शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकºयाने कांद्यावर फिरविला ट्रॅक्टर, सोलापूर जिल्ह्यात पावसाअभावी पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 10:53 IST

नान्नज: कांद्याला लाखो रुपये खर्चूनही पावसाअभावी पीक जळून गेले. यामुळे वैतागलेल्या नान्नजमधील अक्षय गवळी या शेतकºयाने दोन एकर कांद्यावर ...

ठळक मुद्देकांदा पिकासाठी लाखो रुपये खर्च करून पाऊस न आल्याने जळून गेलेजनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहेकर्जाने ग्रासलेल्या शेतकºयास आर्थिक मदतीची गरज

नान्नज: कांद्याला लाखो रुपये खर्चूनही पावसाअभावी पीक जळून गेले. यामुळे वैतागलेल्या नान्नजमधील अक्षय गवळी या शेतकºयाने दोन एकर कांद्यावर ट्रॅक्टर फिरविला. पावसाअभावी पिकांची अवस्था वाईट असून, शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

उत्तर तालुक्याच्या वाट्याला दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. यावर्षीची सर्व नक्षत्रे कोरडी गेली. त्यामुळे खरीप आणि रब्बी हंगाम पूर्णपणे वाया गेले आहेत. तालुक्यात आतापर्यंत ३८ टक्के पाऊस पडलेला असताना उत्तर तालुका दुष्काळी यादीतून वगळला आहे. पावसाच्या भरवशावर अक्षय गवळी यांनी शेतात तीन एकर कांद्याची लागवड केली.

पाऊस न आल्यामुळे लागवड केलेली कांद्याची रोपे जतन करण्यासाठी त्यास ठिबकही केले. पुन्हा एक एकर कांदा लागवड तयार करण्यासाठी रानही तयार केले होते. कांद्याला काही पाणी पुरेनासे झाले़ गवळी यांच्याकडे एक बोअरवेल आहे. त्यावरील मोटार फक्त पंधरा ते वीस मिनिटे चालते. विहिरी तर कोरड्या पडत आहेत.

कांदा पिकासाठी लाखो रुपये खर्च करून पाऊस न आल्याने जळून गेले. नाराज झालेल्या गवळी यांनी आपल्या शेतातील कांदा पीक व कांद्याच्या रोपावर ट्रॅक्टर फिरवून कुळवणी केली आहे. पाण्याची पातळी खोलवर गेली असून, जनावरांच्या चाºयाचा प्रश्न भेडसावत आहे. कर्जाने ग्रासलेल्या शेतकºयास आर्थिक मदतीची गरज आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी