीव प्राणी लावून तोडलेले वृक्ष, देशासाठी प्राणार्पण करणारे सैनिक, शेतकरी, सर्वच क्षेत्रांमधील आदरणीय, श्रद्धेय व्यक्ती अशा सर्वांसाठी कृतज्ञता, ऋण व्यक्त करायचे असते. तिथीदिनी श्राद्ध करणे जमले नाही तर सर्वपित्री अमावस्येला सगळ्या पितरांचे श्राद्ध करता येते. पितृपक्षात पितरांचे वास्तव्य पृथ्वीवर असते. पूर्वजांचे शुभाशीर्वाद आणि कृपा प्राप्तासाठी पितृसूक्तांचे पठण आणि हवनही केले जाते. त्यामुळे सर्वांनी पितरांचे महालय श्राद्ध अवश्य करावे, असे डॉ. अपर्णा कल्याणी सांगतात. 

टॅग्स :Solapurसोलापूर